शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
3
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
4
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
5
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
6
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
7
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
8
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
9
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
10
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
11
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
12
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
13
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
14
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
15
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
16
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
17
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
18
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
19
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
20
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव

Mucormycosis : म्युकरमायकोसिसचा तुटवडा; रुग्ण मरणाच्या तर नातेवाईक प्रशासनाच्या दारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 12:54 IST

४९ रुग्णांचे नातेवाईक गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत इंजेक्शनसाठी ठाण मांडून होते.

ठळक मुद्देम्युकरमायकोसिसचे इंजेक्शन भेटेनाखासगी रुग्णालयांनी केले हात वर

औरंगाबाद: कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना आता म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य आजाराने ग्रासले आहे. औरंगाबादसह १५ जिल्ह्यांतील रुग्ण शहरात उपचार घेत असून रुग्ण मरणाच्या दारात असल्यामुळे नातेवाइकांना म्युकरमायकोसिसच्या आजारावर लागणारे इंजेक्शन घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या दारात ताटकळत बसावे लागते आहे. इंजेक्शनची मागणी करीत गुरुवारी ४९ रुग्णांच्या नातेवाइकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचा दरवाजा गाठला.

इंजेक्शनचा तुटवडा असून रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत ते कमी पडत आहेत. राज्यातील १५ जिल्ह्यांतून रुग्ण औरंगाबादमध्ये येत असल्यामुळे शासनाने सर्वाधिक इंजेक्शनचा पुरवठा या जिल्ह्यात करावा, अशी मागणीदेखील पुढे येत आहे. प्रत्येक रुग्णासाठी अ‍ॅम्फोटेरेसीन बी हे ३ ते ५ इंजेक्शन दररोज लागत आहेत. १०० पेक्षा जास्त इंजेक्शनचा पुरवठा प्रशासनाला होत नाही. मागील ३ दिवसांपासून इंजेक्शन मिळत नसल्यामुळे रुग्ण नातेवाइकांची धावपळ होत आहे. इंजेक्शन मिळत नाहीत, रुग्ण नातेवाइकांनी आपापल्या परीने ते उपलब्ध करावेत, असे सांगून खासगी रुग्णालये हातवर करीत आहेत.

४९ रुग्ण नातेवाईक जिल्हाधिकारी कार्यालयात४९ रुग्णांचे नातेवाईक गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत इंजेक्शनसाठी ठाण मांडून होते. रुग्ण मरणाच्या दारात असून आता खासगी हॉस्पिटलदेखील आम्हाला सहकार्य करीत नाहीत, त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांकडे आल्याचे विनय साखला यांनी सांगितले. किरण हजारी म्हणाले, महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गतदेखील सदरील आजारावर उपचार मिळणे दुर्लभ झाले आहे. जावेद तांबोळी, सुदर्शन पवार, केतकी जोशी, नामदेव सोनवणे यांनीदेखील अशी भूमिका मांडली. बाहेर इंजेक्शन भेटत नाही, प्रशासनाकडून उपलब्ध होत नाही. या सगळ्या खेचाखेचीत रुग्णांची हेळसांड होत असल्याचे मत नातेवाइकांनी व्यक्त केले.

जिल्हाधिकाऱ्यांची माहिती अशीइंजेक्शनचा तुटवडा आहे. शासनाकडून वाढीव इंजेक्शन मिळावेत, यासाठी पाठपुरावा सुरू आहे. जसे इंजेक्शन पुरविले जात आहेत, तसे रुग्णांचा आकडा पाहून त्यांना दिले जात आहेत. असे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले.

औरंगाबादला विशेष पुरवठा व्हावारेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी करण्यासाठी औरंगाबादेत राज्यभरातून रुग्णाचे नातेवाईक येत राहिले. तसेच आता म्युकरमायकोसिसच्या उपचारासाठी शहरात राज्यातील १५ जिल्ह्यातील रुग्ण आहेत. औरंगाबादचे २५८ रुग्ण असून ४४६ रुग्ण मराठवाड्यासह इतर जिल्ह्यातील आहेत. त्यामुळे औरंगाबादला इंजेक्शनचा रुग्ण आकडा पाहून पुरवठा होणे गरजेचे आहे. ठाणे, नंदुरबार, सोलापूर, पुणे, धुळे, अकोला, लातूर, नाशिक, हिंगोली, नांदेड, अहमदनगर, जळगाव, बीड, परभणी, जालना येथील रुग्ण सध्या औरंगाबादमध्ये उपचार घेत आहेत. त्यामुळे औरंगाबादमध्ये विशेष पातळीवर इंजेक्शनचा पुरवठा शासनाने करावा, अशी मागणी पुढे येत आहे.

टॅग्स :Mucormycosisम्युकोरमायकोसिसAurangabadऔरंगाबाद