शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी सक्तीच्या भूमिकेवरून साहित्यिक एकवटले; कवीने परत केला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार
2
"आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, बाकी मेरे पीछे आओ" परराष्ट्र धोरणावरून काँग्रेसची सरकारवर टीका
3
बाजारात येणाऱ्या जाणाऱ्या महिलांना पाहून करत होता अश्लील इशारे;२० वर्षीय तरुणाला पोलिसांनी केली अटक
4
Inflation: २० वर्षांनंतर एक कोटींचं मूल्य असेल फक्त २५ लाख; महागाई कशी कमी करतेय तुमच्या पैशांचं मोल?
5
'आम्हाला तिथेच लढायचेय' इराण-इस्रायल, अमेरिका युद्धात WWE का इरेला पेटला...
6
Ashadhi Ekadashi 2025: पांडुरंगाने कानात मकरकुंडले का धारण केली? मत्स्यावताराशी काही संबंध?
7
"तुम्ही विमान उडवण्याच्या लायक नाही, जा बूट...", इंडिगोच्या प्रशिक्षणार्थी पायलटचा वरिष्ठ अधिकाऱ्यांवर जातीभेदाचा आरोप; एफआयआर दाखल
8
Cluster Bomb: क्लस्टर बॉम्ब म्हणजे काय, १२३ देशांमध्ये त्यावर बंदी का?
9
गुजरातमध्ये 'आप'कडून मोदी आणि भाजपाला जबर धक्का, पोटनिवडणुकीत मिळवला दणदणीत विजय
10
ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार देण्याची शिफारस आली अंगलट; पाकिस्तानी नेत्यांची पुन्हा फजिती
11
तुमचेही पैसे रिअल इस्टेटमध्ये अडकलेत का? फक्त १% लोकच कमवतायत नफा! तुम्ही 'या' चुका तर करत नाहीये ना?
12
Iran Israel War: मोठ्या संकटात अडकलाय भारत; ३.६ लाख कोटींचा आकडा का घाबरवतोय?
13
Assembly Bypoll Result 2025: पोटनिवडणुकांचे निकाल! गुजरातमध्ये एका जागेवर आप भाजपाला टक्कर देतेय; पंजाबमध्ये संजीव अरोरा आघाडीवर
14
नवीन युगाची सुरुवात! ड्रायव्हरशिवाय धावल्या गाड्या; Tesla ची Robotaxi सेवा सुरू...
15
सोनम रघुवंशीला 'वाचवणारा आणि लपवणारा' लोकेंद्र तोमर कोण? राजा हत्याकांडात आणखी एक मोठा खुलासा
16
Devendra Fadnavis: राहुल गांधींना मेक इन इंडिया माहिती नाही, त्यांनी गृहपाठ करायला हवा; फडणवीसांचा टोला!
17
तुमचा पैसा 'रॉकेट' बनवणार! 'या' ५ म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याची हीच योग्य वेळ? पाहा संपूर्ण यादी!
18
पुतण्याच्या प्रेमात काकी झाली वेडी, पती आणि तीन वर्षांच्या मुलीला सोडलं, पुतण्यासोबत लग्न केलं
19
नितीशकुमारांची सत्ता धोक्यात? नव्या सर्व्हेतून धक्कादायक 'लाट'; बिहार निवडणुकीपूर्वीच....
20
Maharashtra Politics : ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसणार, भास्कर जाधव मोठा निर्णय घेणार?, संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं

खासगी गट नंबरमधील उद्योगाला महावितरणचा शॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 00:00 IST

महावितरणच्या सिडको उपकेंद्रातील रोहित्र जळाल्याने वडगाव कोल्हाटीमधील खाजगी गट नंबरमधील उद्योगाचा वीजपुरवठा तब्बल २४ तास खंडित होता. उत्पादन ठप्प पडल्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप लघु उद्योजकांनी केला आहे.

ठळक मुद्देवडगाव : ट्रान्सफार्मर जळाल्याने २४ तास वीजपुरवठा खंडित, उत्पादन बंद पडल्याने मोठे नुकसान

वाळूज महानगर : महावितरणच्या सिडको उपकेंद्रातील रोहित्र जळाल्याने वडगाव कोल्हाटीमधील खाजगी गट नंबरमधील उद्योगाचा वीजपुरवठा तब्बल २४ तास खंडित होता. उत्पादन ठप्प पडल्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप लघु उद्योजकांनी केला आहे.एमआयडीसीत भूखंड मिळत नसल्याने अनेक नवउद्योजकांनी वडगावच्या खाजगी गट नंबरमधील भूखंडावर छोटे-मोठे व्यवसाय थाटले आहेत. मोठ्या कारखान्यांकडून मिळणाऱ्या कामावर हे उद्योग चालतात. महावितरणच्या सिडको उपकेंद्रातील रोहित्राला रविवारी मध्यरात्री आग लागली. या आगीत रोहित्र पूर्ण जळाल्याने परिसरातील वीजपुरवठा बंद होता. याचा सर्वाधिक फटका वडगाव कोल्हाटी खाजगी गट नंबरमधील उद्योजकांना बसला. त्रस्त उद्योजकांनी महावितरण कार्यालय गाठून वीजपुरवठा सुरू करण्याची मागणी केली. लवकरच वीजपुरवठा पूर्ववत केला जाईल, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी उद्योजकांना दिले. परंतु दुुरुस्तीचे काम पूर्ण न झाल्यामुळे रविवारी दिवसभर या उद्योगाचा वीजपुरवठा बंदच होता.सोमवारी पहाटे वीजपुरवठा सुरू झाल्यावरही विजेची सतत ये-जा सुरू असल्याने यंत्र बंद पडून जॉब खराब झाले. पाटे तुटले. याचा आर्थिक भुर्दंडही उद्योजकांना सहन करावा लागला. महावितरणमुळे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप येथील माधव हादवे, श्रीकांत भांगे, महेंद्र आव्हाड, अभिजित भालेराव, रवींद्र देवरे, विठ्ठल गजरे, संदीप आग्रे, माणिक देशमुख, आश्विन राचतवार, सचिन देशमुख, राजाराम गडरी, शंकर देशमुख, दीपक डहाळे, शरद देशमुख, श्याम सोमवंशी आदी उद्योजकांनी केला आहे.महावितरणचे उपअभियंता प्रशांत तोडकर यांंनी सांगितले की, सिडको उपकेंद्रातील ५ एमव्हीएचा ट्रान्सफार्मर जळाला. नवीन ट्रान्सफार्मर बसविण्यासाठी वेळ लागल्याने उद्योगाचा वीजपुरवठा सुरू करण्यासाठी २४ तास लागले.उद्योग क्षेत्रासाठी स्वतंत्र वीज द्यावी....वडगावातील गट नंबर ६७ व ७० मध्ये आॅटोमोबाईल्स, पॅकेजिंग, टूल रूम, मॅन्युफॅक्चरिंग, वेल्डिंग, प्रेस शॉप, फोजर््िांग आदी जवळपास ३५० ते ४०० छोटे-मोठे उद्योग आहेत. या उद्योगांना महावितरणच्या उपकेंद्रातूनच वीजपुरवठा होतो. वापर अधिक असल्याने या भागातील वीजपुरवठा सतत खंडित होतो. याचा परिणाम उत्पादनांवर होतो. येथील त्रस्त उद्योजकांनी महावितरणकडे स्वतंत्र वीज जोडणीची मागणी केली आहे. पावसाळ्यात वीजपुरवठा खंडित होऊन उत्पादन बंद पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. या उद्योग क्षेत्रासाठी स्वतंत्र वीज द्यावी, अशी मागणी उद्योजकांमधून केली जात आहे.काय म्हणतात उद्योजक....वर्कआॅर्डर रद्द होण्याची भीती....मोठ्या कारखान्यांवरच लघु उद्योग अवलंबून आहेत. मोठ्या कारखान्याची वेळेत आॅर्डर पूर्ण करणे गरजेचे असते. आम्ही तोडून काम घेतो. वेळेत आॅर्डर पूर्ण केली नाही तर काम भेटत नाही. वीजपुरवठा सतत खंडित होत असल्याने उत्पादनांवर परिणाम होत आहे. त्यामुळे वर्कआॅर्डर रद्द होण्याची भीती आहे.रवींद्र देवरे, लघु उद्योजक--------------उद्योग चालविणे अवघड....या भागात १५ ते २० विद्युत डीपी असून, त्यावर १ हजारांच्या जवळपास कनेक्शन आहेत. वीजपुरवठा सतत खंडित होत असल्याने तासन्तास कारखाने बंद ठेवावे लागत आहेत. त्यामुळे मोठ्या कारखान्यांच्या आॅर्डर वेळेत पूर्ण करणे अवघड झाले आहे. रविवारी उत्पादन बंद पडल्याने मिळालेली आॅर्डर गेली. हा प्रकार असाच सुरू राहिला तर लघु उद्योजकांना उद्योग चालविणे कठीण आहे.श्रीकांत भांगे, लघु उद्योजक------------उद्योजकांचे नुकसान....उद्योगाचा जवळपास २४ तास वीजपुरवठा बंद होता. कारखाने बंद ठेवावे लागल्याने उत्पादन घेता आले नाही. त्याचबरोबर कामगारही कंपनीत बसून राहिल्याने त्यांच्या वेतनाचा भुर्दंडही उद्योजकांना सोसावा लागला. अनेकांना कामाच्या वर्कआॅर्डर वेळेत पूर्ण करता आल्या नाहीत. केवळ वीज नसल्यामुळे या भागातील लघु उद्योजकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले.माधव हादवे, लघु उद्योजक

टॅग्स :AurangabadऔरंगाबादmahavitaranमहावितरणMIDCएमआयडीसी