शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
4
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
5
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
6
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
7
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
8
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
9
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
10
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
11
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
12
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
13
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
14
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
15
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
16
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
17
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
18
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
19
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणने कापली शेतकऱ्यांची वीज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2016 00:42 IST

परिसरातील सुमारे १,१०० शेतकऱ्यांवर महावितरणने वीज कपात करून ऐन दिवाळीत संकट ओढवले आहे.

ऐन दिवाळीत शेतकरी संकटात : भाजीपाला, धान उत्पादकांची पीक धोक्यातपालांदूर : परिसरातील सुमारे १,१०० शेतकऱ्यांवर महावितरणने वीज कपात करून ऐन दिवाळीत संकट ओढवले आहे. थकीत वीज बिलाची बाब पुढे करीत कालपासून कृषी जनित्र बंद केल्याने आज सकाळी सिंचनाकरिता कृषीपंपाला वीजच नाही. त्यामुळे वीज कार्यालयात तक्रारीकरिता गेले असता वीज मुद्दामच कापल्याचे कळले.शासनाच्या तुघलकी धोरणाने खरच शेतकरी बेजार झाला आहे. सगळ्या बारा भानगडीचा भागीदार शेतकऱ्यांनाच केल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. सध्यस्थितीत धान कापणी, बांधणी, मळणीचा हंगाम जोमात सुरु आहे. रब्बीकरिता जमीन तयार करून पाणी देणे अगत्याचे आहे. बागायतीत प्रत्येक दिवशी पाणी भाज्यांना गरजेचे आहे. अशावेळी वीज कापून महावितरणने शेतकऱ्यांना संकटाचा खाईत ढकलले आहे. धान विक्रीकरिता तयार आहेत. पण हमीभाव केंद्र पालांदुरात सुरु न झाल्याने धान पडून आहेत. खासगीत १,३०० - १,३५० रुपये भावाने खरेदी सुरु आहे. दिवाळीत तात्पुरत्या गरजेकरिता १०, ५ पोती धान खासगीत विकून दिवाळी साजरी करण्याचा प्रयत्न सुरु असताना मध्येच महावितरणने वीज बिलाचा भरणा करण्याचे सांगितले. त्यामुळे दिवाळीच्या आनंदावर विरजण पडले आहे. नियमित मिटर रिडींग न घेणे, अव्वाच्या सव्वा बिल देणे, राजकारण्यांकडून वीज बिल माफ करण्याचे खोटे बोलणे, मागील ३ वर्षाचे दुष्काळ डोक्यावर असणे, शेतीमालाचा भाव नसणे आदी कारणाने शेतकरी नियमित वीज बिल भरत नाही. ही वास्तविकता शासनाला प्रामाणिकपणे जाण असूनही वीज कापू देणे म्हणजे पाठीत खंजीर खुपसण्यासारखेच झाले. उद्योगधंद्यांना वीज माफक व पुरेशी पुरविली जातो. प्रसंगी वीज बिल, कर्ज माफ केल्या जाते. मग शेतकऱ्यांना का नाही? असा प्रश्न देशाचा आधारस्तंभ असलेला शेतकरी विचारतो आहे. इंडिया डिजीटल करिता कोट्यवधी रुपये खर्च होत आहेत. पण ज्याच्या भरोशावर आर्थिक डोलारा उभा आहे. त्याच्या सन्मानाकरिता साधे वीज बिल माफ करण्याची मानसिकता शासनात नाही का?, शेतकऱ्यांच्या मेहनतीवर प्रशासनावर ८१ टक्के उत्पन्नाचा खर्च केला जातो. यात थोडी वाढ करून वीज बिल भरले तर काय बिघडेल, असा संतप्त सवालही शेतकऱ्यांनी केला आहे. लोकप्रतिनिधींनी तात्काळ महावितरणशी संपर्क करून वीज नियमित करण्याचे प्रयत्न करावे अशी मागणी आहे. (वार्ताहर)शेतकऱ्यांकडे २००९-१० पासूनची वीज बिले थकीत आहेत. हे व्यापारीदृष्ट्या न पटणारे आहे. प्रत्येक हंगामात 'फुल नाही फुलाची पाकळी' समजून काही रक्कम वीज बिलापोटी भरली असती तर आज ही स्थिती आलीच नसती. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाने वीज कापली आहे. आजही थकीत रकमेतील काही रक्कम भरली गेली तर वीज पुरवठा पूर्ववत करता येईल. महावितरणशी शेतकऱ्यांनी मैत्री करावी. जमेल तेवढी रक्कम भरून कंपनीला सहकार्य करा.-पंकज आखाडे, अभियंता, महावितरण पालांदूर (चौ.)