शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

नाल्यांची २० वर्षांपासून एकच बोंब!

By admin | Updated: May 4, 2016 01:26 IST

औरंगाबाद : दरवर्षी मान्सूनच्या तोंडावर महापालिकेत नाल्यांचा प्रश्न अचानक गंभीर बनतो. अधिकारीही अत्यंत गांभीर्याने आम्ही

औरंगाबाद : दरवर्षी मान्सूनच्या तोंडावर महापालिकेत नाल्यांचा प्रश्न अचानक गंभीर बनतो. अधिकारीही अत्यंत गांभीर्याने आम्ही डिझास्टर मॅनेजमेंटअंतर्गत कशा पद्धतीने तयारी केली. सखल भागात पाणी शिरणार नाही, याची कशी काळजी घेतली याची माहिती देतात. अधिकारी व पदाधिकारी मिळून शहरातील नाल्यांची पाहणी करतात. वर्तमानपत्रात नाले पाहणीचे फोटो छापून येतात. पावसाळा संपल्यावर नाल्याचा प्रश्न जशास तसाच असतो. मागील २० वर्षांपासून आम्ही हे नाट्य पाहत आहोत. बंद करा हा पोरखेळ, प्रशासनाने ठोस असा कार्यक्रम हाती घ्यावा, अशा शब्दांत मनपा पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले.मंगळवारी महापौर त्र्यंबक तुपे यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीच्या सभागृहात मान्सूनपूर्व तयारीचा आढावा घेण्यात आला. यावेळी उपमहापौर प्रमोद राठोड, सभागृहनेता राजेंद्र जंजाळ, काळजीवाहू सभापती दिलीप थोरात, सभापती स्मिता घोगरे, भारती सोनवणे, नितीन साळवी, बबिता चावरिया, नगरसेवक गोकुळ मलके, शहर अभियंता एस.डी. पानझडे यांच्यासह वॉर्ड अधिकारी उपस्थित होते. बैठकीत नगरसेवकांनी शहरातील प्रमुख नाल्यांवरून प्रशासनावर जोरदार हल्लाबोल केला. दर्शनी भागात साफसफाई करण्यात येते. नाल्यातील गाळ काठावर तसाच ठेवण्यात येतो. पाण्याचा मोठा प्रवाह आल्यावर हा गाळ आपोआप वाहून जातो. नाले सफाईवर दरवर्षी कोट्यवधी रुपये कशासाठी खर्च करायचे. नाल्यातील अतिक्रमणे आजपर्यंत का काढण्यात आली नाहीत. वॉर्ड अधिकारी, इमारत निरीक्षक नाल्यांमध्ये अनधिकृत बांधकामे कशी काय होऊ देतात, अशी एक नाही अनेक प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली.शहर अभियंता पानझडे यांनी नमूद केले की, यंदाही मनपातर्फेच नालेसफाई करण्यात येणार आहे. नाल्यातील गाळ काढून टाकायचा कुठे, हा मोठा प्रश्न आहे. सोयीची जागा पाहून हा गाळ तेथे नेऊन टाकण्यात येईल. औषधी भवन येथे परिस्थिती खूपच गंभीर आहे. या इमारतीचा काही भाग तोडून पाण्याला नैसर्गिक प्रवाह मिळवून द्यावा लागेल. मोठे नाले साफ करताना लहान नाल्यांकडे दुर्लक्ष होते. यंदा लहान नाले, वॉर्डातील मोठ्या नाल्याही शॉर्ट टेंडर काढून साफ करण्यात येणार आहेत. अग्निशमन विभागाने शहरातील शाळा, मंगल कार्यालये आदींची यादी तयार केली आहे. १ जूनपासून मनपात आपत्कालीन कक्षही उघडण्यात येणार आहे. या उत्तरावर पदाधिकाऱ्यांचे अजिबात समाधान झाले नाही. सर्वसामान्य नागरिक डोळ्यासमोर ठेवून काम करा, असे आदेश महापौरांनी दिले.पावसाळ्यात झाडे पडतातदरवर्षी वादळी वारा, पाऊस सुरू झाल्यावर शहरात ठिकठिकाणी झाडे कोसळतात. मागील वर्षी गरोदर महिलेच्या अंगावर एक झाड पडले होते. शहरातील धोकादायक झाडे शोधून ती त्वरित काढून घ्यावीत. झाडांची तोडणी मनपातर्फे करण्यात येईल. त्याचप्रमाणे उघड्या डी.पीं.मुळे अनेक जण यापूर्वी मरण पावले आहेत. त्यामुळे मनपाच्या पथदिव्यांचीही पाहणी करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. मनपाच्या अतिक्रमण हटाव पथकातर्फे सध्या सुपारी घेऊन काम सुरू आहे. तक्रार दिल्यानंतर सहा-सहा महिने कारवाई होत नाही. मागील २० वर्षांमध्ये मनपाच्या अतिक्रमण हटाव पथकाला नाल्यांमधील अतिक्रमणे दिसली नाहीत का, असा प्रश्न राजेंद्र जंजाळ यांनी उपस्थित केला. औषधी भवनचा प्रश्न, नाल्यांमध्ये ड्रेनेजलाईन टाकणे अवघड आहे, मग अतिक्रमण हटाव पथक काय काम करते. नाला रुंदीकरण मोहीम आजपर्यंत का हाती घेण्यात आली नाही. यापुढे दोषींवर कारवाई न झाल्यास आपण स्वत:हून फौजदारी कारवाई करू, असा इशाराही त्यांनी दिला.