शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
2
भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रकची धडक, चौघांना किरकोळ दुखापत
3
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
4
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
5
'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
6
Navratri 2025: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
7
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
8
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
9
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
10
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा
11
भारतात राहून पोस्ट ग्रॅजुएशन अन् देशालाच उडवण्याची योजना; पोलिसांनी सांगितले अटक केलेल्या ५ दहशतवाद्यांचे मनसुबे! 
12
साखरेच्या डब्यात मुंग्याच मुंग्या; पाहून डोक्याचा होतो भुगा, 'या' घरगुती उपायाने होतील छूमंतर
13
भारतासाठी T20I मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे ५ फिरकीपटू!
14
VIDEO: बापरे... मगर आणि पाणघोडा आले समोरासमोर, दोघांमध्ये तुफान जुंपली... कोण जिंकलं?
15
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
16
"आता पहिल्यासारखं आयुष्य नाही..."; एकाच मुलीशी लग्न करणाऱ्या २ भावांवर कोसळला दु:खाचा डोंगर
17
नवीन गाडीची डिलिव्हरी घेताना अपघात झाला तर? महिंद्रा थारच्या घटनेतून जाणून घ्या विमा क्लेमचे नियम
18
Google Pixel 9: चक्क अर्ध्या किंमतीत खरेदी करा गुगल पिक्सेल ९; कॅमेऱ्यानं अनेकांना लावलंय वेड!
19
बहिणीच्या स्वप्नात भाऊ आला... म्हणाला, माझा खून झाला; 'ती' शंका खरी, हत्येची फिल्मी स्टोरी

Namantar Andolan : शरद पवार आणि नामांतरविरोधकांमध्ये माझी समन्वय साधण्याची भूमिका : तुकाराम पांचाळ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2019 18:14 IST

लढा नामविस्ताराचा : शरद पवार यांना विद्यापीठ नामांतर करावयाचेच होते. त्याबाबतीत ते पुरेसे गंभीर होते.  त्यांनी नामांतरासाठी हालचाली सुरू केल्या. सर्वांना विश्वासात घेण्याचा त्यांचा प्रयत्न होता. नामांतर केल्याने आपल्याला काय राजकीय फायदे- तोटे मिळतील, याचा त्यांनी विचार केला नव्हता. शेवटच्या टप्प्यात मी शरद पवार आणि नामांतर विरोधकांमध्ये समन्वय साधण्याची भूमिका मला पार पाडता आली, याचे समाधान वाटते, असे तुकाराम पांचाळ यांनी सांगितले. 

- स. सो. खंडाळकर 

तूकाराम पांचाळ हे प्रारंभापासूनच शरद पवार यांचे कार्यकर्ते राहिलेले आहेत. त्यांच्याशी निष्ठावान राहण्याचे फळही त्यांना त्या काळात मिळाले होते. तत्कालीन राज्य दुय्यम सेवा मंडळाचे सदस्यपद  शरद पवार यांच्यामुळे त्यांना भूषविता आले होते. प्रारंभी त्यांनी युवक क्रांती दलात कार्य केले. नामांतर लढ्याच्या अनेक आठवणी त्यांच्या गाठीशी आहेत. 

स.भु. मैदानावरची बैठक...नामविस्ताराच्या रौप्यमहोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर ते ‘लोकमत’शी बोलत होते. त्यांनी सांगितले, अगदी सुरुवातीला स.भु.च्या मैदानावर आम्ही बैठक घेतली होती. त्यात मानवेंद्र काचोळे, ज्ञानोबा मुंडे, श्रीरंग वारे, प्रकाश देशमुख ही मंडळी होती. त्या काळात वैद्यकीय व अभियांत्रिकीच्या जागा कमी करण्यात आल्या होत्या. त्या वाढवाव्यात ही मागणी होती. मग बैठकीला वैद्यकीय व अभियांत्रिकीची थोडीथोडकीच मुले उपस्थित राहिली. विविध मागण्यांचा समावेश करून व्यापक आंदोलन करावे या हेतूने व्यापक बैठक आयोजित केली. बेनॉर योजना लागू करा, शारीरिक शिक्षण सक्तीचे करा, शिष्यवृत्तीत वाढ करा, शेतीमालाला किफायतशीर भाव द्या, यासह विविध मागण्यांसाठी विविध महाविद्यालयांच्या विद्यापीठ प्रतिनिधींसह युवक काँग्रेस, एसएफआय, दलित युवक आघाडी, एनएसयूआय, पुरोगामी युवक संघटना, दलित पँथर, युवक क्रांती दल, अशा संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. याच वेळी रामनाथ गायकवाड व अनिल गोंडाणे आदींनी चवदार तळ्याच्या सत्याग्रहाचे हे ५० वे वर्ष असल्याने मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराची मागणी करणे संयुक्तिक ठरेल, असे सुचविले. त्यामुळे तीही मागणी समाविष्ट करून पायी आम्ही विद्यापीठाकडे निघालो.

इकडे गंगाधर गाडे, रतनकुमार पंडागळे, दौलत खरात आदींच्या नेतृत्वाखालीही मोठा मोर्चा निघाला होता. त्यात मिलिंदचे हजारो विद्यार्थी सहभागी झाले होते. त्याच दिवशी विद्यापीठात किशनराव देशमुख, वसंत काळे, राजाराम राठोड यांच्या प्रयत्नाने नामांतराचा ठराव संमत झाला होता. ६ डिसेंबर १९७९ रोजी क्रांती चौकातील सत्याग्रहात सहभागी झालो होतो. त्यानंतर मुंबईच्या सत्याग्रहात मला पहिली अटक झाली. तीन वर्षे मी मुंबईतच युनियनचे काम करीत राहिलो. नंतर औरंगाबादला आलो. शरद पवार यांनी स्थापन केलेल्या समाजवादी काँग्रेसमध्ये मी काम करीत होतो. दुसऱ्यांदा शरद पवार मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी नामांतर करण्याचे मनावर घेतले. नामांतर विरोधक गोविंदभाई श्रॉफ, दिनकर बोरीकर, ना. वि. देशपांडे आदींशी त्या काळात मी चर्चा करीत होतो. गोविंदभार्इंच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ मुंबईला गेले. भाईजींनी त्यांचे म्हणणे मांडले. मराठवाडा नाव कायम ठेवून व नांदेडला स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नावाचे स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्याचा तोडगा काढण्यात आला. या सगळ्या प्रक्रियेमध्ये मला समन्वयाची भूमिका पार पाडता आली, याचे समाधान वाटते, असे तुकाराम पांचाळ यांनी नम्रपणे नमूद केले. 

टॅग्स :Namantar Andolanनामांतर आंदोलनDr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादMarathwadaमराठवाडा