शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

पालिका कर्मचारी कामावर परतले

By admin | Updated: July 25, 2014 00:30 IST

जालना : गेल्या आठ दिवसांपासून आपल्या विविध मागण्यांसाठी संपावर गेलेले पालिका कर्मचारी गुरुवारी कामावर पुन्हा परतले.

जालना : गेल्या आठ दिवसांपासून आपल्या विविध मागण्यांसाठी संपावर गेलेले पालिका कर्मचारी गुरुवारी कामावर पुन्हा परतले.वेतनवाढीसह अन्य मागण्यांसाठी नगर पालिकांचे कर्मचारी गेल्या आठ दिवसांपासून बेमुदत संपावर गेले. या कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्या मंजूर झाल्या शिवाय संप मागे घेणार नाही, अशी कठोर भूमिका घेतली. परिणामी हा संप चिघळणार अशी चिन्हे दिसू लागली. विशेषत: पालिके अंतर्गत सर्वच संघटनांनी एकत्रितपणे संप केल्यानंतर आठ दिवस पालिकेचे कामकाज पूर्णत: कोलमडून गेले. पावसाळ्याच्या तोंडावरच साफ सफाईची कामे पूर्णत: ठप्प झाली. त्यामुळे कचराकुंड्यांवर कचऱ्याचे ठिक ठिकाणी ढीग साचले. तसेच नाल्याही पूर्णत: तुंबल्या. गेल्या दोन दिवसांत पडलेल्या पावसामुळे संपूर्ण शहरात दुर्गंधीचे वातावरण पसरले. संपूर्ण जालना शहरात स्वच्छतेसह अन्य नागरी सेवा कोलमडल्यामुळे प्रशासन सुद्धा हतबल झाले होते. जिल्ह्यातील परतूर, अंबड, भोकरदन या पालिकांमधूनही कर्मचाऱ्यांनी संप केल्यामुळे परिस्थिती गंभीर झाली होती. या स्थितीत जिल्हा प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करावा. व नागरी सुविधा पुरवाव्यात अशी मागणी होत होती. अखेर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी मुंबईत हस्तक्षेप करीत, चर्चा करीत कर्मचाऱ्यांना दिलासा दिला. त्यामुळे संघटनांनी आपला संप मागे घेतला. दरम्यान, शहरातील आठ दिवसांपासून ठप्प असलेली कामे गतीने पूर्ण करण्यात यावीत, अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्त होत आहे. यात प्रामुख्याने पाणी पुरवठा व स्वच्छतेचा प्रश्न प्राधान्याने सोडविण्याची मागणी होत आहे. (प्रतिनिधी)पालिका कार्यालय गजबजलेगेल्या आठ दिवसांपासून पालिकेच्या सर्व विभागात कमालीचा शुकशुकाट होता. स्वच्छता विभागासह अन्य विभागाची कामे पूर्णत: ठप्प होती. कर्मचाऱ्यांनी प्रवेशद्वारावरच ठाण मांडून आपल्या मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. त्यामुळेच पालिका कार्यालयात सर्वसामान्य नागरिकांची कोणतीही कामे झाली नाहीत. गुरुवारी कर्मचारी परतल्यानंतर सर्व विभाग गजबजून गेले. नागरिकांनीही कामांसाठी गर्दी केली.