शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

पाच हजार रुपयांपेक्षा अधिक थकबाकी तरी मनपाच्या नोटिसा

By admin | Updated: August 2, 2016 00:26 IST

औरंगाबाद : एक लाखापेक्षा अधिक मालमत्ताकर थकविलेल्या नागरिकांना नोटिसा पाठवून कर अदालतमध्ये चर्चेला बोलावण्याचे काम मनपाने यापूर्वीच सुरू केले आहे.

औरंगाबाद : एक लाखापेक्षा अधिक मालमत्ताकर थकविलेल्या नागरिकांना नोटिसा पाठवून कर अदालतमध्ये चर्चेला बोलावण्याचे काम मनपाने यापूर्वीच सुरू केले आहे. आतापर्यंत दोन कर अदालत यशस्वी झाल्यानंतर प्रशासनाने छोट्या थकबाकीदारांकडे आपला मोर्चा वळविला आहे. वॉर्ड कार्यालयांतर्फे पाच हजारांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या मालमत्ताधारकांना नोटीस बजावण्यात येत आहे. नोटीस पाहून काही नागरिक वॉर्डांमध्ये कराचा भरणा करीत आहेत.शहरातील १ लाख ३१ हजार मालमत्ताधारकांनी सुमारे २९० कोटी रुपये मालमत्ताकराचे थकविले आहेत. मागील ३० वर्षांमध्ये मनपाने कधीच मालमत्ताकराच्या थकबाकीची वसुली केलेली नाही. दरवर्षी थकबाकीचा आकडा फुगत गेला. अलीकडेच या थकबाकीवर २४ टक्के व्याज लावण्याचे अधिकारही शासनाने मनपाला दिले आहेत. पूर्वी मनपाचे अधिकारी सोयीस्करपणे थकबाकीचा आकडा लपवून ठेवत असत. चालू आर्थिक वर्षाची मागणी आणि वसुली या दोनच मुद्यांवर अधिकाऱ्यांचा भर असायचा. अलीकडेच मनपा प्रशासनाने मालमत्ताकराच्या थकबाकीकडे गांभीर्याने लक्ष देणे सुरू केले आहे. आतापर्यंत मोठ्या थकबाकीदारांसाठी दोन कर अदालतीही घेण्यात आल्या. या कर अदालतमध्ये जागेवरच नागरिकांचे प्रश्न सोडविण्यात आले. काही मालमत्ताधारकांनी कर अदालतमध्ये पैसे भरून टाकले.मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी यंदा मालमत्ताकरातून २३० ते २५० कोटी रुपये वसूल करण्याचे उद्दिष्ट ठरविले आहे. आतापासूनच मनपाने वेगवेगळ्या प्रकारे तयारी केल्यास मार्चअखेर उद्दिष्ट साध्य होईल, असा अंदाज आयुक्तांचा आहे. करमूल्य व निर्धारण विभागाला पूर्वी पूर्णवेळ अधिकारी नव्हते. आता वसंत निकम यांच्यावर ही मोठी जबाबदारी सोपविण्यात आली आहे.ज्यांच्याकडे अगदी दोन ते तीन वर्षांचे पैसे थकले असतील त्यांना नोटीस बजावण्यात येत आहे. मनपाच्या नोटिसा पाहून नागरिक वॉर्ड कार्यालयांमध्ये पैसे भरण्यासाठी गर्दी करीत असल्याचे चित्रही पाहायला मिळाले.