शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
2
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
3
नेपाळमध्ये लष्कराने सूत्र हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोच्या विमान उड्डाणे रद्द
4
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
5
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
6
Stock Markets Today: शेअर बाजार सुस्साट, निफ्टी २५,००० च्या पार; IT-रियल्टी शेअर्समध्ये जोरदार तेजी
7
सी. पी. राधाकृष्णन : संघस्वयंसेवक ते उपराष्ट्रपतिपदापर्यंतचा चढता आलेख
8
जे कोणालाच जमलं नाही ते आर्यन खानने केलं, 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून दिलं मोठं सरप्राईज
9
Asia Cup 2025: सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हात मिळवला की नाही? Video झाला व्हायरल
10
Crime: संतापजनक! चालत्या कॅबमध्ये विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन, चालकाला अटक!
11
Genz Protests Nepal: तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल
12
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
13
"मी भाऊ कदमकडून खूप काही शिकलो", मनोज वाजपेयीकडून अभिनेत्याचं भरभरुन कौतुक, म्हणाला...
14
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
15
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
16
'भारत-अमेरिका पक्के मित्र, व्यापार करारावर चर्चा सुरू'; ट्रम्प यांच्या पोस्टला पंतप्रधान मोदींचे उत्तर
17
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
18
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
19
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
20
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान

पालिका शाळा; विद्यार्थ्यांपेक्षा शिक्षक जास्त

By admin | Updated: May 27, 2014 00:59 IST

जालना : नगरपालिकेअंतर्गत २१ शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या गेल्या चार-पाच वर्षांमध्ये निम्म्याहून कमी झाली.

जालना : नगरपालिकेअंतर्गत २१ शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या गेल्या चार-पाच वर्षांमध्ये निम्म्याहून कमी झाली. मात्र शिक्षक संख्या पूर्वीचीच असल्याने शिक्षक जास्त आणि विद्यार्थी कमी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सुमारे ३० शिक्षक जादा असल्याने त्यांना जिल्हा परिषदेकडे वर्ग करावे, अशी मागणी होत आहे. या शाळांमध्ये १२५ शिक्षक व ५ शिपाई कार्यरत आहे. २००९ पासून या पदांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. याउलट शिक्षणाधिकार्‍यांसह मुख्याध्यापकांची पदे रिक्त आहेत. विशेष म्हणजे शाळांचीही दुरवस्था झालेली असून पुरेशा सुविधा नसल्याने विद्यार्थी खाजगी शाळांकडे वळत आहेत. याबाबत स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष साईनाथ चिन्नादोरे यांनी जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, सन २००९ ला ४८०० विद्यार्थी शिकत होते. त्याचे प्रमाण कमी कमी होत आता २००० पर्यंत आली आहे. विद्यार्थी टक्का वाढीसाठी नगर पालिकेच्यावतीने कोणतेही प्रयत्न केले जात नाही. समाजात अत्यंत दुर्लक्षित वर्गाची मुलेच येथे शिक्षण घेताना दिसतात. शाळेतील शिक्षक वर्गास ८० टक्के रक्कम राज्य शासन पगार देते व २० टक्के नगर पालिकेचा वाटा असतो. त्या २० टक्के पगाराच्या मागणीकरिता शिक्षक नेहमीच आंदोलन करतात. शाळेच्या अशा व्यवस्थापनामुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. विद्यार्थ्यांचे शाळा सोडण्याचे प्रमाणही वाढले आहे. शिक्षण उपसंचालकांनी या विभागाला अनेक वेळा सूचना देऊनही त्याचा काहीच परिणाम न झाल्याचे दिसते. जिल्हा परिषदेप्रमाणे शाळा व्यवस्थापन कार्यक्रम राबवून विद्यार्थ्यांची शाळेबद्दची असणारी गोडी वाढवावी, तसेच शाळा सुविधेबाबत संबंधितांनी लक्ष द्यावी अशी मागणी चिन्नादोरे यांनी केली आहे. (प्रतिनिधी) पालकांकडून अपेक्षा नगरपालिका शाळांची दुरवस्था असल्याने या शाळांची स्थिती चांगली करून तेथे विद्यार्थ्यांना सर्व सुविधा पुरवाव्यात, अशी किमान अपेक्षा पालक वर्गातून व्यक्त केली जात आहे. नगरपालिकेने त्यासाठी वाढीव निधीची तरतूद करावी, अशीही मागणी केली जात आहे.