शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

अवैध नळकनेक्शनधारक नगर पालिकेच्या रडारवर !

By admin | Updated: May 20, 2017 23:35 IST

उस्मानाबाद : नगर परिषदेच्या वतीने शहरातील सर्व मालमत्तांचा सर्वे करण्यात आला आहे. या सर्वेअंती अनेक धक्कादायक बाबी चव्हाट्यावर आल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कउस्मानाबाद : नगर परिषदेच्या वतीने शहरातील सर्व मालमत्तांचा सर्वे करण्यात आला आहे. या सर्वेअंती अनेक धक्कादायक बाबी चव्हाट्यावर आल्या आहेत. शहरामध्ये सुमारे ३२ घरे आहेत. मात्र, या सर्व मालमत्ताधारकांकडे मिळून नळकनेक्शची संख्या केवळ सोळा हजार एवढी अल्प आहे. नळजोडणीतील हे गौडबंगाल समोर आल्यानंतर आता नगर परिषदेने आक्रमक भूमिका घेतली आहे. अवैध नळकनेक्शनधारकांमुळे नियमित पाणीपट्टी भरणाऱ्या नागरिकांवर अन्याय होत असल्याचे सांगत अवैध नळकनेक्शन नियमित करण्यासाठी ३० जुलैपर्यंत डेडलाईन देण्यात आली आहे. या मुदतीनंतर अवैध नळकनेक्शनधारकास दहा हजार रूपये दंड आणि फौजदारी कारवाई केली जाणार आहे. शनिवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत हा ठराव एकमुखाने मंजूर करण्यात आला आहे.नगर परिषदेची सर्वसाधारण सभेला नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांच्या उपस्थितीत दुपारी १ वाजेच्या सुमारास सुरूवात झाली. सभेच्या प्रारंभी विषय पत्रिकेवरील विषयांना मंजुरी दिल्यानंतर अवैध नळकनेक्शनचा विषय चर्चेला आला. सर्वेक्षणापूर्वी पालिकेच्या रेकॉर्डवर केवळ १६ हजार घरे होती. परंतु, सर्वेक्षणाअंती या घरांची संख्या ३२ हजारावर जावून ठेपली आहे. असे असतानाच दुसरीकडे या सर्व घरधारकांकडे मिळून केवळ १६ हजार नळकनेक्शन असल्याची धक्कादायक माहिती राजेनिंबाळकर यांनी सभागृहासमोर मांडली. या माहितीने सत्ताधाऱ्यांसह विरोधकही आवाक झाले. हजारोंच्या संख्येने अवैध नळकनेक्शन असल्यामुळेच सर्वसामान्य नागरिकांना पाणीपट्टी भरूनही गरजेनुसार पाणी मिळत नाही, असे ते म्हणाले. अशा नळकनेक्शनधारकांविरूद्ध काय कारवाई करावी? असा सवाल त्यांनी उपस्थित सदस्यांकडे केला. त्यावर सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनीही आपापली मते मांडली. यामध्ये राष्ट्रवादीचे गटनेते युवराज नळे, सदस्य प्रदीप मुंडे, माणिक बनसोडे, अभय इंगळे आदींनी अशा अवैध नळकनेक्शन धारकांविरूद्ध कठोर कारवाई करण्यात यावी, अशी सूचना केली. अवैध नळकनेक्शनमुळे पालिकेचे आर्थिक नुकसान होत आहे. तसेच नियमित पाणीपट्टी भरणाऱ्यांवरही अन्याय होत आहे. त्यामुळे कोणाचीही मुलाहिजा न बाळगता धडक मोहीम हाती घ्यावी, असे सत्तााारी सदस्यांनी सांगितले. दरम्यान, सर्वांची मते विचारात घेवून नगराध्यक्ष राजेनिंबाळकर यांनी अवैध नळकनेक्शन धारकांविरूद्ध पालिकेच्या वतीने धडक मोहीम हाती घेत असल्याचे सांगत ३० जुलैच्या आत नागरिकांनी अवैध कनेक्शन नियमित करून घ्यावे. जे नागरिक या मुदतीनंतरही कनेक्शन नियमित करून घेणार नाहीत, त्यांना सुमारे दहा हजार रूपये दंड आणि फौजदारी कारवाई केली जाईल. एवढेच नाही तर संबंधित नागरिकास उजनी योजनेचे कनेक्शनही दिले जाणार अशा स्वरूपाचा निर्णय घेतला असता, त्यास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. या निर्णयामुळे अवैध नळकनेक्शनधारक आता पालिकेच्या रडारवर आले आहेत.