शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
5
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
6
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
7
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
8
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
9
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
10
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
11
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
12
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
13
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
14
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
15
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
16
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
17
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
18
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
19
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!

शहर खड्डेमुक्त करण्यासाठी महापालिका सरसावली; पॅचवर्कसाठी ३० नोव्हेंबरची डेडलाइन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 14:07 IST

पॅचवर्कच्या कामात गुणवत्ता नसल्यास दोषी कंत्राटदारासह अधिकाºयांवरही कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. ३० नोव्हेंबरपर्यंत शहर खड्डेमुक्त करा, असे आदेश महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिले.

ठळक मुद्दे शहर खड्डेमुक्त व्हावे यासाठी महापालिकेचे पदाधिकारी व प्रशासनाने चांगलीच कंबर कसली आहे.

औरंगाबाद : शहर खड्डेमुक्त व्हावे यासाठी महापालिकेचे पदाधिकारी व प्रशासनाने चांगलीच कंबर कसली आहे. शहरातील वेगवेगळ्या वॉर्डांमध्ये पॅचवर्कचे कामही सुरू करण्यात आले असून, काही ठिकाणी निकृष्ट दर्जाचे काम सुरू असल्याच्या तक्रारीही प्राप्त झाल्या. पॅचवर्कच्या कामात गुणवत्ता नसल्यास दोषी कंत्राटदारासह अधिकाºयांवरही कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. ३० नोव्हेंबरपर्यंत शहर खड्डेमुक्त करा, असे आदेश महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिले.

सोमवारी आणि मंगळवारीही महापौरांनी वेगवेगळ्या विभागांचा आढावा घेतला. यावेळी रस्त्यांच्या नवीन कामांचा दर्जा राखलाच गेला पाहिजे. त्यात किंचितही उलटसुलट झाल्याचे निदर्शनास आल्यास संबधिताची गय करण्यात येणार नाही. आमखास मैदानावर मागील दोन दिवसांपासून मनपातर्फे पॅचवर्कचे काम सुरू आहे. रस्त्याच्या कामासाठी जेवढी मोठी खडी वापरण्यात येते, त्या आकाराची खडी वापरली जात असल्याने आज केलेले पॅचवर्क उद्या खराब होत आहे. यासंदर्भात ‘लोकमत’ने मंगळवारी छायाचित्रासह सविस्तर वृत्तही प्रकाशित केले. याची दखल घेऊन महापौरांनी शहर अभियंता एस.डी. पानझडे यांच्याकडे बोगस पॅचवर्कच्या कामाची चौकशी सोपविली.

शहरातील नागरिक खड्ड्यांमुळे खरोखरच खूप त्रस्त आहेत. ज्या भागात गेले त्या भागातील नागरिक खराब रस्ते आणि खड्डे या मुद्यावर बोलतात, असे महापौरांनी पत्रकारांशी बोलताना नमूद केले. मागील काही दिवसांपासून ज्या पद्धतीने कचरा उचलण्याच्या प्रक्रियेत सकारात्मक बदल दिसून येत आहे, तसाच बदल रस्त्यांच्या बाबतीत दिसून येईल. अनेक वर्षांच्या सवयी आणि पद्धती बदलणे थोडे त्रासदायक आहे. मनपा प्रशासन सकारात्मक विचार करून सध्या काम करीत आहे. येणा-या ३० नोव्हेंबरपर्यंत शहरातील ९ वॉर्ड कार्यालयांमधील पॅचवर्कची कामे संपवा, असे आदेश दिले आहेत असेही महापौरांनी सांगितले. 

दुभाजकही दुरुस्त करणारशहरातील दुभाजकांकडे आजपर्यंत कोणीच लक्ष दिले नाही. दुभाजक दुरुस्तीकडेही लक्ष देण्यात आले आहे. लवकरच दुभाजकांची रंगरंगोटी, साफसफाई करण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे. या कामासाठी दानशूर मंडळी पुढे येतात का, यादृष्टीनेही मनपाचा शोध सुरू असल्याचे महापौरांनी नमूद केले.