शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Mahadev: सैन्याला मोठे यश! पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी मुसा मारला गेल्याची शक्यता, तीन दहशतवादी ठार
2
IND vs ENG: टीम इंडियाला मोठा धक्का! ऋषभ पंत पाचव्या कसोटीतून बाहेर, CSKच्या खेळाडूला संघात स्थान
3
९० दीच्या लाटेवर स्वार व्हायला आली! कायनेटीकची DX ईव्ही लाँच झाली, पहा किंमत आणि रेंज...
4
Nitin Shete: शनि शिंगणापूर संस्थानचे सीईओ नितीन शेटे यांनी संपवलं आयुष्य
5
Mumbai : 'Mhada अधिकाऱ्याची महिन्याला ४०-५० लाख काळी कमाई'; पत्नी वैतागली आणि संपवलं आयुष्य
6
"अल्लाह हू अकबर, विमानात बॉम्ब, मी तो उडवून देईन", प्रवाशाच्या धमकीनंतर विमानाचे आपत्कालीन लँडिंग
7
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
8
घरात मोठ्या आवाजात गाणी लावून पत्नीच्या डोक्यात टाकली वीट; हत्येनंतर पतीनेही संपवले जीवन
9
मेहनतीचं चीज! आई करते मजुरी, जेवणासाठी नव्हते पैसे, कोचिंगशिवाय ३ बहिणी UGC NET पास
10
जबरदस्त नफ्याचे संकेत देतोय GNG Electronics IPO चा GMP; शेअर्स अलॉट झालेत का, कसं चेक कराल?
11
परदेशात डॉक्टरी शिकून थेट भारतात प्रॅक्टीस करण्याचा मार्ग सोपा होणार; एनएमसी आणतेय नवे नियम...
12
आजीबाई जोमात, नागोबा कोमात; 8 फूट लांब सापाला अलगद पकडले, पाहा Video
13
IND vs ENG: "शुबमन गिलने जर शतक केलं नसतं तर..."; प्रशिक्षक गौतम गंभीरने ठणकावून सांगितलं
14
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
15
Shravan Somvar 2025: महादेवाला केतकीची फुले वाहू नये; त्यामागे आहे एक पौराणिक कथा!
16
'बॉर्डर २'मध्ये वरुण धवनसोबत झळकणार 'ही' अभिनेत्री, मेकर्सने केली अधिकृत घोषणा
17
एक फोन कॉल लीक, शिव मंदिरासाठी शत्रू बनले शेजारी; आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू
18
Pune Video: लाज लज्जाच सोडली! पुण्यात जोडप्याचे दुचाकीवरच अश्लील चाळे; व्हिडीओ व्हायरल 
19
अरे बापरे! फक्त डोळ्यांनाच नाही तर त्वचेसाठीही घातक आहे फोनच्या स्क्रीनमधून येणारी ब्लू लाईट
20
बारामती हळहळलं ! २४ तासात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, वडिलांनी देखील घेतला अखेरचा श्वास

महावितरणने कापली शेतकऱ्यांची वीज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2016 00:42 IST

परिसरातील सुमारे १,१०० शेतकऱ्यांवर महावितरणने वीज कपात करून ऐन दिवाळीत संकट ओढवले आहे.

ऐन दिवाळीत शेतकरी संकटात : भाजीपाला, धान उत्पादकांची पीक धोक्यातपालांदूर : परिसरातील सुमारे १,१०० शेतकऱ्यांवर महावितरणने वीज कपात करून ऐन दिवाळीत संकट ओढवले आहे. थकीत वीज बिलाची बाब पुढे करीत कालपासून कृषी जनित्र बंद केल्याने आज सकाळी सिंचनाकरिता कृषीपंपाला वीजच नाही. त्यामुळे वीज कार्यालयात तक्रारीकरिता गेले असता वीज मुद्दामच कापल्याचे कळले.शासनाच्या तुघलकी धोरणाने खरच शेतकरी बेजार झाला आहे. सगळ्या बारा भानगडीचा भागीदार शेतकऱ्यांनाच केल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. सध्यस्थितीत धान कापणी, बांधणी, मळणीचा हंगाम जोमात सुरु आहे. रब्बीकरिता जमीन तयार करून पाणी देणे अगत्याचे आहे. बागायतीत प्रत्येक दिवशी पाणी भाज्यांना गरजेचे आहे. अशावेळी वीज कापून महावितरणने शेतकऱ्यांना संकटाचा खाईत ढकलले आहे. धान विक्रीकरिता तयार आहेत. पण हमीभाव केंद्र पालांदुरात सुरु न झाल्याने धान पडून आहेत. खासगीत १,३०० - १,३५० रुपये भावाने खरेदी सुरु आहे. दिवाळीत तात्पुरत्या गरजेकरिता १०, ५ पोती धान खासगीत विकून दिवाळी साजरी करण्याचा प्रयत्न सुरु असताना मध्येच महावितरणने वीज बिलाचा भरणा करण्याचे सांगितले. त्यामुळे दिवाळीच्या आनंदावर विरजण पडले आहे. नियमित मिटर रिडींग न घेणे, अव्वाच्या सव्वा बिल देणे, राजकारण्यांकडून वीज बिल माफ करण्याचे खोटे बोलणे, मागील ३ वर्षाचे दुष्काळ डोक्यावर असणे, शेतीमालाचा भाव नसणे आदी कारणाने शेतकरी नियमित वीज बिल भरत नाही. ही वास्तविकता शासनाला प्रामाणिकपणे जाण असूनही वीज कापू देणे म्हणजे पाठीत खंजीर खुपसण्यासारखेच झाले. उद्योगधंद्यांना वीज माफक व पुरेशी पुरविली जातो. प्रसंगी वीज बिल, कर्ज माफ केल्या जाते. मग शेतकऱ्यांना का नाही? असा प्रश्न देशाचा आधारस्तंभ असलेला शेतकरी विचारतो आहे. इंडिया डिजीटल करिता कोट्यवधी रुपये खर्च होत आहेत. पण ज्याच्या भरोशावर आर्थिक डोलारा उभा आहे. त्याच्या सन्मानाकरिता साधे वीज बिल माफ करण्याची मानसिकता शासनात नाही का?, शेतकऱ्यांच्या मेहनतीवर प्रशासनावर ८१ टक्के उत्पन्नाचा खर्च केला जातो. यात थोडी वाढ करून वीज बिल भरले तर काय बिघडेल, असा संतप्त सवालही शेतकऱ्यांनी केला आहे. लोकप्रतिनिधींनी तात्काळ महावितरणशी संपर्क करून वीज नियमित करण्याचे प्रयत्न करावे अशी मागणी आहे. (वार्ताहर)शेतकऱ्यांकडे २००९-१० पासूनची वीज बिले थकीत आहेत. हे व्यापारीदृष्ट्या न पटणारे आहे. प्रत्येक हंगामात 'फुल नाही फुलाची पाकळी' समजून काही रक्कम वीज बिलापोटी भरली असती तर आज ही स्थिती आलीच नसती. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाने वीज कापली आहे. आजही थकीत रकमेतील काही रक्कम भरली गेली तर वीज पुरवठा पूर्ववत करता येईल. महावितरणशी शेतकऱ्यांनी मैत्री करावी. जमेल तेवढी रक्कम भरून कंपनीला सहकार्य करा.-पंकज आखाडे, अभियंता, महावितरण पालांदूर (चौ.)