शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहलगाममध्ये २६ पर्यटकांची हत्या करणारे ते तीन दहशतवादी मारले', अमित शाहांची लोकसभेत माहिती
2
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
3
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
4
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
5
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
6
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
7
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
8
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
9
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
10
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
11
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
12
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
13
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
14
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
15
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
16
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
17
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
18
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
19
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
20
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता

औरंगाबादेत महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्यासाठी १८ मे पासून आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 15:46 IST

पुढील जयंतीपर्यंत बसवेश्वरांच्या पुतळ्याचे काम सुरू झाले पाहिजे. तोपर्यंत महापौरांना स्वस्थ बसू देणार नसून मे महिन्यात आंदोलन केले जाईल,असा इशारा शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे यांनी दिला.

औरंगाबाद : टीव्ही सेंटर चौकातील स्वामी विवेकानंद उद्यानात ११ वर्षे उलटूनही जगत््ज्योती महात्मा बसवेश्वर यांचा पुतळा बसवू शकले नाहीत. महापालिकेच्या डोक्यात बसलेला कचरा काढला तरच पुतळा बसेल. प्रत्येक वेळी जयंतीच्या दिवशी नेतमंडळी पुढच्या वर्षी पुतळा बसेल म्हणतात. परंतु आता पुढील जयंतीपर्यंत बसवेश्वरांच्या पुतळ्याचे काम सुरू झाले पाहिजे. तोपर्यंत महापौरांना स्वस्थ बसू देणार नसून मे महिन्यात आंदोलन केले जाईल,असा इशारा शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे यांनी दिला.

शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेतर्फे बुधवारी (दि.१८) सकाळी ९ वाजता महात्मा बसवेश्वर चौक (आकाशवाणी) येथे अभिवादन सोहळा, ध्वजारोहण कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थावरून प्रा. धोंडे बोलत होते. कार्यक्रमास आ. अतुल सावे, अनिल मकरिये, जगत्ज्योती महात्मा बसवेश्वर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष गोविंदअप्पा सोलपुरे, कार्याध्यक्ष शिवा स्वामी कीर्तनकार, अशोक फुलशंकर, अशोक बसापुरे, उमेशअप्पा दारुवाले, उत्तमअप्पा चिकाळे, रवींद्रअप्पा रेडे, प्रभाकर पटणे, शिवदास तोडकर, मारुती धुपे आदी उपस्थित होते. याप्रसंगी प्रा. धोंडे म्हणाले, गळ्यात लिंग नाही, अशा लोकांनी लिंगायत धर्माची मागणी केली. गर्दीपेक्षा विचारांची दर्दी महत्वाची असून समाजाने जागृत राहिले पाहिजे. महात्मा बसवेश्वरांचा पुतळा बसविण्यासाठी २००७ मध्ये नारळ फोडले. परंतु अजूनही पुतळा बसवू शकले नाही. महापालिका कचऱ्यानेच बेजार झाली आहे. महापालिकेच्या डोक्यात कचरा बसलेला आहे. पुतळ्याचे काम लवकरात लवकर सुरू झाले पाहिजे, त्यासाठी १८ मेपासून महापालिकेसमोर आंदोलन केले जाईल, असे ते म्हणाले.

टॅग्स :Lingayat Mahamorchaलिंगायत महामोर्चाshobha yatraशोभायात्राAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका