शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

जिल्हाभरात किसान सभेचे आंदोलन

By admin | Updated: May 17, 2016 00:09 IST

परभणी : अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने १६ मे पासून गाव पातळीवर उपोषण आंदोलन सुरू केले असून सोमवारी जिल्ह्यातील २० गावांत शेतकऱ्यांनी आंदोलन केले.

परभणी : अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने १६ मे पासून गाव पातळीवर उपोषण आंदोलन सुरू केले असून सोमवारी जिल्ह्यातील २० गावांत शेतकऱ्यांनी आंदोलन केले. तीन वर्षांपासून मराठवाड्यातील शेतकरी नैसर्गिक संकटात सापडले असून, त्यांना प्रशासनाने मदत करण्याऐवजी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने संपूर्ण कर्ज माफ करा, शेती व्यवसायासाठी बिनव्याजी एकरी ५० हजार रुपये भांडवल द्या, ज्या खाजगी बँका शेतकऱ्यांना पीक कर्ज देत नाहीत, ती गावे राष्ट्रीयकृत बँकांना दत्तक द्या, शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या पेरणीसाठी मोफत बी बियाणे, खत, औषधी द्या, पीक विम्याची रक्कम तत्काळ अदा करा आदी मागण्यांसाठी १६ मेपासून शेतकऱ्यांचे जिल्ह्यातील प्रत्येक गावात उपोषण सुरू करण्यात आले आहे. सोमवारी परभणी तालुक्यातील सिंगणापूर येथे कॉ. विलास बाबर यांच्या नेतृत्वाखाली मुंजाभाऊ कदम, सुदाम कदम, मधुकर कदम, उत्तमराव खिल्लारे, तुकाराम खिल्लारे, माणिक सुरवसे, साहेबराव वाघे या शेतकऱ्यांनी गावात आंदोलन केले, बोरवंड बु. येथे दिनेश खवले, मंचक यादव, कचरुबा बिंडे, रोहिदास यादव, परसराम खवले, बाबासाहेब खवले, गिन्यादेव लोखंडे, रुस्तुम खवले, राजाभाऊ खवले, सुरपिंपरी- येथे राजेभाऊ राठोड, भगवान पौळ, वसंत पवार, अंकुश धुमाळ, नाना बाबर, पिंपळगाव ठोंबरे- उद्धव ढगे, ज्ञानोबा ढगे, नारायण चेअरमन, लक्ष्मण ठोंबरे, उजळंबा- अशोक कांबळे, सखाराम धोत्रे, शिवाजी आगरकर, बाळासाहेब कांबळे, गंगाधर साखरे, ताडपांगरी- रामेश्वर वैरागड, सुदाम वैरागड, कैलासवाडी- रामराव कोळेकर, सोपान जोरवर, दत्तराव घुन्नर, विलास कोळेकर, इंदेवाडी- सुरेश कच्छवे, गणेश कच्छवे यांच्यासह २० गावांतील शेतकऱ्यांनी शासनाच्या विरोधात उपोषण आंदोलन केले. चौकशीसाठी उपोषण परभणी : तालुक्यातील टाकळी बोबडे गावाची निवड जलयुक्त शिवार अभियानात करण्यात आली आहे. परंतु, गावात एकही जलयुक्तचे काम पूर्ण करण्यात आले नाही. गावाजवळ एकही बंधारा बांधण्यात आला नाही. त्यामुळे पाणीपातळी खालावली आहे. जलसंपदा विभागाकडून एक मशीन देण्यात आली आहे. मात्र चार महिन्यांत केवळ २०० मीटर काम करण्यात आले आहे. निधी उपलब्ध करून द्यावा तसेच कामे वेळेत का पूर्ण झाली नाही, याची चौकशी करावी, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ग्रामस्थांच्या वतीने उपोषण करण्यात आले. नामदेव बोबडे, उद्धव बोबडे, लक्ष्मण बोबडे, बापूराव बोबडे, त्र्यंबक बोबडे, शिवाजी बोबडे, संजय दीपके, मधुकर बोबडे, रामभाऊ गाडे, विठ्ठल दिपके आदींनी सहभाग नोंदविला.