शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

मुरारीनगरात घरफोडी

By admin | Updated: May 12, 2015 00:48 IST

जालना : शहरातील कॉलेजरोडवरील मुरारीनगरात व्यापाऱ्याचे घर फोडून चोरट्यांनी लाखोचा ऐवज लंपास केला. मात्र पोलिसात ५० हजाराचा ऐवज लंपास केल्याची नोंद करण्यात आली आहे.

जालना : शहरातील कॉलेजरोडवरील मुरारीनगरात व्यापाऱ्याचे घर फोडून चोरट्यांनी लाखोचा ऐवज लंपास केला. मात्र पोलिसात ५० हजाराचा ऐवज लंपास केल्याची नोंद करण्यात आली आहे.कापड व्यापारी विशाल बन्सीलाल टेकवानी हे आपल्या मुरारी नगराजवळील घरात झोपलेले असताना रविवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे चेनल गेट तोडून पाठीमागील घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. बेडरूममधील दोन कपाट तोडून त्यातील रोख रक्कम व सोन्याचांदीचे दागिने असा मोठा ऐवज लंपास केला. टेकवानी यांनी ९ तोळे सोने व दीड लाख रुपये रोख असा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याचे लोकमतशी बोलताना सांगितले. दरम्यान सदर बाजार पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत मात्र ५० हजाराचा ऐवज लंपास केल्याचे नमुद करण्यात आले. त्यावरून अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी सदर बाजार पोलिस ठाण्याचे सपोनि शितलकुमार बल्लाळ , उपनिरिक्षक डावखरे यांनी भेट देवून पंचनामा केला. तसेच श्वान पथकासही पाचारण करण्यात आले होते. मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. घरफोडीत चोरट्यांनी शंभर, पाचशे, हजार रूपयांच्या नोटांचे बंडल चोरून नेले. मात्र एक रूपया, दोन रूपयाची बंडले तशीच सोडली.सदर बाजार पोलिस ठाण्याचा दुरध्वनी रिसिव्हर बाजूला ठेवण्यात आला होता.या संदर्भात सदर प्रतिनिधीने ठाणे अमलंदार दिवटे यांना विचारले असता ते म्हणाले की, ११ हजाराचे बिल थकल्याने दुरध्वनी विभागाने सेवा खंडीत केली असल्याचे सांगितले. दरम्यान रात्री ९ वाजेच्या सुमारास ठाण्याचा दुरध्वनी लावला असता तो चालु होता. त्यावेळी ठाणे अमंलदार मतकर यांनी हा फोन उचलला होता. दरम्यान ठाण्याच्या हद्दीत अशा चोऱ्या, घरफोड्या, जातीय दंगली सारखे गंभीर गुन्हे घडत असताना ठाने अमंलदारांकडून फोन बाजूला ठेवण्याचे प्रकार सर्वच पोलिस ठाण्यात होत आहे.४नवीन जालना भागात मोठी व्यापारपेठ आहे. मात्र ठाण्याचा दुरध्वनीच बंद असल्याने रात्री अपरात्री अशा चोऱ्यांच्या घटना घडत आहे. त्यामुळे पोलिसांना संपर्क साधावा कसा असा प्रश्न पडत आहे. केवळ ११ हजार रूपयाचे बिल थकल्याने सेवा खंडित करण्यात आल्याचे ठाणे अमलंदार दिवटे यांनी सांगितले.