शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
2
IND vs SA Women's World Cup 2025 Final Live Streaming: फायनलमध्ये 'ही' गोष्ट ठरेल भारतासाठी जमेची बाजू
3
"वर्गात एक विद्यार्थी असेल तरी मराठीची तुकडी चालली पाहिजे", विश्वास पाटील यांची स्पष्ट भूमिका
4
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
5
IND vs AUS 3rd T20I Live Streaming : हा सामना जिंका नाहीतर मालिका विसरा! टीम इंडियाकडे शेवटची संधी
6
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
7
निर्भिड आणि बेधडक पत्रकारितेची आज गरज; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मत
8
Pune Crime: नाशिकच्या तरुणीवर हिंजवडीत कोयत्याने हल्ला! प्रेमप्रकरणातून तरुणाने केला जीव घेण्याचा प्रयत्न
9
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
10
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
11
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
12
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
13
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
14
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
15
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
16
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
17
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
18
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
19
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
20
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट

Mucormycosis : म्युकरमायकोसिसचा तुटवडा; रुग्ण मरणाच्या तर नातेवाईक प्रशासनाच्या दारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 12:54 IST

४९ रुग्णांचे नातेवाईक गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत इंजेक्शनसाठी ठाण मांडून होते.

ठळक मुद्देम्युकरमायकोसिसचे इंजेक्शन भेटेनाखासगी रुग्णालयांनी केले हात वर

औरंगाबाद: कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना आता म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य आजाराने ग्रासले आहे. औरंगाबादसह १५ जिल्ह्यांतील रुग्ण शहरात उपचार घेत असून रुग्ण मरणाच्या दारात असल्यामुळे नातेवाइकांना म्युकरमायकोसिसच्या आजारावर लागणारे इंजेक्शन घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या दारात ताटकळत बसावे लागते आहे. इंजेक्शनची मागणी करीत गुरुवारी ४९ रुग्णांच्या नातेवाइकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचा दरवाजा गाठला.

इंजेक्शनचा तुटवडा असून रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत ते कमी पडत आहेत. राज्यातील १५ जिल्ह्यांतून रुग्ण औरंगाबादमध्ये येत असल्यामुळे शासनाने सर्वाधिक इंजेक्शनचा पुरवठा या जिल्ह्यात करावा, अशी मागणीदेखील पुढे येत आहे. प्रत्येक रुग्णासाठी अ‍ॅम्फोटेरेसीन बी हे ३ ते ५ इंजेक्शन दररोज लागत आहेत. १०० पेक्षा जास्त इंजेक्शनचा पुरवठा प्रशासनाला होत नाही. मागील ३ दिवसांपासून इंजेक्शन मिळत नसल्यामुळे रुग्ण नातेवाइकांची धावपळ होत आहे. इंजेक्शन मिळत नाहीत, रुग्ण नातेवाइकांनी आपापल्या परीने ते उपलब्ध करावेत, असे सांगून खासगी रुग्णालये हातवर करीत आहेत.

४९ रुग्ण नातेवाईक जिल्हाधिकारी कार्यालयात४९ रुग्णांचे नातेवाईक गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत इंजेक्शनसाठी ठाण मांडून होते. रुग्ण मरणाच्या दारात असून आता खासगी हॉस्पिटलदेखील आम्हाला सहकार्य करीत नाहीत, त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांकडे आल्याचे विनय साखला यांनी सांगितले. किरण हजारी म्हणाले, महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गतदेखील सदरील आजारावर उपचार मिळणे दुर्लभ झाले आहे. जावेद तांबोळी, सुदर्शन पवार, केतकी जोशी, नामदेव सोनवणे यांनीदेखील अशी भूमिका मांडली. बाहेर इंजेक्शन भेटत नाही, प्रशासनाकडून उपलब्ध होत नाही. या सगळ्या खेचाखेचीत रुग्णांची हेळसांड होत असल्याचे मत नातेवाइकांनी व्यक्त केले.

जिल्हाधिकाऱ्यांची माहिती अशीइंजेक्शनचा तुटवडा आहे. शासनाकडून वाढीव इंजेक्शन मिळावेत, यासाठी पाठपुरावा सुरू आहे. जसे इंजेक्शन पुरविले जात आहेत, तसे रुग्णांचा आकडा पाहून त्यांना दिले जात आहेत. असे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले.

औरंगाबादला विशेष पुरवठा व्हावारेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी करण्यासाठी औरंगाबादेत राज्यभरातून रुग्णाचे नातेवाईक येत राहिले. तसेच आता म्युकरमायकोसिसच्या उपचारासाठी शहरात राज्यातील १५ जिल्ह्यातील रुग्ण आहेत. औरंगाबादचे २५८ रुग्ण असून ४४६ रुग्ण मराठवाड्यासह इतर जिल्ह्यातील आहेत. त्यामुळे औरंगाबादला इंजेक्शनचा रुग्ण आकडा पाहून पुरवठा होणे गरजेचे आहे. ठाणे, नंदुरबार, सोलापूर, पुणे, धुळे, अकोला, लातूर, नाशिक, हिंगोली, नांदेड, अहमदनगर, जळगाव, बीड, परभणी, जालना येथील रुग्ण सध्या औरंगाबादमध्ये उपचार घेत आहेत. त्यामुळे औरंगाबादमध्ये विशेष पातळीवर इंजेक्शनचा पुरवठा शासनाने करावा, अशी मागणी पुढे येत आहे.

टॅग्स :Mucormycosisम्युकोरमायकोसिसAurangabadऔरंगाबाद