शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

दोस्ती का नाम जिंदगी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2018 12:14 AM

व्यसनाच्या आहारी गेलेल्या मित्राचा बिघडलेला संसार सुखाचा करून वर्गमित्रांनी एक आदर्श निर्माण केला. एवढेच नव्हे तर आपल्या मित्राला निर्व्यसनी करून सर्वांनी वर्गणी जमा केली व त्यास व्यवसायही सुरू करून दिला. माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहमिलनानिमित्त हा सुखाचा ‘क्षण’ आला.

रवींद्र अजमेरा ।लोकमत न्यूज नेटवर्कवासडी : व्यसनाच्या आहारी गेलेल्या मित्राचा बिघडलेला संसार सुखाचा करून वर्गमित्रांनी एक आदर्श निर्माण केला. एवढेच नव्हे तर आपल्या मित्राला निर्व्यसनी करून सर्वांनी वर्गणी जमा केली व त्यास व्यवसायही सुरू करून दिला. माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहमिलनानिमित्त हा सुखाचा ‘क्षण’ आला.वासडी येथील जि. प. प्रशालेतील १९९४ मध्ये दहावी वर्गात सोबत असलेल्या वर्गमित्रांनी मागील दोन वर्षांपासून स्नेहमिलनाचा कार्यक्रम सुरू केला आहे.या वर्गातील ७० विद्यार्थी प्रत्येक वर्षी एकत्र येऊन प्रत्येकाचे सुख दु:ख विचारून सगळे मिळून मदतही करतात. यातूनच त्यांचा वर्गमित्र संजय वाघ हा दारूच्या आहारी गेल्याने त्याच्या संसाराला ‘नजर’ लागली. घरात नवरा-बायकोत भांडणे होऊ लागली. यामुळे इतर मित्र चिंतित झाले. नंतर सर्व मित्रांनी आधार देऊन संजयची संसारवेल पुन्हा फुलविली.यावर्षी भगवान बाबा मंदिरावर हस्ता गावच्या विद्यार्थ्यांकडून या स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाला १९९४च्या बॅचचे सर्व विद्यार्थी व वासडी शाळेचे शिक्षक ए. व्ही. आरसूल, डी. पी. सुरडकर उपस्थित होते.वासडी येथील सरपंच राहुल पाटणी, मेहेगावचे सरपंच पांडुरंग घुगे, हस्ता गावचे माजी सरपंच मनोहर नीळ यांनी हजेरी लावून या उपक्रमाची प्रशंसा केली.अचानक काहीही संकट आले तर एकमेकांना मदत करायची, असा निर्णय या सर्व मित्रांनी घेतल्याने स्नेहमिलनात ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’ निर्माण झाले होते. यामुळे खुदगर्ज चित्रपटातील ‘दोस्ती का नाम जिंदगी...जिंदगी का नाम दोस्ती’ या गाण्याची आठवण मित्रांना झाली.माझ्या नवºयाने सोडलिया दारू...सर्व वर्गमित्रांनी स्नेहमिलनात संजयचा संसार सुखाचा करण्याचा संकल्प केला व तो ध्यासालाही नेला. संजयनेही मित्रांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन दारू सोडली. यानंतर त्यास हॉटेलवर कामाला लावले. तो मागील एक वर्षापासून व्यसनाच्या दूर राहिला म्हणून यंदाच्या स्नेहमिलनात त्याचा गुरुजनांच्या हस्ते सत्कार करून हॉटेल व्यवसाय सुरू करून देण्याचा निर्धार करण्यात आला. १ जानेवारीला नववर्षदिनी हॉटेलही सुरु झाली. सर्व वर्गमित्रांनी संसार सुखाचा केल्याने संजयच्या वडिलांनी व पत्नीने सर्वांचे आभार मानले. आपल्या नवºयाने दारु सोडल्याचे कळताच बायकोलाही आनंदाश्रू आवरणे कठीण झाले.