शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
3
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
4
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
5
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
6
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
7
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
8
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
10
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
11
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
12
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
13
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
14
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
16
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
17
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
18
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
19
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
20
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!

औरंगाबादेत महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्यासाठी १८ मे पासून आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 15:46 IST

पुढील जयंतीपर्यंत बसवेश्वरांच्या पुतळ्याचे काम सुरू झाले पाहिजे. तोपर्यंत महापौरांना स्वस्थ बसू देणार नसून मे महिन्यात आंदोलन केले जाईल,असा इशारा शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे यांनी दिला.

औरंगाबाद : टीव्ही सेंटर चौकातील स्वामी विवेकानंद उद्यानात ११ वर्षे उलटूनही जगत््ज्योती महात्मा बसवेश्वर यांचा पुतळा बसवू शकले नाहीत. महापालिकेच्या डोक्यात बसलेला कचरा काढला तरच पुतळा बसेल. प्रत्येक वेळी जयंतीच्या दिवशी नेतमंडळी पुढच्या वर्षी पुतळा बसेल म्हणतात. परंतु आता पुढील जयंतीपर्यंत बसवेश्वरांच्या पुतळ्याचे काम सुरू झाले पाहिजे. तोपर्यंत महापौरांना स्वस्थ बसू देणार नसून मे महिन्यात आंदोलन केले जाईल,असा इशारा शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे यांनी दिला.

शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेतर्फे बुधवारी (दि.१८) सकाळी ९ वाजता महात्मा बसवेश्वर चौक (आकाशवाणी) येथे अभिवादन सोहळा, ध्वजारोहण कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थावरून प्रा. धोंडे बोलत होते. कार्यक्रमास आ. अतुल सावे, अनिल मकरिये, जगत्ज्योती महात्मा बसवेश्वर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष गोविंदअप्पा सोलपुरे, कार्याध्यक्ष शिवा स्वामी कीर्तनकार, अशोक फुलशंकर, अशोक बसापुरे, उमेशअप्पा दारुवाले, उत्तमअप्पा चिकाळे, रवींद्रअप्पा रेडे, प्रभाकर पटणे, शिवदास तोडकर, मारुती धुपे आदी उपस्थित होते. याप्रसंगी प्रा. धोंडे म्हणाले, गळ्यात लिंग नाही, अशा लोकांनी लिंगायत धर्माची मागणी केली. गर्दीपेक्षा विचारांची दर्दी महत्वाची असून समाजाने जागृत राहिले पाहिजे. महात्मा बसवेश्वरांचा पुतळा बसविण्यासाठी २००७ मध्ये नारळ फोडले. परंतु अजूनही पुतळा बसवू शकले नाही. महापालिका कचऱ्यानेच बेजार झाली आहे. महापालिकेच्या डोक्यात कचरा बसलेला आहे. पुतळ्याचे काम लवकरात लवकर सुरू झाले पाहिजे, त्यासाठी १८ मेपासून महापालिकेसमोर आंदोलन केले जाईल, असे ते म्हणाले.

टॅग्स :Lingayat Mahamorchaलिंगायत महामोर्चाshobha yatraशोभायात्राAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका