शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Maharashtra Nagar Palika Election Result: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
3
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
4
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
5
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
6
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
7
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
8
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
9
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
10
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
11
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
12
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
13
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
14
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
15
Maharashtra Nagar Palika Election Result: अमरावतीत १२ पैकी ४ निकाल हाती, बच्चू कडूंच्या 'प्रहार', भाजपचं काय झालं?
16
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
17
धोक्याची घंटा! डिजिटल युगाचा 'सायलेंट किलर'; १८ हजार वृद्ध विसरले घरचा पत्ता, ५०० जणांचा मृत्यू
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
19
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
Daily Top 2Weekly Top 5

माझा शिवसैनिक शेतकऱ्यांसोबत

By admin | Updated: June 30, 2017 00:04 IST

जालना :माझा शिवसैनिक शेतकऱ्यांसोबतच असून, शेतकऱ्यांनी आंदोलनाची वज्रमूठ तशीच ठेवावी, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी येथे केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : राज्य शासनाने कर्जमाफीचा निर्णय जाहीर केला असला तरी प्रत्यक्ष कर्जमाफी पदरात पडत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांनी एकजूट ठेवावी. माझा शिवसैनिक शेतकऱ्यांसोबतच असून, शेतकऱ्यांनी आंदोलनाची वज्रमूठ तशीच ठेवावी, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी येथे केले. राज्य शासनाने कर्जमुक्तीचा निर्णय जाहीर केल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जिल्ह्यातील मंठा, जालना आणि बदनापूर येथील शेतकऱ्यांशी संवाद साधला. जालना तालुक्यातील रामनगर येथील साखर कारखाना परिसरात आयोजित जाहीर सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. व्यासपीठावर परिवहन मंत्री दिवाकर रावते, पर्यावरण मंत्री रामदास कदम, राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, नेते डॉ. हिकमतराव उढाण, जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, ए.जे. बोराडे, शहरप्रमुख विष्णू पाचफुले, बाला परदेशी यांच्यासह प्रातिनिधीक शेतकरी उपस्थित होेते. उद्धव ठाकरे म्हणाले की, शेतकऱ्यांच्या मन की बात आपल्याला कळते. पण देश चालवणाऱ्यांना कळत नाही. हे दुर्दैव आहे. शेतकऱ्यांसाठी शिवसेनेने लढा उभारला असून, कर्जमाफीची पूर्तता होत नाही तोपर्यंत लढा सुरुच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रास्ताविकात राज्यमंत्री खोतकर यांनी शेतकऱ्यांसाठी शिवसेनेने केलेल्या लढ्याचा उल्लेख करुन राज्य शासन कर्जमाफीचा निर्णय घेण्यास अनुकूल नव्हते. मात्र, शिवसेनेने शेतकऱ्यांची बाजू लावून धरल्याने राज्य सरकारला हा निर्णय घेणे भाग पडले. मध्यप्रदेशातील शेतकऱ्यांचे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न झाला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असते तर आंदोलनाला यश आले असते, अशी भावना त्या भागातील शेतकऱ्यांनी मांडल्याचे राज्यमंत्री खोतकर म्हणाले. याप्रसंगी माजी आ. संतोष सांबरे, सहसंपर्क प्रमुख शिवाजी चोथे, भानुदास घुगे, युवा सेनेचे जगन्नाथ काकडे, भाऊसाहेब घुगे, बाबासाहेब इंगळे, भाऊसाहेब पाऊलबुद्धे, हरीहर शिंदे, मनीष श्रीवास्तव, तुकाराम शेजूळ, पांडुरंग डोंगरे, मुरलीधर थेटे, शिवाजी शेजूळ, महिला आघाडीच्या सविता किवंडे, दलित आघाडीचे अ‍ॅड. भास्कर मगरे, हरिभाऊ पोहेकर, जयप्रकाश चव्हाण, बबनराव खरात, सुधाकर निकाळजे, दादाराव लहाने यांच्यासह पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.