शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
2
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
3
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
6
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
7
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
8
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
9
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
10
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
11
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
12
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
13
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
14
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
15
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
16
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
17
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
18
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
19
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
20
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
Daily Top 2Weekly Top 5

पालिका शाळा; विद्यार्थ्यांपेक्षा शिक्षक जास्त

By admin | Updated: May 27, 2014 00:59 IST

जालना : नगरपालिकेअंतर्गत २१ शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या गेल्या चार-पाच वर्षांमध्ये निम्म्याहून कमी झाली.

जालना : नगरपालिकेअंतर्गत २१ शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या गेल्या चार-पाच वर्षांमध्ये निम्म्याहून कमी झाली. मात्र शिक्षक संख्या पूर्वीचीच असल्याने शिक्षक जास्त आणि विद्यार्थी कमी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सुमारे ३० शिक्षक जादा असल्याने त्यांना जिल्हा परिषदेकडे वर्ग करावे, अशी मागणी होत आहे. या शाळांमध्ये १२५ शिक्षक व ५ शिपाई कार्यरत आहे. २००९ पासून या पदांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. याउलट शिक्षणाधिकार्‍यांसह मुख्याध्यापकांची पदे रिक्त आहेत. विशेष म्हणजे शाळांचीही दुरवस्था झालेली असून पुरेशा सुविधा नसल्याने विद्यार्थी खाजगी शाळांकडे वळत आहेत. याबाबत स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष साईनाथ चिन्नादोरे यांनी जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, सन २००९ ला ४८०० विद्यार्थी शिकत होते. त्याचे प्रमाण कमी कमी होत आता २००० पर्यंत आली आहे. विद्यार्थी टक्का वाढीसाठी नगर पालिकेच्यावतीने कोणतेही प्रयत्न केले जात नाही. समाजात अत्यंत दुर्लक्षित वर्गाची मुलेच येथे शिक्षण घेताना दिसतात. शाळेतील शिक्षक वर्गास ८० टक्के रक्कम राज्य शासन पगार देते व २० टक्के नगर पालिकेचा वाटा असतो. त्या २० टक्के पगाराच्या मागणीकरिता शिक्षक नेहमीच आंदोलन करतात. शाळेच्या अशा व्यवस्थापनामुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. विद्यार्थ्यांचे शाळा सोडण्याचे प्रमाणही वाढले आहे. शिक्षण उपसंचालकांनी या विभागाला अनेक वेळा सूचना देऊनही त्याचा काहीच परिणाम न झाल्याचे दिसते. जिल्हा परिषदेप्रमाणे शाळा व्यवस्थापन कार्यक्रम राबवून विद्यार्थ्यांची शाळेबद्दची असणारी गोडी वाढवावी, तसेच शाळा सुविधेबाबत संबंधितांनी लक्ष द्यावी अशी मागणी चिन्नादोरे यांनी केली आहे. (प्रतिनिधी) पालकांकडून अपेक्षा नगरपालिका शाळांची दुरवस्था असल्याने या शाळांची स्थिती चांगली करून तेथे विद्यार्थ्यांना सर्व सुविधा पुरवाव्यात, अशी किमान अपेक्षा पालक वर्गातून व्यक्त केली जात आहे. नगरपालिकेने त्यासाठी वाढीव निधीची तरतूद करावी, अशीही मागणी केली जात आहे.