शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

शहराजवळ असलेल्या गावांना मनपाकडून पाणीपुरवठा करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:04 IST

औरंगाबाद : शहराजवळील गावांना मनपाकडून पाणीपुरवठा करण्यात यावा, तसेच विविध विकासकामे रखडलेली असून, निधी उपलब्ध करून द्यावा. औरंगाबाद महानगरपालिका ...

औरंगाबाद : शहराजवळील गावांना मनपाकडून पाणीपुरवठा करण्यात यावा, तसेच विविध विकासकामे रखडलेली असून, निधी उपलब्ध करून द्यावा. औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयीसुविधांसाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आ. हरिभाऊ बागडे यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदनाद्वारे केली.

महानगरपालिका क्षेत्रात पिण्याच्या पाण्याची योजना राबविताना ज्या भागात अजून पाणीपुरवठा झाला नाही. तेथून सुरुवात करावी.

लगतच्या गावांना महानगरपालिकेकडून पाणी द्यावे. शहराच्या

सांडपाण्यामुळे तेथील पाणी दूषित झाले आहे.

स्मार्ट सिटीची डेव्हलपमेंटची कामे थांबली आहेत, महानगरपालिकेने आजपर्यंत स्वतःचा हिस्सा दिला नाही.

डी.पी. प्लॅनप्रमाणे डीपी. रोडच्या जागेवर महानगरपालिकेने बोर्ड लावले असते तर तिथे २०/३० प्लॉट पडले नसते, आता तरी ते करावे. शहर विकासासाठी ३ टोलनाके आहेत, तेथे टोल वसुली होते तो निधी दर वर्षी किती जमा होतो, सिडको महानगरपालिका क्षेत्राच्या बाहेरच्या प्राधिकरणात असलेल्या गावातील एन.ए. ४४ च्या

लेआऊटला मान्यता देते त्याचे सिडको बेटरमेंट चार्जेस घेते; पण तेथे विकास करीत नाही.

सिडकोचे हस्तांतरण महानगरपालिकेला झाले; पण घरे बांधताना आजही सिडकोची परवानगी घ्यावी लागते. त्यात विसंगती आहे ती कधी दूर होईल. महानगरपालिकेचा नियोजन आराखडा मंजूर नाही,

या मुद्यावर त्यांनी निवेदनात प्रकाश टाकला.