शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

‘स्मॉल वंडर’च्या यशाने जालन्याचे नाव जगभरात

By admin | Updated: July 16, 2017 00:21 IST

जालना : रेडिओ ध्वनी लहरी क्षेत्रात दिवसेंदिवस संशोधन होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : रेडिओ ध्वनी लहरी क्षेत्रात दिवसेंदिवस संशोधन होत आहे. संशोधन ही निरंतर चालणारी प्रक्रिया असून, केवळ २.४ मीटर व्यासाचा ‘स्मॉल वंडर’ डीश अ‍ॅन्टेना बनविल्याने खर्चातही बचत होऊन कार्यक्षमतेत वाढ झाली आहे. या मिशनच्या यशस्वीतेमुळे जालन्याचे नाव देशातच नव्हे तर जगभरात पोहोचले आहे, असे भू अनुश्रवण केंद्राचे उपसंचालक अजय सिंघल यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे केवळ २.४ मीटर व्यासाचा डीश अ‍ॅण्टेना बनवून रेडिओ ध्वनी लहरी क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल उपसंचालक अजय सिंघल यांना इंडिया बुक आॅफ रेकॉर्डस् आणि एशिया बुक आॅफ रेकॉर्डस् या प्रख्यात संस्थांकडून पुरस्कार जाहीर झाला आहे. उपसंचालक सिंघल यांनी यापूर्वी देशभरात गाजलेल्या स्पेक्ट्रमचा व्यावसायिक वापर करणाऱ्या कंपन्या नियम तोडत असल्याचे माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यांच्या उत्कृष्ट कार्याचा राष्ट्रीय पातळीवर केंद्र सरकारने गौरव केला होता. याबाबतचे पत्र दोनच दिवसांपूर्वी सिंघल यांना मेलद्वारे प्राप्त झाले आहे. सिंघल म्हणाले की, साधारणपणे साडेचार वर्षांपूर्वी जालना उपग्रह अनुश्रवण केंद्रात बदली झाली. माझे मूळ गाव भोपाळ आहे. इंडियन रेडिओ रेग्युलेटरी सर्व्हिसेसच्या माध्यमातून या क्षेत्रात आलो. तुलनेने कमी किमतीतव अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज अशी ‘स्मॉल वंडर’ नावाची डीश अ‍ॅण्टेना यंत्रणा तयार केली. तसेच ‘सजग’ हे डेटाबेस सॉफटवेअर विकसित केले. या दोन्ही कार्याची लिम्का बुक आॅफ रेकॉडस्ने नोंद घेतलेली आहे. इस्त्रोच्या मदतीने जालना शहराजवळ १९९३ मध्ये भू अनुश्रवण केंद्र स्थापन करण्यात आले. त्यानंतर पुढील अनेक वर्षांत या केंद्रातील तंत्रज्ञान अद्ययावत झालेले नव्हते. डिजीटल तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात आला नव्हता. अंतराळात असलेल्या अनेक उपग्रहांना या केंद्रातून नियंत्रित करताना अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत असे. १९ फेब्रुवारी २०१३ पासून स्पेक्ट्रम आणि ई-सिस्टीम विकसित केली. ज्यात केवळ २.४ व्यासाची डीश अ‍ॅण्टेना कार्यान्वित करण्यात आली. कमीत कमी खर्चात आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. दोन बॅण्डद्वारे दहा उपग्रहांचे मॉनिटरींग करण्याची या डीश अ‍ॅण्टेनाची क्षमता आहे. तर डेटाबेस सॉफ्टवेअर ‘सजग’ १७ जून २०१४ पासून कार्यान्वित करण्यात आले आहे. या प्रकल्पांचा उद्देश हा किमान खर्चात अत्याधुनिक यंत्रणा विकसित करणे हा होता. तसेच अनेक कंपन्यांकडून सॅटेलाईट स्पेक्ट्रमची चोरी केली जात असल्याचे निदर्शनास आले. हा प्रकार वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर मला २०१५ मध्ये पंतप्रधान पुरस्काराने गौरविण्यात आले.