शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

"शिवसेनेशी माझे संबंध संपले"; हर्षवर्धन जाधव यांचा पक्षाला जय महाराष्ट्र 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 12:25 IST

शिवसेनेचे कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केल्याचे मंगळवारी जाहीर केले. 

ठळक मुद्देमहाराष्ट्रात आतापर्यंतच्या राजकारणामुळे सामाजिक विषमता तयार झाली आहे.नवीन पक्ष स्थापन करण्याची घोषणा करून महिनाभरात पक्ष नोंदणी होईल

औरंगाबाद : मी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे दिला आहे. काही दिवसांत नवीन पक्ष काढतोय, त्यामुळे आता माझा शिवसेनेशी काहीही संबंध राहिलेला नाही. पक्ष माझ्यावर कारवाई करणार किंवा काय निर्णय घेणार, हा प्रश्नच नाही, असे सांगून शिवसेनेचे कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केल्याचे मंगळवारी जाहीर केले. 

महाराष्ट्रात आतापर्यंतच्या राजकारणामुळे सामाजिक विषमता तयार झाली आहे. ती विषमता मिटविण्यासाठी नवीन राजकीय पक्ष स्थापन करावा काय, याचे चिंतन करण्यासाठी मी तापडिया नाट्य मंदिरात चिंतन बैठक बोलावली होती. बैठकीत अठरा पगड जातींच्या प्रतिनिधींनी मते मांडली. त्यानंतर नवीन पक्ष स्थापन करण्याची घोषणा करून महिनाभरात पक्ष नोंदणी होईल, दोन ते चार दिवसांत पक्षाचे नाव जाहीर करणार असल्याचे जाधव यांनी सांगितले. 

आ. जाधव म्हणाले, न्हावी, माळी, कोळी, धनगर, दलित, राजपूत, ठाकूर, वंजारी, मुस्लिम या प्रत्येक समाजाला त्रास होतो आहे. उत्तम पर्याय म्हणून नवीन राजकीय पक्ष स्थापन करण्याचे सर्वांनी सुचविले आहे. मराठा समाजासाठी पक्ष स्थापन करण्याबाबत मी बोललो होतो; परंतु कालांतराने मला समजले की, मराठा समाज आणि इतर समाजांचे देखील सारखेच प्रश्न आहेत. मला सर्वंकष जाणीव झाली की, राज्य सरकारने सर्व समाजांसमोर प्रश्न निर्माण करून ठेवले आहेत. त्यामुळे सर्वांना सोबत घेऊन पक्ष काढण्याचे ठरविले. धुळे, नंदुरबार येथील जि.प. निवडणूक पक्ष लढणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

मराठा आरक्षणाबाबत न बोलण्याच्या सूचनाशिवसेनेचे आमदार असल्यामुळे पक्षाकडून दबाव येऊ शकतो, यावर आ. जाधव म्हणाले, शिवसेनेने जी काही धोरणे घेतली आहेत, ती पटलेली नाहीत. मराठा आरक्षणावर बोलायचे नाही, अशी सूचना करण्यात आली. ते मला थोडेसे पचले नाही. इतर काही धोरणे आहेत तीदेखील पटलेली नाहीत. त्यामुळे त्यांच्याबरोबर आता थांबायचे नाही, असे ठरविले. 

बॅकफूटवर जाणार नाहीमाझ्या वतीने शिवसेनेशी काही संबंध राहिलेला नसल्यामुळे मी बॅकफूटवर जाणार नाही. माझे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत व्यक्तिगत चांगले संबंध आहेत, ते आगामी काळातही राहतील. सरकारने मराठा आरक्षण दिले तरी मी राजीनामा परत घेणार नाही, धनगर आणि मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावे हीदेखील माझी मागणी आहे. 

बायको म्हणाली रिकामा धंदा...बायकोची (संजना जाधव) व्यथा समजत आहे. सासरे भाजपचे नेते आहेत. बायको सांगून थकली की, पक्ष काढण्याचा रिकामा धंदा करू नका. शेवटी वैतागून म्हणाली, ठीक आहे. जसे करायचे तसे करा. मी प्लास्टिकचा बॉल आहे. कुठेही बुडवा वर येणारच, त्यामुळे मला बुडविण्याचा कुणीही प्रयत्न करू नये. शिवसेनाप्रमुखांना ४० वर्षे लागले पक्षाचा मुख्यमंत्री बनविण्यासाठी. त्यांचं जमलं, आज ना उद्या आपलंही जमेल. पक्षाला पैसे नव्हे तर माणसे लागतात. हिंदुत्व खतरे में म्हणून ‘गध्याला’ मतदान करा हे कुणी सांगितले. मुस्लिमांची भीती दाखविण्याचे किडे डोक्यात कुणी घातले, असा सवालही आ. जाधव यांनी यावेळी केला. 

टॅग्स :Harshavardhan Jadhavहर्षवर्धन जाधवPoliticsराजकारणShiv Senaशिवसेना