शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
5
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
6
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
7
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
8
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
9
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
10
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
12
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
13
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
14
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
15
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
16
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
17
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
19
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया

मुंबईतील पोलीस शिपायाची हिंगोलीत गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2020 13:16 IST

आत्महत्येचे कारण समजू शकले नाही

कळमनुरी/बासंबा (जि. हिंगोली) : तालुक्यातील इसापूर रमना येथील रहिवासी व मुंबई पोलीस दलातील कार्यरत शिपाई केशव बाभनाजी वानखेडे यांनी शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना १३ फेबु्रवारी रोजी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास उघडकीस आली. 

इसापूर रमणा येथील केशव वानखेडे हे मुंबई, वरळी पोलीस मुख्यालयात मागील १७ वर्षांपासून पोलीस शिपाई म्हणून कर्तव्य बजावत होते; परंतु काही कामानिमित्त ते त्यांच्या गावी हिंगोली तालुक्यातील इसापूर येथे रजेवर आले होते. १३ फेबु्रवारी रोजी परत ते कर्तव्यावर हजर होणार असल्याने त्यांनी वरळी येथे जाण्याची संपूर्ण तयारी केली. त्यानंतर ते शेतातून फेरफटका मारून येतो, असे नातेवाईकांना सांगून घराबाहेर पडले. बराच वेळ निघून गेला, परंतु ते घरी परतले नाहीत. त्यानंतर सकाळच्या सुमारास केशव वानखेडे यांचा मृतदेह त्यांच्याच शेतातील लिंबाच्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत नातेवाईकांना आढळून आला. सदर घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी (हिंगोली शहर) आर. आर. वैजणे, सपोनि आर. एच. मलपिलू, एएसआय मगन पवार, पोउपनि. भोसले, बीट जमादार राठोड आदींनी भेट देऊन पंचनामा केला. 

याप्रकरणी बासंबा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यांच्या पार्थीवाववर सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही, पोलीस तपासातच आत्महत्या कोणत्या कारणामुळे केली, हे निष्पन्न होईल, असे पोलिसांनी सांगितले. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :PoliceपोलिसMumbaiमुंबईHingoliहिंगोली