शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

खासदार-आमदारांमध्ये शाब्दिक खडाजंगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 00:35 IST

गणेश विजर्सन मिरवणुकीतील घोषणाबाजीवरुन शिवसेनेचे खा़ बंडू जाधव आणि आ़ डॉ़ राहुल पाटील यांच्यात ५ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली़ त्यामुळे शिवसेनेतील वाद पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी चव्हाट्यावर आला असून, निष्ठावंत शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : गणेश विजर्सन मिरवणुकीतील घोषणाबाजीवरुन शिवसेनेचे खा़ बंडू जाधव आणि आ़ डॉ़ राहुल पाटील यांच्यात ५ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली़ त्यामुळे शिवसेनेतील वाद पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी चव्हाट्यावर आला असून, निष्ठावंत शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे़परभणी जिल्हा हा शिवसेनेचा गड असला तरी गेल्या काही वर्षांपासून शिवसेनेतील अंतर्गत वाद सातत्याने चव्हाट्यावर येत आहेत़ विधानसभा निवडणुकीनंतर खा़ बंडू जाधव आणि आ़ डॉ़ राहुल पाटील यांच्यात मतभेद निर्माण झाले़ त्यानंतर या मतभेदाचे रुपांतर वादामध्ये झाले; परंतु, हे वाद सार्वजनिक ठिकाणी कधी पहावयास मिळाले नाहीत़ परंतु, मंगळवारी रात्री ११ च्या सुमारास शहरातील शिवाजी चौकात गणेश विसर्जन मिरवणुकीतील घोषणाबाजीवरुन या दोन्ही नेत्यांमध्ये जोरदार शाब्दिक बाचाबाची झाल्याचे पहावयास मिळाले़ प्रत्यक्षदर्शी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील गणेश मंडळांचे देखावे आणि श्रींच्या मूर्ती विसर्जन मार्गावरून पुढे जात होत्या़ यावेळी शिवाजी चौक येथे गणेश मंडळ पदाधिकºयांचे स्वागत करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने मंच उभारण्यात आला होता़ मंचावर आ़ डॉ़ राहुल पाटील, जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आणेराव, सह संपर्कप्रमुख डॉ़ विवेक नावंदर, शहरप्रमुख ज्ञानेश्वर पवार, अनिल डहाळे, नवनीत पाचपोर आदींची उपस्थिती होती़ यावेळी राजे संभाजी गणेश मंडळाची मिरवणूक या ठिकाणी दाखल झाली़ मिरवणुकीत खा़ बंडू जाधव होते़ शिवसेनेच्या व्यासपीठावरील सूत्रसंचालकाने खा़ जाधव यांना व्यासपीठावर येण्याची विनंती केली़ त्यानंतर खा़ जाधव हे व्यासपीठावर जाऊन बसले़ काही वेळानंतर मिरवणुकीतील उपस्थितांपैकी काही कार्यकर्त्यांनी खा़ जाधव यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या़ यावेळी या कार्यकर्त्यांना आ़ राहुल पाटील यांनी समजविण्याचा प्रयत्न केला़ परंतु, कार्यकर्ते थांबत नसल्याने बाचाबाची वाढली़ यावेळी खा़ जाधव व आ़ पाटील यांच्यातच शाब्दिक खडाजंगी सुरू झाली़ त्यामुळे एकच गोंधळ उडाला़ तणाव निर्माण झाल्याने तातडीने शहर पोलीस उपअधीक्षक संजय परदेशी शिवसेनेच्या व्यासपीठावर दाखल झाले़ त्यांनी व्यासपीठावरील माईक ताब्यात घेऊन सर्वांना शांत राहण्याचे आवाहन केले़ परिस्थिती लक्षात घेऊन पोलिसांनी सुमारे २०० ते २५० कर्मचाºयांचा आगाऊ बंदोबस्त मागवून घेतला़ काही वेळानंतर खा़जाधव हे राजे संभाजी गणेश मंडळाच्या मिरवणुकीसोबत निघून गेले़ त्यानंतर रात्री १२़२० च्या सुमारास सर्वात शेवटी असलेल्या नागराज गणेश मंडळाच्या मिरवणुकीनंतर आ़ डॉ़ राहुल पाटील हेही कार्यकर्त्यांसह निघून गेले़