शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

जिल्हाभरात किसान सभेचे आंदोलन

By admin | Updated: May 17, 2016 00:09 IST

परभणी : अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने १६ मे पासून गाव पातळीवर उपोषण आंदोलन सुरू केले असून सोमवारी जिल्ह्यातील २० गावांत शेतकऱ्यांनी आंदोलन केले.

परभणी : अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने १६ मे पासून गाव पातळीवर उपोषण आंदोलन सुरू केले असून सोमवारी जिल्ह्यातील २० गावांत शेतकऱ्यांनी आंदोलन केले. तीन वर्षांपासून मराठवाड्यातील शेतकरी नैसर्गिक संकटात सापडले असून, त्यांना प्रशासनाने मदत करण्याऐवजी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने संपूर्ण कर्ज माफ करा, शेती व्यवसायासाठी बिनव्याजी एकरी ५० हजार रुपये भांडवल द्या, ज्या खाजगी बँका शेतकऱ्यांना पीक कर्ज देत नाहीत, ती गावे राष्ट्रीयकृत बँकांना दत्तक द्या, शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या पेरणीसाठी मोफत बी बियाणे, खत, औषधी द्या, पीक विम्याची रक्कम तत्काळ अदा करा आदी मागण्यांसाठी १६ मेपासून शेतकऱ्यांचे जिल्ह्यातील प्रत्येक गावात उपोषण सुरू करण्यात आले आहे. सोमवारी परभणी तालुक्यातील सिंगणापूर येथे कॉ. विलास बाबर यांच्या नेतृत्वाखाली मुंजाभाऊ कदम, सुदाम कदम, मधुकर कदम, उत्तमराव खिल्लारे, तुकाराम खिल्लारे, माणिक सुरवसे, साहेबराव वाघे या शेतकऱ्यांनी गावात आंदोलन केले, बोरवंड बु. येथे दिनेश खवले, मंचक यादव, कचरुबा बिंडे, रोहिदास यादव, परसराम खवले, बाबासाहेब खवले, गिन्यादेव लोखंडे, रुस्तुम खवले, राजाभाऊ खवले, सुरपिंपरी- येथे राजेभाऊ राठोड, भगवान पौळ, वसंत पवार, अंकुश धुमाळ, नाना बाबर, पिंपळगाव ठोंबरे- उद्धव ढगे, ज्ञानोबा ढगे, नारायण चेअरमन, लक्ष्मण ठोंबरे, उजळंबा- अशोक कांबळे, सखाराम धोत्रे, शिवाजी आगरकर, बाळासाहेब कांबळे, गंगाधर साखरे, ताडपांगरी- रामेश्वर वैरागड, सुदाम वैरागड, कैलासवाडी- रामराव कोळेकर, सोपान जोरवर, दत्तराव घुन्नर, विलास कोळेकर, इंदेवाडी- सुरेश कच्छवे, गणेश कच्छवे यांच्यासह २० गावांतील शेतकऱ्यांनी शासनाच्या विरोधात उपोषण आंदोलन केले. चौकशीसाठी उपोषण परभणी : तालुक्यातील टाकळी बोबडे गावाची निवड जलयुक्त शिवार अभियानात करण्यात आली आहे. परंतु, गावात एकही जलयुक्तचे काम पूर्ण करण्यात आले नाही. गावाजवळ एकही बंधारा बांधण्यात आला नाही. त्यामुळे पाणीपातळी खालावली आहे. जलसंपदा विभागाकडून एक मशीन देण्यात आली आहे. मात्र चार महिन्यांत केवळ २०० मीटर काम करण्यात आले आहे. निधी उपलब्ध करून द्यावा तसेच कामे वेळेत का पूर्ण झाली नाही, याची चौकशी करावी, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ग्रामस्थांच्या वतीने उपोषण करण्यात आले. नामदेव बोबडे, उद्धव बोबडे, लक्ष्मण बोबडे, बापूराव बोबडे, त्र्यंबक बोबडे, शिवाजी बोबडे, संजय दीपके, मधुकर बोबडे, रामभाऊ गाडे, विठ्ठल दिपके आदींनी सहभाग नोंदविला.