शहरं
Join us  
Trending Stories
1
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
2
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
3
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
4
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
5
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
6
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
7
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
8
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
9
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
10
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
11
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
12
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
13
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
14
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
15
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
16
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
17
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल
18
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
19
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
20
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले

हर्सूल येथील धार्मिक स्थळाच्या ४० एकर जागेच्या सातबा-यावर फेरफारीच्या हालचाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2017 13:11 IST

हर्सूल येथील धार्मिक स्थळासाठी खिदमतमास व इनामी म्हणून दिलेल्या सुमारे ४० एकर जमिनीच्या सातबा-यात खाजगी मालकी लावण्याच्या हालचाली जिल्हा प्रशासनातील काही महाभाग करीत असल्याची माहिती पुढे आली आहे.

ठळक मुद्देअपर तहसीलदारांनी या जमिनीच्या प्रकरणात गतवर्षी संचिका बंद करून खाजगी मालकीची नावे वगळण्याचे आदेश दिलेफेरफार करून सदरील जमिनीवर कब्जा करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.बाजारभावानुसार ती जमीन ८० ते १०० कोटींच्या आसपास आहे.

औरंगाबाद : हर्सूल येथील धार्मिक स्थळासाठी खिदमतमास व इनामी म्हणून दिलेल्या सुमारे ४० एकर जमिनीच्या सातबा-यात खाजगी मालकी लावण्याच्या हालचाली जिल्हा प्रशासनातील काही महाभाग करीत असल्याची माहिती पुढे आली आहे. अपर तहसीलदारांनी या जमिनीच्या प्रकरणात गतवर्षी संचिका बंद करून खाजगी मालकीची नावे वगळण्याचे आदेश दिलेले असतानाही फेरफार करून सदरील जमिनीवर कब्जा करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. बाजारभावानुसार ती जमीन ८० ते १०० कोटींच्या आसपास आहे.

हर्सूल परिसरातील मंडळ अधिका-यास रजेवर पाठवून प्रभारी पदभार घेणा-या अधिका-याने या इनामी जमिनीच्या सातबाºयात खाजगी मालकीची नोंद घेऊन फेरफार केला. १९५५ मध्ये हर्सूल येथील सर्व्हे नं. २८० व २८३ मधील अंदाजे ४० एकर जागा ही खिदमतमास म्हणून दर्ग्याच्या हक्कात असल्याची नोंद आहे. त्यामुळे सद्य:स्थितीत या जमीन प्रकरणात कुठल्याही प्रकारची फेरफार करून घेण्यात येऊ नये, अशी तक्रार जिल्हा प्रशासनाकडे आली होती. 

दरम्यान, हे प्रकरण न्यायालयातही गेले. न्यायालयाकडून काढलेल्या वारसाहक्काच्या आधारे त्या जमिनीच्या मालकीत फेरफार घेण्यासाठीही हालचाली झाल्या. त्या जमिनीबाबत कुठलाही न्यायनिवाडा झालेला नसताना बेकायदेशीररीत्या फेरफार घेतल्यामुळे याप्रकरणी स्वतंत्र चौकशी करण्यात येणार होती; परंतु ती झाली नाही. एप्रिल २०१६ मध्ये शासनाने मशीद, दर्गा यांची नावे नोंदविण्याबाबत स्पष्ट आदेश दिलेले आहेत. इतर अधिकारातील नावे कमी करण्याचे आदेशही सोबत देण्यात आलेले आहेत. असे असताना फेरफारीच्या हालचालींना वेग येण्याचे कारण आहे, असा प्रश्न आहे. 

तहसीलदारांचे आदेश असेअपर तहसीलदारांनी या जमिनीप्रकरणी सुनावणी घेऊन आॅक्टोबर २०१६ मध्ये दिलेले आदेश असे आहेत. हर्सूल येथील सर्व्हे नं.२८० व २८३ च्या अधिकार अभिलेखात नाव नोंदविण्याबाबत दिलेला अर्ज फेटाळण्यात आला आहे. तसेच यापूर्वीच्या फेरफारनुसार झालेली बेकायदेशीर नोंद कमी करण्याबाबत आदेश देण्यात येत आहेत. या निर्णयाची माहिती संबंधितांना कळवून प्रकरण बंद करण्यात यावे.