शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
2
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
3
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
4
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
5
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
6
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
7
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
8
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
9
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
10
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
11
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
12
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
13
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
14
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
15
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
16
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
17
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
18
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
20
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!

नागरी समस्या सोडविण्यास पालिका प्रशासन असमर्थ

By admin | Updated: May 22, 2014 00:15 IST

जालना : जालना शहरातील नागरी समस्या सोडविण्या व मुलभूत सुविधा देण्याबाबत आढावा बैठकीत वारंवार सूचना देऊनही प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप प्रभारी नगराध्यक्ष राजेश राऊत यांनी केला आहे.

जालना : जालना शहरातील नागरी समस्या सोडविण्या व मुलभूत सुविधा देण्याबाबत आढावा बैठकीत वारंवार सूचना देऊनही प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप प्रभारी नगराध्यक्ष राजेश राऊत यांनी केला आहे. नगरपालिकेच्या प्रभारी अध्यक्षपदाचा पदभार घेतल्यानंतर नागरी समस्या सोडविण्याबाबत चार आढावा बैठका घेतल्या. तसेच मुख्याधिकार्‍यांना समक्ष चर्चा करून सूचना दिल्या. तरीही समस्या सोडविण्याकडे मुख्याधिकार्‍यांकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप त्यांनी केला. शहरासाठी मुबलक पाणीपुरवठा होत असतानादेखील अनेक प्रभागात नियमित व वेळेवर पाणीपुरवठा होत नाही. दहा ते पंधरा दिवसआड पाणी दिल्या जाते. मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होतो. अंतर्गत पाईपलाईन व गळतीमुळे दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. शहराचा वीजपुरवठा चालू करण्यासाठी पालिकेने १ कोटी ८० लाखांचे बील भरून सहा महिने झाले तरीही शहरात पथदिवे चालू केलेले नाहीत. संपूर्ण शहर अंधारात आहे. शहरात ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मस्तगड येथील पंपहाऊस व फिल्टरबेडमधील काही विद्युतपंप बंद आहेत. न.प.मालकीच्या खुल्या जागांवर अनधिकृत ताबा व अतिक्रमण वाढले आहे, अशा अनेक समस्यांबाबत वारंवार सूचना करूनही त्याची गांभिर्याने दखल घेतली जात नसल्याची खत त्यांनी यावेळी व्यक्त केली. (प्रतिनिधी)