शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

खासदार-आमदारांमध्ये शाब्दिक खडाजंगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 00:35 IST

गणेश विजर्सन मिरवणुकीतील घोषणाबाजीवरुन शिवसेनेचे खा़ बंडू जाधव आणि आ़ डॉ़ राहुल पाटील यांच्यात ५ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली़ त्यामुळे शिवसेनेतील वाद पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी चव्हाट्यावर आला असून, निष्ठावंत शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : गणेश विजर्सन मिरवणुकीतील घोषणाबाजीवरुन शिवसेनेचे खा़ बंडू जाधव आणि आ़ डॉ़ राहुल पाटील यांच्यात ५ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली़ त्यामुळे शिवसेनेतील वाद पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी चव्हाट्यावर आला असून, निष्ठावंत शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे़परभणी जिल्हा हा शिवसेनेचा गड असला तरी गेल्या काही वर्षांपासून शिवसेनेतील अंतर्गत वाद सातत्याने चव्हाट्यावर येत आहेत़ विधानसभा निवडणुकीनंतर खा़ बंडू जाधव आणि आ़ डॉ़ राहुल पाटील यांच्यात मतभेद निर्माण झाले़ त्यानंतर या मतभेदाचे रुपांतर वादामध्ये झाले; परंतु, हे वाद सार्वजनिक ठिकाणी कधी पहावयास मिळाले नाहीत़ परंतु, मंगळवारी रात्री ११ च्या सुमारास शहरातील शिवाजी चौकात गणेश विसर्जन मिरवणुकीतील घोषणाबाजीवरुन या दोन्ही नेत्यांमध्ये जोरदार शाब्दिक बाचाबाची झाल्याचे पहावयास मिळाले़ प्रत्यक्षदर्शी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील गणेश मंडळांचे देखावे आणि श्रींच्या मूर्ती विसर्जन मार्गावरून पुढे जात होत्या़ यावेळी शिवाजी चौक येथे गणेश मंडळ पदाधिकºयांचे स्वागत करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने मंच उभारण्यात आला होता़ मंचावर आ़ डॉ़ राहुल पाटील, जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आणेराव, सह संपर्कप्रमुख डॉ़ विवेक नावंदर, शहरप्रमुख ज्ञानेश्वर पवार, अनिल डहाळे, नवनीत पाचपोर आदींची उपस्थिती होती़ यावेळी राजे संभाजी गणेश मंडळाची मिरवणूक या ठिकाणी दाखल झाली़ मिरवणुकीत खा़ बंडू जाधव होते़ शिवसेनेच्या व्यासपीठावरील सूत्रसंचालकाने खा़ जाधव यांना व्यासपीठावर येण्याची विनंती केली़ त्यानंतर खा़ जाधव हे व्यासपीठावर जाऊन बसले़ काही वेळानंतर मिरवणुकीतील उपस्थितांपैकी काही कार्यकर्त्यांनी खा़ जाधव यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या़ यावेळी या कार्यकर्त्यांना आ़ राहुल पाटील यांनी समजविण्याचा प्रयत्न केला़ परंतु, कार्यकर्ते थांबत नसल्याने बाचाबाची वाढली़ यावेळी खा़ जाधव व आ़ पाटील यांच्यातच शाब्दिक खडाजंगी सुरू झाली़ त्यामुळे एकच गोंधळ उडाला़ तणाव निर्माण झाल्याने तातडीने शहर पोलीस उपअधीक्षक संजय परदेशी शिवसेनेच्या व्यासपीठावर दाखल झाले़ त्यांनी व्यासपीठावरील माईक ताब्यात घेऊन सर्वांना शांत राहण्याचे आवाहन केले़ परिस्थिती लक्षात घेऊन पोलिसांनी सुमारे २०० ते २५० कर्मचाºयांचा आगाऊ बंदोबस्त मागवून घेतला़ काही वेळानंतर खा़जाधव हे राजे संभाजी गणेश मंडळाच्या मिरवणुकीसोबत निघून गेले़ त्यानंतर रात्री १२़२० च्या सुमारास सर्वात शेवटी असलेल्या नागराज गणेश मंडळाच्या मिरवणुकीनंतर आ़ डॉ़ राहुल पाटील हेही कार्यकर्त्यांसह निघून गेले़