शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Namantar Andolan : मराठवाडाभर फिरून आपद्ग्रस्तांना मदत देता आली, याचे समाधान : अंकुश भालेकर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 17:02 IST

लढा नामविस्ताराचा : पूर्वी सामंजस्य होते. एकमेकांप्रती माणुसकी होती; पण हळूहळू दुरावा वाढत गेला. काही नेत्यांच्या भाषणांमुळे हा दुरावा वाढत गेला.

- स. सो. खंडाळकर आपद्ग्रस्त दलित साहाय्य समिती स्थापन करून आम्ही त्यावेळी मराठवाडाभर फिरलो. या समितीचे अध्यक्ष बॅ. जवाहर गांधी होते. दिवंगत बापूसाहेब काळदाते व आम्ही असे सारे जण नामांतर प्रश्नावरून जिथे जिथे दंगली उसळल्या होत्या, त्या भागात म्हणजे सुगाव, जळकोट आदी भागांत पोहोचून आपद्ग्रस्त दलित बांधवांना गरजू वस्तू उपलब्ध करून देऊ शकलो, याचे एक समाधान वाटते; पण त्याचवेळी दलित समाजबांधवांची ती दैना पाहून माझे तर डोळे भरून येत असत. रडू कोसळत असे. इथेच माझ्यातील मानवतावाद जागा होत गेला आणि मी दिवसेंदिवस टप्प्याटप्प्याने नामांतरवादी बनत गेलो, असे तत्कालीन नामांतरवादी विद्यार्थी नागरिक कृती समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. अंकुश भालेकर यांनी सांगितले. 

नामविस्तार दिनाच्या रौप्य महोत्सवानिमित्त ते लोकमतशी बोलत होते. अ‍ॅड. अंकुश भालेकर हे मूळचे जालना जिल्ह्यातील अंबडचे. मुंबईत त्यांनी जर्नालिझमचा अभ्यास पूर्ण करून तिथल्या नामांकित इंग्रजी वर्तमानपत्रांमध्ये त्यांनी त्याकाळी पत्रकारिता केली. पुढे ते औरंगाबादला आले. वकिली सुरू केली. औरंगाबादच्या समाजवाद्यांच्या वर्तुळात त्यांची ऊठबस. ‘इगो आणि श्रेयाच्या भांडणात ही समाजवादी मंडळी नामांतरविरोधी बनली. मूलत: ही मंडळी  दलितविरोधी नव्हती, असे मत भालेकर यांनी मांडले.

वडीलबंधूंनी केलेल्या समतेच्या संस्कारातून मी घडत गेलो. म. भि. चिटणीस हे नामांतरवादी कृती समितीचे अध्यक्ष होते. त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे पुढे ही जबाबदारी माझ्यावर येऊन पडली. ६ डिसेंबर १९७९ रोजी क्रांतीचौकात गनिमी काव्याने जो सत्याग्रह झाला. त्यात मी, प्रकाश सिरसाट आणि दिवंगत भीमराव जाधव कार्यरत होतो. बाहेर गावाहून आलेल्या कार्यकर्त्यांची राहण्याची व्यवस्था आम्ही करीत होतो, अशी आठवण सांगत अ‍ॅड. भालेकर म्हणाले, बाबासाहेब भोसले मुख्यमंत्री असताना आम्ही मुंबईत सत्याग्रह केला. आम्हाला ठाण्याच्या कारागृहात ठेवण्यात आले.

यात डॉ. बाबा आढाव, दिवंगत कॉ. शरद पाटील, दिवंगत नरेंद्र दाभोळकर यासारखी मंडळी होती. कारागृहातच बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली आमचे उपोषण सुरू झाले. बाबांना दवाखान्यात भरती करावे लागले. मी चौदा दिवसांपर्यंत उपोषण केले होते. ते संपल्यानंतर एस.एम. जोशी यांच्याकडे दोन दिवस थांबलो. औरंगाबादला परत आलो, तर माझे स्वागत झाले. 

दुसऱ्या दिवशी चक्क अनंत भालेराव भेटीला आलेले. ते जात नाहीत तर काँग्रेसचे नेते दिवंगत बाळासाहेब पवार भेटायला आलेले. आम्ही ठाण्याच्या कारागृहात उपोषण सुरू केल्यानंतर पाठिंबा म्हणून औरंगाबादला भडकलगेटला उपोषण करण्यात आले होते. त्यात माझी पत्नी नंदा भालेकरही सहभागी झाली होती. 

इगो आणि श्रेयाच्या भांडणातूनच नामांतराचा लढा लांबत गेला. शरद पवार नामांतरवादीच होते. शेवटी ते मुख्यमंत्री असताना ते झाले. मोहन देशमुख वगैरे ही मंडळी आधी नामांतरवादीच होती. पूर्वी सामंजस्य होते. एकमेकांप्रती माणुसकी होती; पण हळूहळू दुरावा वाढत गेला. काही नेत्यांच्या भाषणांमुळे हा दुरावा वाढत गेला, असे त्यांनी सांगितले. 

टॅग्स :Namantar Andolanनामांतर आंदोलनDr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादMarathwadaमराठवाडा