शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
3
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
4
लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
5
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
6
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्याधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
7
VIDEO : अहमदाबाद प्लेन क्रॅशमध्ये मोठा चमत्कार...! विमानाचे धातूही वितळले, पण 'या' धर्मग्रंथाला साधा स्पर्षही करू शकली नाही आग!
8
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
9
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
10
MLC 2025: भारतीय फलंदाजाचा धुमधडाका! चार चेंडूत मारले चार षटकार, केली तुफान फटकेबाजी
11
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
12
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
13
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
14
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
15
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
16
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
17
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
18
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
19
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
20
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार

Namantar Andolan : अंगावर १५० घाव झेलत जनार्दन मवाडे शहीद झाले; पण... : ताईबाई मवाडे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 15:53 IST

लढा नामविस्ताराचा : सुगाव, जि. नांदेड येथील जनार्दन मवाडे हे नामांतर लढ्यातील पहिले शहीद. त्यांच्या पत्नी ताईबाई म्हणतात, हल्लेखोरांपैकी एकानं घर जाळत असताना माझ्याच पदरानं माझं कुंकू पुसलं. घर जळत होतं आणि माझ्या तीन मुलांना जीव मुठीत धरून उतरंडीत लपवून ठेवावं लागलं. हा अंगावर शहारे आणणारा प्रसंग मी कशी विसरू शकेन?

- स. सो. खंडाळकर

४ ऑगस्ट १९७८ चा तो दिवस. अजूनही अंगाचा थरकाप उडतो. ५०० हल्लेखोर आणि माझे पती जनार्दन मवाडे एकटे लढताहेत आणि अंगावर १५० घाव झेलून बाबासाहेबांच्या नावासाठी शहीद होताहेत... हा प्रसंग  किती विसरावं म्हटलं तरी मी विसरू शकत नाही. आठवणींनी कधी डोळे पाणावतात, हेसुद्धा कळत नाही...’ अत्यंत भावनिक होऊन जनार्दन मवाडे यांच्या पत्नी ताईबाई (वय ७०) ‘लोकमत’जवळ आपलं मन मोकळं करून घेत होत्या.

नामविस्ताराच्या रौप्यमहोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर ताईबार्इंनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात नामांतर शहीद स्मारक होईल का? असा सवाल उपस्थित केला आहे. १४ जानेवारी २०१६ रोजी विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. बी.ए. चोपडे यांनी विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र सभागृहात आम्हाला बोलावून आमचा सत्कार केला होता व त्याच  कार्यक्रमात त्यांनी विद्यापीठात नामांतर शहीद स्मारक उभारण्याची घोषणा केली. एवढंच नाही तर त्यासाठी एक कोटीची तरतूद करण्यात येईल, असं सांगितलं होतं.

हे वृत्त त्यावेळी ‘लोकमत’सह इतरही वर्तमानपत्रांनी ठळक छापलं होतं; परंतु आता २०१९ उजाडलं तरी काहीच हालचाल दिसत नाही. याची मला आता चीड येत आहे आणि या मागणीसाठीही संघर्ष करण्याची वेळ यावी, याचं दु:ख होत आहे, असे नमूद करीत ताईबार्इंनी इशारा दिला आहे की, जर लवकर नामांतर शहीद स्मारक झालं नाही, तर मी कुलगुरूंच्या दालनातच बेमुदत उपोषणाला बसणार आहे आणि तिथंच शेवटचा श्वास घेण्याची माझी इच्छा आहे. ज्या विद्यापीठासाठी माझे पती शहीद झाले, त्यांच्यासह अन्य शहिदांचं स्मारक होऊ नये, ही बाब मला लाजिरवाणी वाटते, असे त्या त्वेषाने म्हणाल्या.

शहिदांच्या परिवाराकडे पुढाऱ्यांनीही लक्ष दिले नसल्याची खंत ताईबार्इंनी व्यक्त केली. सुगाव येथे जनार्दन मवाडे यांचं स्मारक व्हावं, अशी माझी इच्छा आहे. त्यामुळं नव्या पिढीला नामांतराचा संघर्ष, त्यातील बलिदान कळू शकेल; पण याकडेही कुणाचं लक्ष नाही याचंही खूप दु:ख वाटतं, असं ताईबाई रागारागातच सांगत होत्या.

टॅग्स :Namantar Andolanनामांतर आंदोलनDr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादMarathwadaमराठवाडा