शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
2
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
3
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
4
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
5
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
6
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
7
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
8
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
9
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
10
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
11
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
12
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
13
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
14
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
15
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
16
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!
17
Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
18
ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव मतदार यादीतून हटवता येते का? निवडणूक आयोग म्हणाले...
19
११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!
20
Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना

माझा टर्निंग पॉइंट...‘शासकीय विद्यानिकेतन’मुळेच मिळाली आयुष्याला कलाटणी

By विजय सरवदे | Updated: February 15, 2024 14:40 IST

शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षेत गुणवत्तायादीत आलो आणि कधीही मोठे शहर न पाहिलेला मी छत्रपती संभाजीनगर शहरात या निवासी शाळेत दाखल झालो.

कंधार तालुक्यात काकांकडे चौथीला शिकत असताना शिष्यवृत्ती परीक्षेसोबतच ‘शासकीय विद्यानिकेतन’ प्रवेश परीक्षाही दिली. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या मराठवाड्यातील ३० मुलांमध्ये माझा १३ वा क्रमांक आला. त्यामुळे मला छत्रपती संभाजीनगर येथे शासकीय विद्यानिकेतनमध्ये (गव्हर्नमेंट पब्लिक स्कूल) पाचवीला प्रवेश मिळाला. या निवासी शाळेत अतिशय दर्जेदार शिक्षण मिळाले. या ठिकाणी शिकत असतानाच मला सामाजिक भान आले आणि खऱ्या अर्थाने हाच माझ्या आयुष्याचा ‘टर्निंग पॉइंट’ ठरला, अशी प्रांजळ कबुली ‘डीआरडीए’ चे प्रकल्प संचालक अशोक सिरसे यांनी दिली.

मजुरी करणाऱ्या कुटुंबात जन्म झालेला मी. आमची आर्थिक परिस्थिती बेताचीच होती. बिलोली तालुक्यात मला आजीने पहिलीला शाळेत घातले. त्यानंतर तिसरी आणि चौथीच्या शिक्षणासाठी मला काकांनी कंधारला नेले. तिथे शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षेत गुणवत्तायादीत आलो आणि कधीही मोठे शहर न पाहिलेला मी छत्रपती संभाजीनगर शहरात या निवासी शाळेत दाखल झालो. या शाळेत शिक्षण, भोजन, ड्रेस, शालेय साहित्य, सुंदर लायब्ररी, खेळ अशी सर्व व्यवस्था उच्च दर्जाची होती. पुढे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले. एक-दीड वर्षे खासगी कंपनीत नोकरी केल्यानंतर ‘एमएसईबी’मध्ये निर्मिती विभागात नोकरी मिळाली. तिथे साडेनऊ वर्षे नोकरी केली. परळी, नाशिक, भुसावळ येथे नोकरी केली व त्याचवेळी ‘एमपीएससी’विषयी माहिती मिळाली. ही स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर ‘महाराष्ट्र विकास सेवा’ यासाठी माझी निवड झाली.

गटविकास अधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदावर परभणी, रेणापूर, पाथ्री, यवतमाळ, हिंगोली, बीड येथे काम केले. त्यानंतर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारीपदी पदोन्नती मिळाल्यामुळे जि.प. चंद्रपूर व छत्रपती संभाजीनगर येथे काम केले. येथे नोकरीवर असतानाच सन २०२० मध्ये मंत्री संदीपान भुमरे यांच्याकडे खासगी सचिव म्हणून जून २०२२ पर्यंत काम केले. त्यानंतर मुंबई येथे पर्यटन सहसंचालक पदावर काम केले. अलीकडे जुलै २०२३ पासून येथे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा येथे प्रकल्प संचालक म्हणून कार्यरत आहे. जर शिक्षणासाठी शासकीय विद्यानिकेतनमध्ये प्रवेश मिळाला नसता, तर मला पुढील शिक्षण घेताही आले नसते. तिकडेच एखाद्या खेड्यात मी राहिलो असतो. समाजाशी आपले काही देणे असते, याची उतराई मला करता आली नसती.

( शब्दांकन : विजय सरवदे) 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादState Governmentराज्य सरकार