शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

खा. जलील यांच्याकडून औरंगपुरा- बारुदगरनाला रस्त्याची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2020 18:34 IST

शहराच्या मध्यभागी असलेल्या व मुख्य बाजारपेठांना जोडणारा औरंगपुरा, प्रिया मार्केट, बारुदगरनाला, सिटी चौक  या रस्त्याचे काम  मागच्या अनेक वर्षांपासून प्रलंबितच आहे. या कामाला  लवकरच एमआयडीसीकडून सुरूवात करण्यात येणार असून या  अनुशंगाने खा. इम्तियाज  जलील यांनी शनिवारी या रस्त्याची पाहणी केली आणि संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

औरंगाबाद : शहराच्या मध्यभागी असलेल्या व मुख्य बाजारपेठांना जोडणारा औरंगपुरा, प्रिया मार्केट, बारुदगरनाला, सिटी चौक  या रस्त्याचे काम  मागच्या अनेक वर्षांपासून प्रलंबितच आहे. या कामाला  लवकरच एमआयडीसीकडून सुरूवात करण्यात येणार असून या  अनुशंगाने खा. इम्तियाज  जलील यांनी शनिवारी या रस्त्याची पाहणी केली आणि संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

औरंगाबाद शहरातील मुख्य रस्ते तयार करण्यासाठी शासनाने १५० कोटींच्या विशेष निधीची तरतुद करुन त्यास मान्यता दिली होती. सदरील निधीतुन शहरातील मुख्य रस्त्यांचे सिमेंट क्राँक्रिटिकरण महानगरपालिका, एमआयडीसी व एमएसआरडीसी या तीन विभागांकडून करण्यात येणार आहे. १५० कोटीतुन एमआयडीसी विभागाकडे ५० कोटी निधी वर्ग करण्यात आला असुन त्या निधीतुन सदरील सिमेंट क्राँक्रिट रस्त्याच्या कामाला सुरुवात होणार आहे.

रस्त्याच्या कामासाठी मार्किंग केल्यानंतर अतिक्रमण काढण्यात येणार असून त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन खासदार जलील यांनी केले. हवामान खात्याच्या अंदाजानुसार आठ दिवसात पाऊस थांबणार असून त्यानंतर अडथळा निर्माण करणारे विद्युत पोल व वाहिन्या महावितरणकडून हटविण्याच्या कामास सुरुवात होईल, असे ते म्हणाले.

रस्त्याच्या कामांची गुणवत्ता व दर्जा तपासण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात येणार असून विशेष पथकाला जर कोणत्याही रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे आढळले, तर संबंधित कंत्राटदार व अधिकारी यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करुन निधीची वसुली करण्यात येईल, असेही जलील यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Imtiaz Jalilइम्तियाज जलीलroad safetyरस्ते सुरक्षाGulmandiगुलमंडी