शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

शहर खड्डेमुक्त करण्यासाठी महापालिका सरसावली; पॅचवर्कसाठी ३० नोव्हेंबरची डेडलाइन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 14:07 IST

पॅचवर्कच्या कामात गुणवत्ता नसल्यास दोषी कंत्राटदारासह अधिकाºयांवरही कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. ३० नोव्हेंबरपर्यंत शहर खड्डेमुक्त करा, असे आदेश महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिले.

ठळक मुद्दे शहर खड्डेमुक्त व्हावे यासाठी महापालिकेचे पदाधिकारी व प्रशासनाने चांगलीच कंबर कसली आहे.

औरंगाबाद : शहर खड्डेमुक्त व्हावे यासाठी महापालिकेचे पदाधिकारी व प्रशासनाने चांगलीच कंबर कसली आहे. शहरातील वेगवेगळ्या वॉर्डांमध्ये पॅचवर्कचे कामही सुरू करण्यात आले असून, काही ठिकाणी निकृष्ट दर्जाचे काम सुरू असल्याच्या तक्रारीही प्राप्त झाल्या. पॅचवर्कच्या कामात गुणवत्ता नसल्यास दोषी कंत्राटदारासह अधिकाºयांवरही कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. ३० नोव्हेंबरपर्यंत शहर खड्डेमुक्त करा, असे आदेश महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिले.

सोमवारी आणि मंगळवारीही महापौरांनी वेगवेगळ्या विभागांचा आढावा घेतला. यावेळी रस्त्यांच्या नवीन कामांचा दर्जा राखलाच गेला पाहिजे. त्यात किंचितही उलटसुलट झाल्याचे निदर्शनास आल्यास संबधिताची गय करण्यात येणार नाही. आमखास मैदानावर मागील दोन दिवसांपासून मनपातर्फे पॅचवर्कचे काम सुरू आहे. रस्त्याच्या कामासाठी जेवढी मोठी खडी वापरण्यात येते, त्या आकाराची खडी वापरली जात असल्याने आज केलेले पॅचवर्क उद्या खराब होत आहे. यासंदर्भात ‘लोकमत’ने मंगळवारी छायाचित्रासह सविस्तर वृत्तही प्रकाशित केले. याची दखल घेऊन महापौरांनी शहर अभियंता एस.डी. पानझडे यांच्याकडे बोगस पॅचवर्कच्या कामाची चौकशी सोपविली.

शहरातील नागरिक खड्ड्यांमुळे खरोखरच खूप त्रस्त आहेत. ज्या भागात गेले त्या भागातील नागरिक खराब रस्ते आणि खड्डे या मुद्यावर बोलतात, असे महापौरांनी पत्रकारांशी बोलताना नमूद केले. मागील काही दिवसांपासून ज्या पद्धतीने कचरा उचलण्याच्या प्रक्रियेत सकारात्मक बदल दिसून येत आहे, तसाच बदल रस्त्यांच्या बाबतीत दिसून येईल. अनेक वर्षांच्या सवयी आणि पद्धती बदलणे थोडे त्रासदायक आहे. मनपा प्रशासन सकारात्मक विचार करून सध्या काम करीत आहे. येणा-या ३० नोव्हेंबरपर्यंत शहरातील ९ वॉर्ड कार्यालयांमधील पॅचवर्कची कामे संपवा, असे आदेश दिले आहेत असेही महापौरांनी सांगितले. 

दुभाजकही दुरुस्त करणारशहरातील दुभाजकांकडे आजपर्यंत कोणीच लक्ष दिले नाही. दुभाजक दुरुस्तीकडेही लक्ष देण्यात आले आहे. लवकरच दुभाजकांची रंगरंगोटी, साफसफाई करण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे. या कामासाठी दानशूर मंडळी पुढे येतात का, यादृष्टीनेही मनपाचा शोध सुरू असल्याचे महापौरांनी नमूद केले.