शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

औरंगाबादेत महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्यासाठी १८ मे पासून आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 15:46 IST

पुढील जयंतीपर्यंत बसवेश्वरांच्या पुतळ्याचे काम सुरू झाले पाहिजे. तोपर्यंत महापौरांना स्वस्थ बसू देणार नसून मे महिन्यात आंदोलन केले जाईल,असा इशारा शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे यांनी दिला.

औरंगाबाद : टीव्ही सेंटर चौकातील स्वामी विवेकानंद उद्यानात ११ वर्षे उलटूनही जगत््ज्योती महात्मा बसवेश्वर यांचा पुतळा बसवू शकले नाहीत. महापालिकेच्या डोक्यात बसलेला कचरा काढला तरच पुतळा बसेल. प्रत्येक वेळी जयंतीच्या दिवशी नेतमंडळी पुढच्या वर्षी पुतळा बसेल म्हणतात. परंतु आता पुढील जयंतीपर्यंत बसवेश्वरांच्या पुतळ्याचे काम सुरू झाले पाहिजे. तोपर्यंत महापौरांना स्वस्थ बसू देणार नसून मे महिन्यात आंदोलन केले जाईल,असा इशारा शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे यांनी दिला.

शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेतर्फे बुधवारी (दि.१८) सकाळी ९ वाजता महात्मा बसवेश्वर चौक (आकाशवाणी) येथे अभिवादन सोहळा, ध्वजारोहण कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थावरून प्रा. धोंडे बोलत होते. कार्यक्रमास आ. अतुल सावे, अनिल मकरिये, जगत्ज्योती महात्मा बसवेश्वर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष गोविंदअप्पा सोलपुरे, कार्याध्यक्ष शिवा स्वामी कीर्तनकार, अशोक फुलशंकर, अशोक बसापुरे, उमेशअप्पा दारुवाले, उत्तमअप्पा चिकाळे, रवींद्रअप्पा रेडे, प्रभाकर पटणे, शिवदास तोडकर, मारुती धुपे आदी उपस्थित होते. याप्रसंगी प्रा. धोंडे म्हणाले, गळ्यात लिंग नाही, अशा लोकांनी लिंगायत धर्माची मागणी केली. गर्दीपेक्षा विचारांची दर्दी महत्वाची असून समाजाने जागृत राहिले पाहिजे. महात्मा बसवेश्वरांचा पुतळा बसविण्यासाठी २००७ मध्ये नारळ फोडले. परंतु अजूनही पुतळा बसवू शकले नाही. महापालिका कचऱ्यानेच बेजार झाली आहे. महापालिकेच्या डोक्यात कचरा बसलेला आहे. पुतळ्याचे काम लवकरात लवकर सुरू झाले पाहिजे, त्यासाठी १८ मेपासून महापालिकेसमोर आंदोलन केले जाईल, असे ते म्हणाले.

टॅग्स :Lingayat Mahamorchaलिंगायत महामोर्चाshobha yatraशोभायात्राAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका