शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
5
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
6
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
7
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
8
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
9
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
10
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
11
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
12
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
13
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
14
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
15
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
16
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
17
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
18
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
19
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
20
डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण

Namantar Andolan: ‘माझं अख्खं कुटुंबच नामांतर लढ्यात, आई-वडिलांना कारावासही झाला’ : संजय जगताप 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 13:58 IST

लढा नामविस्ताराचा : मी त्यावेळी लहान होतो. भडकलगेटजवळील मल्टिपर्पज हायस्कूलमध्ये आठवी-नववीत शिकत होतो. तरीही विद्यार्थी  चळवळीत सक्रिय होतो. तसं तर नामांतराच्या लढ्यात माझं अख्खं कुटुंबच होतं आणि त्यांनी केलेला मोठा संघर्षही मी जवळून पाहत होतो, असं भारतीय दलित पँथरचे नेते संजय जगताप यांनी सांगितलं. 

- स. सो. खंडाळकर

भारतीय दलित पँथरचे संस्थापक अध्यक्ष असलेले संजय जगताप यांनी एकेकाळी औरंगाबादची महापालिका गाजवली आहे. दलित पँथरच्या माध्यमातून विविध प्रश्नांना वाचा फोडणे, त्यासाठी संघर्ष करणे, आंदोलने करणे हा जणू त्यांचा स्थायीभावच बनून गेला आहे. संजय जगताप हे आक्रमक पँथर म्हणून ओळखले जातात.

संजय जगताप हे नामांतराच्या प्रश्नावर बोलत होते आणि ते ऐकून त्यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई जगताप उद्गारल्या, मीबी त्या लढ्यात होतेच की अन् ६ डिसेंबर १९७९ रोजी क्रांतीचौकात लाँगमार्च-सत्याग्रहासाठी आलेल्या कितीतरी कार्यकर्त्यांना मी माझ्या हातची बेसन-भाकरी खाऊ घातली होती. 

माझे वडील दिवंगत उत्तमराव जगताप, आजोबा सदाशिवराव जगताप, हे सारे नामांतराच्या लढ्यात होते. क्रांतीचौकातील सत्याग्रहात माझ्या आई-वडिलांना अटक झाली. त्यांना हर्सूल कारागृहात नेऊन ठेवलं. पुढं माझाही या लढ्यातला सहभाग वाढला. मोर्चा काढला म्हणून पोलिसांनी अटक केली. हर्सूल जेलमध्ये नेऊन दिवसभर ठेवलं गेलं आणि सायंकाळी सोडून देण्यात आलं होतं. या मोर्चात जयभीमनगरचे नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते, अशी एक आठवण जगताप यांनी ताजी केली. नामविस्ताराच्या रौप्यमहोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर ते ‘लोकमत’शी बोलत होते.

त्यांनी सांगितले की, १९९४ साली शरद पवार हे मुख्यमंत्री असताना मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्याचा निर्णय होत होता. हा निर्णय जाहीर झाल्यानंतर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याची काळजी पोलीस यंत्रणा घेत होती. आमच्यासारख्या कार्यकर्त्यांवर जणू पाळतच होती. नामविस्तार झाला आणि आम्ही कार्यकर्ते जयभीमनगरात मिठाई वाटत सुटलो. एवढा आनंद आम्हाला झाला होता.नामविस्तार झाला; पण विद्यापीठाची प्रगती म्हणावी तशी झाली नाही. साऱ्या वादंगांना बाजूला सारून विद्यापीठाची प्रगती महत्त्वाची वाटते. ही प्रगतीच खऱ्या अर्थानं डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवाला आदरांजली ठरणार आहे. या प्रगतीसाठी आता पुन्हा एकदा एकत्रित येऊन विचार करण्याची व प्रसंगी संघर्ष करण्याची गरज असल्याची कळकळही जगताप यांनी व्यक्त केली. 

टॅग्स :Namantar Andolanनामांतर आंदोलनDr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादMarathwadaमराठवाडा