शहरं
Join us  
Trending Stories
1
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
2
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
3
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
4
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
5
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
6
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
7
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
8
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
9
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
10
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
11
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
12
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
13
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
14
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
15
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
16
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
17
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
18
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
19
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
20
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान

पालिका शाळा; विद्यार्थ्यांपेक्षा शिक्षक जास्त

By admin | Updated: May 27, 2014 00:59 IST

जालना : नगरपालिकेअंतर्गत २१ शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या गेल्या चार-पाच वर्षांमध्ये निम्म्याहून कमी झाली.

जालना : नगरपालिकेअंतर्गत २१ शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या गेल्या चार-पाच वर्षांमध्ये निम्म्याहून कमी झाली. मात्र शिक्षक संख्या पूर्वीचीच असल्याने शिक्षक जास्त आणि विद्यार्थी कमी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सुमारे ३० शिक्षक जादा असल्याने त्यांना जिल्हा परिषदेकडे वर्ग करावे, अशी मागणी होत आहे. या शाळांमध्ये १२५ शिक्षक व ५ शिपाई कार्यरत आहे. २००९ पासून या पदांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. याउलट शिक्षणाधिकार्‍यांसह मुख्याध्यापकांची पदे रिक्त आहेत. विशेष म्हणजे शाळांचीही दुरवस्था झालेली असून पुरेशा सुविधा नसल्याने विद्यार्थी खाजगी शाळांकडे वळत आहेत. याबाबत स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष साईनाथ चिन्नादोरे यांनी जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, सन २००९ ला ४८०० विद्यार्थी शिकत होते. त्याचे प्रमाण कमी कमी होत आता २००० पर्यंत आली आहे. विद्यार्थी टक्का वाढीसाठी नगर पालिकेच्यावतीने कोणतेही प्रयत्न केले जात नाही. समाजात अत्यंत दुर्लक्षित वर्गाची मुलेच येथे शिक्षण घेताना दिसतात. शाळेतील शिक्षक वर्गास ८० टक्के रक्कम राज्य शासन पगार देते व २० टक्के नगर पालिकेचा वाटा असतो. त्या २० टक्के पगाराच्या मागणीकरिता शिक्षक नेहमीच आंदोलन करतात. शाळेच्या अशा व्यवस्थापनामुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. विद्यार्थ्यांचे शाळा सोडण्याचे प्रमाणही वाढले आहे. शिक्षण उपसंचालकांनी या विभागाला अनेक वेळा सूचना देऊनही त्याचा काहीच परिणाम न झाल्याचे दिसते. जिल्हा परिषदेप्रमाणे शाळा व्यवस्थापन कार्यक्रम राबवून विद्यार्थ्यांची शाळेबद्दची असणारी गोडी वाढवावी, तसेच शाळा सुविधेबाबत संबंधितांनी लक्ष द्यावी अशी मागणी चिन्नादोरे यांनी केली आहे. (प्रतिनिधी) पालकांकडून अपेक्षा नगरपालिका शाळांची दुरवस्था असल्याने या शाळांची स्थिती चांगली करून तेथे विद्यार्थ्यांना सर्व सुविधा पुरवाव्यात, अशी किमान अपेक्षा पालक वर्गातून व्यक्त केली जात आहे. नगरपालिकेने त्यासाठी वाढीव निधीची तरतूद करावी, अशीही मागणी केली जात आहे.