शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाभरात किसान सभेचे आंदोलन

By admin | Updated: May 17, 2016 00:09 IST

परभणी : अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने १६ मे पासून गाव पातळीवर उपोषण आंदोलन सुरू केले असून सोमवारी जिल्ह्यातील २० गावांत शेतकऱ्यांनी आंदोलन केले.

परभणी : अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने १६ मे पासून गाव पातळीवर उपोषण आंदोलन सुरू केले असून सोमवारी जिल्ह्यातील २० गावांत शेतकऱ्यांनी आंदोलन केले. तीन वर्षांपासून मराठवाड्यातील शेतकरी नैसर्गिक संकटात सापडले असून, त्यांना प्रशासनाने मदत करण्याऐवजी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने संपूर्ण कर्ज माफ करा, शेती व्यवसायासाठी बिनव्याजी एकरी ५० हजार रुपये भांडवल द्या, ज्या खाजगी बँका शेतकऱ्यांना पीक कर्ज देत नाहीत, ती गावे राष्ट्रीयकृत बँकांना दत्तक द्या, शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या पेरणीसाठी मोफत बी बियाणे, खत, औषधी द्या, पीक विम्याची रक्कम तत्काळ अदा करा आदी मागण्यांसाठी १६ मेपासून शेतकऱ्यांचे जिल्ह्यातील प्रत्येक गावात उपोषण सुरू करण्यात आले आहे. सोमवारी परभणी तालुक्यातील सिंगणापूर येथे कॉ. विलास बाबर यांच्या नेतृत्वाखाली मुंजाभाऊ कदम, सुदाम कदम, मधुकर कदम, उत्तमराव खिल्लारे, तुकाराम खिल्लारे, माणिक सुरवसे, साहेबराव वाघे या शेतकऱ्यांनी गावात आंदोलन केले, बोरवंड बु. येथे दिनेश खवले, मंचक यादव, कचरुबा बिंडे, रोहिदास यादव, परसराम खवले, बाबासाहेब खवले, गिन्यादेव लोखंडे, रुस्तुम खवले, राजाभाऊ खवले, सुरपिंपरी- येथे राजेभाऊ राठोड, भगवान पौळ, वसंत पवार, अंकुश धुमाळ, नाना बाबर, पिंपळगाव ठोंबरे- उद्धव ढगे, ज्ञानोबा ढगे, नारायण चेअरमन, लक्ष्मण ठोंबरे, उजळंबा- अशोक कांबळे, सखाराम धोत्रे, शिवाजी आगरकर, बाळासाहेब कांबळे, गंगाधर साखरे, ताडपांगरी- रामेश्वर वैरागड, सुदाम वैरागड, कैलासवाडी- रामराव कोळेकर, सोपान जोरवर, दत्तराव घुन्नर, विलास कोळेकर, इंदेवाडी- सुरेश कच्छवे, गणेश कच्छवे यांच्यासह २० गावांतील शेतकऱ्यांनी शासनाच्या विरोधात उपोषण आंदोलन केले. चौकशीसाठी उपोषण परभणी : तालुक्यातील टाकळी बोबडे गावाची निवड जलयुक्त शिवार अभियानात करण्यात आली आहे. परंतु, गावात एकही जलयुक्तचे काम पूर्ण करण्यात आले नाही. गावाजवळ एकही बंधारा बांधण्यात आला नाही. त्यामुळे पाणीपातळी खालावली आहे. जलसंपदा विभागाकडून एक मशीन देण्यात आली आहे. मात्र चार महिन्यांत केवळ २०० मीटर काम करण्यात आले आहे. निधी उपलब्ध करून द्यावा तसेच कामे वेळेत का पूर्ण झाली नाही, याची चौकशी करावी, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ग्रामस्थांच्या वतीने उपोषण करण्यात आले. नामदेव बोबडे, उद्धव बोबडे, लक्ष्मण बोबडे, बापूराव बोबडे, त्र्यंबक बोबडे, शिवाजी बोबडे, संजय दीपके, मधुकर बोबडे, रामभाऊ गाडे, विठ्ठल दिपके आदींनी सहभाग नोंदविला.