शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

नगरपंचायत, परिषद स्थापनेला ग्रहण

By admin | Updated: May 27, 2014 01:22 IST

सुनील कच्छवे , औरंगाबाद मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या आचारसंहितेमुळे जिल्ह्यातील दोन नगरपंचायत आणि एक नगर परिषद स्थापनेची कार्यवाही पुन्हा एकदा रखडली आहे.

सुनील कच्छवे , औरंगाबाद मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या आचारसंहितेमुळे जिल्ह्यातील दोन नगरपंचायत आणि एक नगर परिषद स्थापनेची कार्यवाही पुन्हा एकदा रखडली आहे. सातारा-देवळाई नगर परिषद स्थापनेची प्रक्रिया तिसर्‍यांदा, तर फुलंब्री आणि सोयगाव या दोन नगरपंचायतींच्या स्थापनेची प्रक्रिया दुसर्‍यांदा आचारसंहितेत अडकली आहे. त्यामुळे ही प्रक्रिया सुरू होण्यासाठी आता किमान महिनाभर थांबावे लागणार आहे. औरंगाबादजवळील सातारा आणि देवळाई या दोन्ही गावांसाठी संयुक्त नगर परिषद स्थापन करण्याचा निर्णय नगर परिषद प्रशासन विभागाने गतवर्षीच घेतलेला आहे. तसेच फेबु्रवारी-२०१४ मध्ये राज्य सरकारने सोयगाव आणि फुलंब्री या तालुक्यांच्या ठिकाणी नगरपंचायत स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, दोन नगरपंचायत आणि एक नगर परिषद स्थापन करण्याच्या प्रक्रियेत सातत्याने आचारसंहितेचा अडथळा येत अहे. आचारसंहिता संपल्यानंतर जिल्हा प्रशासनाने संयुक्त नगर परिषदेचा प्रस्ताव पाठविला. त्यानंतर फेबु्रवारी-२०१४ मध्ये संबंधीची अधिसूचना जारी होऊन नागरिकांकडून आक्षेप मागविण्यात आले. त्यानंतर पुन्हा लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली. लोकसभेची आचारसंहिता संपल्यानंतर आक्षेपांवर सुनावणी होऊन नगर परिषदेची स्थापना होणे अपेक्षित होते; पण पुन्हा पदवीधर मतदारसंघाची आचारसंहिता लागू झाली. सोयगाव आणि फुलंब्री या दोन नवीन नगरपंचायतींनाही आचारसंहितेचा फटका बसला आहे. आधी लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ही प्रक्रिया रखडलेली होती. पदवीधर मतदारसंघाची आचारसंहिता २७ जूनपर्यंत लागू असणार आहे. तोपर्यंत वरील पुढील कारवाई करता येणार नसल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकार्‍यांनी सांगितले. आक्षेप आणि हरकती मागविणार आचारसंहिता संपताच सोयगाव आणि फुलंब्री येथे नवीन नगरपंचायती स्थापन करण्यासंदर्भात नागरिकांकडून आक्षेप आणि हरकती मागविण्यात येतील. नागरिकांकडून हरकती आणि सूचना प्राप्त झाल्यानंतर त्यावर जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी घेण्यात येईल. सुनावणीनंतर सरकारला अहवाल सादर करून नगरपंचायत स्थापनेची अधिसूचना जारी होईल, असे सूत्रांनी सांगितले. राज्याच्या नगर परिषद प्रशासन खात्याने सुरुवातीला जुलै २०१३ मध्ये सातारा ग्रामपंचायतीचे नगर परिषदेत रूपांतर करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर देवळाई येथील गावकर्‍यांनी सातारा आणि देवळाई या दोन्ही गावांची संयुक्त नगर परिषद स्थापन करण्याची मागणी लावून धरली. मागणी लक्षात घेऊन नगरविकास राज्यमंत्री उदय सामंत यांनी संयुक्त नगर परिषदेचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले. मात्र, लगेच औरंगाबाद- जालना स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक जाहीर झाल्याने ही प्रक्रिया रखडली.