शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ठाकरे बंधूंचा 'विजयी मेळावा'! उद्धव आणि राज सभास्थळी दाखल
2
मराठीचा विजयी मेळावा, ठाकरे बंधू येणार एकत्र, ऐतिहासिक सभेला सुप्रिया सुळेसुद्धा राहणार उपस्थित
3
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
4
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
5
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
6
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
7
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
8
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
9
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
10
Ashadhi Ekadashi 2025 Wishes: आषाढी एकादशीच्या मराठी शुभेच्छा, Messages आणि भक्तिपूर्ण Greetings पाठवा आपल्या प्रियजनांना!
11
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
12
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
13
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे
14
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
15
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू
16
भूखंड घोटाळा : एक अधिकारी निलंबित, ८ जणांची चौकशी; मालेगाव येथील प्रकार; दोघा स्टॅम्प व्हेंडरवरही फौजदारी कारवाई
17
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
18
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
19
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
20
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?

मुरारीनगरात घरफोडी

By admin | Updated: May 12, 2015 00:48 IST

जालना : शहरातील कॉलेजरोडवरील मुरारीनगरात व्यापाऱ्याचे घर फोडून चोरट्यांनी लाखोचा ऐवज लंपास केला. मात्र पोलिसात ५० हजाराचा ऐवज लंपास केल्याची नोंद करण्यात आली आहे.

जालना : शहरातील कॉलेजरोडवरील मुरारीनगरात व्यापाऱ्याचे घर फोडून चोरट्यांनी लाखोचा ऐवज लंपास केला. मात्र पोलिसात ५० हजाराचा ऐवज लंपास केल्याची नोंद करण्यात आली आहे.कापड व्यापारी विशाल बन्सीलाल टेकवानी हे आपल्या मुरारी नगराजवळील घरात झोपलेले असताना रविवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे चेनल गेट तोडून पाठीमागील घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. बेडरूममधील दोन कपाट तोडून त्यातील रोख रक्कम व सोन्याचांदीचे दागिने असा मोठा ऐवज लंपास केला. टेकवानी यांनी ९ तोळे सोने व दीड लाख रुपये रोख असा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याचे लोकमतशी बोलताना सांगितले. दरम्यान सदर बाजार पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत मात्र ५० हजाराचा ऐवज लंपास केल्याचे नमुद करण्यात आले. त्यावरून अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी सदर बाजार पोलिस ठाण्याचे सपोनि शितलकुमार बल्लाळ , उपनिरिक्षक डावखरे यांनी भेट देवून पंचनामा केला. तसेच श्वान पथकासही पाचारण करण्यात आले होते. मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. घरफोडीत चोरट्यांनी शंभर, पाचशे, हजार रूपयांच्या नोटांचे बंडल चोरून नेले. मात्र एक रूपया, दोन रूपयाची बंडले तशीच सोडली.सदर बाजार पोलिस ठाण्याचा दुरध्वनी रिसिव्हर बाजूला ठेवण्यात आला होता.या संदर्भात सदर प्रतिनिधीने ठाणे अमलंदार दिवटे यांना विचारले असता ते म्हणाले की, ११ हजाराचे बिल थकल्याने दुरध्वनी विभागाने सेवा खंडीत केली असल्याचे सांगितले. दरम्यान रात्री ९ वाजेच्या सुमारास ठाण्याचा दुरध्वनी लावला असता तो चालु होता. त्यावेळी ठाणे अमंलदार मतकर यांनी हा फोन उचलला होता. दरम्यान ठाण्याच्या हद्दीत अशा चोऱ्या, घरफोड्या, जातीय दंगली सारखे गंभीर गुन्हे घडत असताना ठाने अमंलदारांकडून फोन बाजूला ठेवण्याचे प्रकार सर्वच पोलिस ठाण्यात होत आहे.४नवीन जालना भागात मोठी व्यापारपेठ आहे. मात्र ठाण्याचा दुरध्वनीच बंद असल्याने रात्री अपरात्री अशा चोऱ्यांच्या घटना घडत आहे. त्यामुळे पोलिसांना संपर्क साधावा कसा असा प्रश्न पडत आहे. केवळ ११ हजार रूपयाचे बिल थकल्याने सेवा खंडित करण्यात आल्याचे ठाणे अमलंदार दिवटे यांनी सांगितले.