शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

महावितरणने कापली शेतकऱ्यांची वीज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2016 00:42 IST

परिसरातील सुमारे १,१०० शेतकऱ्यांवर महावितरणने वीज कपात करून ऐन दिवाळीत संकट ओढवले आहे.

ऐन दिवाळीत शेतकरी संकटात : भाजीपाला, धान उत्पादकांची पीक धोक्यातपालांदूर : परिसरातील सुमारे १,१०० शेतकऱ्यांवर महावितरणने वीज कपात करून ऐन दिवाळीत संकट ओढवले आहे. थकीत वीज बिलाची बाब पुढे करीत कालपासून कृषी जनित्र बंद केल्याने आज सकाळी सिंचनाकरिता कृषीपंपाला वीजच नाही. त्यामुळे वीज कार्यालयात तक्रारीकरिता गेले असता वीज मुद्दामच कापल्याचे कळले.शासनाच्या तुघलकी धोरणाने खरच शेतकरी बेजार झाला आहे. सगळ्या बारा भानगडीचा भागीदार शेतकऱ्यांनाच केल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. सध्यस्थितीत धान कापणी, बांधणी, मळणीचा हंगाम जोमात सुरु आहे. रब्बीकरिता जमीन तयार करून पाणी देणे अगत्याचे आहे. बागायतीत प्रत्येक दिवशी पाणी भाज्यांना गरजेचे आहे. अशावेळी वीज कापून महावितरणने शेतकऱ्यांना संकटाचा खाईत ढकलले आहे. धान विक्रीकरिता तयार आहेत. पण हमीभाव केंद्र पालांदुरात सुरु न झाल्याने धान पडून आहेत. खासगीत १,३०० - १,३५० रुपये भावाने खरेदी सुरु आहे. दिवाळीत तात्पुरत्या गरजेकरिता १०, ५ पोती धान खासगीत विकून दिवाळी साजरी करण्याचा प्रयत्न सुरु असताना मध्येच महावितरणने वीज बिलाचा भरणा करण्याचे सांगितले. त्यामुळे दिवाळीच्या आनंदावर विरजण पडले आहे. नियमित मिटर रिडींग न घेणे, अव्वाच्या सव्वा बिल देणे, राजकारण्यांकडून वीज बिल माफ करण्याचे खोटे बोलणे, मागील ३ वर्षाचे दुष्काळ डोक्यावर असणे, शेतीमालाचा भाव नसणे आदी कारणाने शेतकरी नियमित वीज बिल भरत नाही. ही वास्तविकता शासनाला प्रामाणिकपणे जाण असूनही वीज कापू देणे म्हणजे पाठीत खंजीर खुपसण्यासारखेच झाले. उद्योगधंद्यांना वीज माफक व पुरेशी पुरविली जातो. प्रसंगी वीज बिल, कर्ज माफ केल्या जाते. मग शेतकऱ्यांना का नाही? असा प्रश्न देशाचा आधारस्तंभ असलेला शेतकरी विचारतो आहे. इंडिया डिजीटल करिता कोट्यवधी रुपये खर्च होत आहेत. पण ज्याच्या भरोशावर आर्थिक डोलारा उभा आहे. त्याच्या सन्मानाकरिता साधे वीज बिल माफ करण्याची मानसिकता शासनात नाही का?, शेतकऱ्यांच्या मेहनतीवर प्रशासनावर ८१ टक्के उत्पन्नाचा खर्च केला जातो. यात थोडी वाढ करून वीज बिल भरले तर काय बिघडेल, असा संतप्त सवालही शेतकऱ्यांनी केला आहे. लोकप्रतिनिधींनी तात्काळ महावितरणशी संपर्क करून वीज नियमित करण्याचे प्रयत्न करावे अशी मागणी आहे. (वार्ताहर)शेतकऱ्यांकडे २००९-१० पासूनची वीज बिले थकीत आहेत. हे व्यापारीदृष्ट्या न पटणारे आहे. प्रत्येक हंगामात 'फुल नाही फुलाची पाकळी' समजून काही रक्कम वीज बिलापोटी भरली असती तर आज ही स्थिती आलीच नसती. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाने वीज कापली आहे. आजही थकीत रकमेतील काही रक्कम भरली गेली तर वीज पुरवठा पूर्ववत करता येईल. महावितरणशी शेतकऱ्यांनी मैत्री करावी. जमेल तेवढी रक्कम भरून कंपनीला सहकार्य करा.-पंकज आखाडे, अभियंता, महावितरण पालांदूर (चौ.)