शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

माझा टर्निंग पॉइंट...‘शासकीय विद्यानिकेतन’मुळेच मिळाली आयुष्याला कलाटणी

By विजय सरवदे | Updated: February 15, 2024 14:40 IST

शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षेत गुणवत्तायादीत आलो आणि कधीही मोठे शहर न पाहिलेला मी छत्रपती संभाजीनगर शहरात या निवासी शाळेत दाखल झालो.

कंधार तालुक्यात काकांकडे चौथीला शिकत असताना शिष्यवृत्ती परीक्षेसोबतच ‘शासकीय विद्यानिकेतन’ प्रवेश परीक्षाही दिली. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या मराठवाड्यातील ३० मुलांमध्ये माझा १३ वा क्रमांक आला. त्यामुळे मला छत्रपती संभाजीनगर येथे शासकीय विद्यानिकेतनमध्ये (गव्हर्नमेंट पब्लिक स्कूल) पाचवीला प्रवेश मिळाला. या निवासी शाळेत अतिशय दर्जेदार शिक्षण मिळाले. या ठिकाणी शिकत असतानाच मला सामाजिक भान आले आणि खऱ्या अर्थाने हाच माझ्या आयुष्याचा ‘टर्निंग पॉइंट’ ठरला, अशी प्रांजळ कबुली ‘डीआरडीए’ चे प्रकल्प संचालक अशोक सिरसे यांनी दिली.

मजुरी करणाऱ्या कुटुंबात जन्म झालेला मी. आमची आर्थिक परिस्थिती बेताचीच होती. बिलोली तालुक्यात मला आजीने पहिलीला शाळेत घातले. त्यानंतर तिसरी आणि चौथीच्या शिक्षणासाठी मला काकांनी कंधारला नेले. तिथे शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षेत गुणवत्तायादीत आलो आणि कधीही मोठे शहर न पाहिलेला मी छत्रपती संभाजीनगर शहरात या निवासी शाळेत दाखल झालो. या शाळेत शिक्षण, भोजन, ड्रेस, शालेय साहित्य, सुंदर लायब्ररी, खेळ अशी सर्व व्यवस्था उच्च दर्जाची होती. पुढे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले. एक-दीड वर्षे खासगी कंपनीत नोकरी केल्यानंतर ‘एमएसईबी’मध्ये निर्मिती विभागात नोकरी मिळाली. तिथे साडेनऊ वर्षे नोकरी केली. परळी, नाशिक, भुसावळ येथे नोकरी केली व त्याचवेळी ‘एमपीएससी’विषयी माहिती मिळाली. ही स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर ‘महाराष्ट्र विकास सेवा’ यासाठी माझी निवड झाली.

गटविकास अधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदावर परभणी, रेणापूर, पाथ्री, यवतमाळ, हिंगोली, बीड येथे काम केले. त्यानंतर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारीपदी पदोन्नती मिळाल्यामुळे जि.प. चंद्रपूर व छत्रपती संभाजीनगर येथे काम केले. येथे नोकरीवर असतानाच सन २०२० मध्ये मंत्री संदीपान भुमरे यांच्याकडे खासगी सचिव म्हणून जून २०२२ पर्यंत काम केले. त्यानंतर मुंबई येथे पर्यटन सहसंचालक पदावर काम केले. अलीकडे जुलै २०२३ पासून येथे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा येथे प्रकल्प संचालक म्हणून कार्यरत आहे. जर शिक्षणासाठी शासकीय विद्यानिकेतनमध्ये प्रवेश मिळाला नसता, तर मला पुढील शिक्षण घेताही आले नसते. तिकडेच एखाद्या खेड्यात मी राहिलो असतो. समाजाशी आपले काही देणे असते, याची उतराई मला करता आली नसती.

( शब्दांकन : विजय सरवदे) 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादState Governmentराज्य सरकार