शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

नागापूरला अशुद्ध पाणीपुरवठा !

By admin | Updated: July 14, 2014 00:59 IST

परळी: परळी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नागापूर धरणाखालील नागापुरातच अर्धवट नळ योजनेमुळे पाण्याची समस्या उद्भवत आहे

परळी: परळी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नागापूर धरणाखालील नागापुरातच अर्धवट नळ योजनेमुळे पाण्याची समस्या उद्भवत आहे तर गावात येणारे पाणी अशुद्ध येत असल्याने नागापूरकरांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.नागापूर या गावची लोकसंख्या ८ हजार असून ८०० घरे आहेत. गावाशेजारीच नागापूर धरण आहे. या धरणातून परळी शहराला नळ योजनेद्वारे पाणीपुरवठा केला जातो. या नागापूर धरणाशेजारी राहणाऱ्या ८ हजार लोकांना मात्र शुद्ध पाण्यापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. ६० वर्षांपूर्वीचीच पाणीपुरवठा अर्ध्या गावात आहे. त्यामुळे कमी दाबाने पाणीपुरवठा होतो, तर धनगरवस्ती, नागापूर कॅम्प या भागातील लोकांच्या घशाला कोरड असल्याची तक्रार या भागातील नागरिकांची आहे. तर गावात शुद्ध पाणीपुरवठा होत नाही, जुन्या पद्धतीनेच रेतीचा वापर करुन शुद्ध पाणीपुरवठा अर्ध्या नागापूरला केला जातो आहे.जलशुद्धीकरण रेंगाळलेजलस्वराज्य योजनेचे काम मागील १० वर्षांपासून अर्धवट आहे. येथील जलस्वराज्य योजना समिती वादग्रस्त झाली होती. त्यामुळे हे काम रेंगाळलेलेच आहे. या धरणातून नागापूरसाठी जलशुद्धीकरण प्रकल्प व्हावा, अशी मागणी तत्कालीन सरपंच मोहन सोळंके यांनी केली आहे. नागापूरच्या नदीपात्रातून पाण्याच्या जुन्या टाकीत होणारा पाणीपुरवठा हा अशुद्ध आहे. याऐवजी धरणातील न.प.च्या जलशुद्धीकरण प्रकल्पातून नागापूरच्या टाकीत पाणी सोडावे, अशी मागणी सोळंके यांनी केली.शुद्ध पाणीपुरवठा करण्याची मागणीनागापुरातील जलस्वराज्य योजनेचे अर्धवट काम पूर्ण करावेवाढीव पाणीपुरवठा योजना सुरू करावीनागापूरकरांना शुद्ध पाणीपुरवठा करावा, अशी मागणी भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रभूअप्पा तोंडारे यांनी केली आहे.