शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

माझा टर्निंग पॉइंट...‘शासकीय विद्यानिकेतन’मुळेच मिळाली आयुष्याला कलाटणी

By विजय सरवदे | Updated: February 15, 2024 14:40 IST

शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षेत गुणवत्तायादीत आलो आणि कधीही मोठे शहर न पाहिलेला मी छत्रपती संभाजीनगर शहरात या निवासी शाळेत दाखल झालो.

कंधार तालुक्यात काकांकडे चौथीला शिकत असताना शिष्यवृत्ती परीक्षेसोबतच ‘शासकीय विद्यानिकेतन’ प्रवेश परीक्षाही दिली. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या मराठवाड्यातील ३० मुलांमध्ये माझा १३ वा क्रमांक आला. त्यामुळे मला छत्रपती संभाजीनगर येथे शासकीय विद्यानिकेतनमध्ये (गव्हर्नमेंट पब्लिक स्कूल) पाचवीला प्रवेश मिळाला. या निवासी शाळेत अतिशय दर्जेदार शिक्षण मिळाले. या ठिकाणी शिकत असतानाच मला सामाजिक भान आले आणि खऱ्या अर्थाने हाच माझ्या आयुष्याचा ‘टर्निंग पॉइंट’ ठरला, अशी प्रांजळ कबुली ‘डीआरडीए’ चे प्रकल्प संचालक अशोक सिरसे यांनी दिली.

मजुरी करणाऱ्या कुटुंबात जन्म झालेला मी. आमची आर्थिक परिस्थिती बेताचीच होती. बिलोली तालुक्यात मला आजीने पहिलीला शाळेत घातले. त्यानंतर तिसरी आणि चौथीच्या शिक्षणासाठी मला काकांनी कंधारला नेले. तिथे शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षेत गुणवत्तायादीत आलो आणि कधीही मोठे शहर न पाहिलेला मी छत्रपती संभाजीनगर शहरात या निवासी शाळेत दाखल झालो. या शाळेत शिक्षण, भोजन, ड्रेस, शालेय साहित्य, सुंदर लायब्ररी, खेळ अशी सर्व व्यवस्था उच्च दर्जाची होती. पुढे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले. एक-दीड वर्षे खासगी कंपनीत नोकरी केल्यानंतर ‘एमएसईबी’मध्ये निर्मिती विभागात नोकरी मिळाली. तिथे साडेनऊ वर्षे नोकरी केली. परळी, नाशिक, भुसावळ येथे नोकरी केली व त्याचवेळी ‘एमपीएससी’विषयी माहिती मिळाली. ही स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर ‘महाराष्ट्र विकास सेवा’ यासाठी माझी निवड झाली.

गटविकास अधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदावर परभणी, रेणापूर, पाथ्री, यवतमाळ, हिंगोली, बीड येथे काम केले. त्यानंतर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारीपदी पदोन्नती मिळाल्यामुळे जि.प. चंद्रपूर व छत्रपती संभाजीनगर येथे काम केले. येथे नोकरीवर असतानाच सन २०२० मध्ये मंत्री संदीपान भुमरे यांच्याकडे खासगी सचिव म्हणून जून २०२२ पर्यंत काम केले. त्यानंतर मुंबई येथे पर्यटन सहसंचालक पदावर काम केले. अलीकडे जुलै २०२३ पासून येथे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा येथे प्रकल्प संचालक म्हणून कार्यरत आहे. जर शिक्षणासाठी शासकीय विद्यानिकेतनमध्ये प्रवेश मिळाला नसता, तर मला पुढील शिक्षण घेताही आले नसते. तिकडेच एखाद्या खेड्यात मी राहिलो असतो. समाजाशी आपले काही देणे असते, याची उतराई मला करता आली नसती.

( शब्दांकन : विजय सरवदे) 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादState Governmentराज्य सरकार