शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
3
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
4
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
5
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
6
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
7
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
8
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
9
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
10
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
11
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
12
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
13
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
14
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

लातूरच्या फळ बाजारात ‘कोकणच्या राजा’ची चलती

By admin | Updated: April 30, 2017 23:51 IST

लातूर : लातूरच्या फळबाजारात कोकणच्या राजाची चलती असून, रत्नागिरी आणि देवगडच्या हापूस आंब्याला ग्राहकांतून मोठी मागणी आहे

लातूर : लातूरच्या फळबाजारात कोकणच्या राजाची चलती असून, रत्नागिरी आणि देवगडच्या हापूस आंब्याला ग्राहकांतून मोठी मागणी आहे. त्याचबरोबर कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील आंबेही बाजारात दाखल झाले आहेत. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर आंबा बाजारात मोठी उलाढाल झाली. लातूरचा फळबाजार कोकणच्या राजाने बहरला आहे. गंजगोलाई परिसर आणि हनुमान चौक ते गुळ मार्केट या दरम्यान आंब्यांचा बाजार थाटण्यात आला आहे. या फळबाजारात लातूरसह कर्नाटक, कोकण आणि आंध्र प्रदेशातील व्यापारी आंबे घेऊन दाखल झाले आहेत. कोकणच्या हापूस आंब्याची दोन डझनांची पेटी ८०० ते १२०० रुपयांमध्ये ग्राहकांना मिळू लागली आहे. सर्वसामान्य ग्राहकांसाठी हा डझनाचा भाव परवडत नसल्याने पर्याय म्हणून केशर आंबे खरेदी करण्यासाठी काही ग्राहकांची गर्दी आहे. श्रीमंतांचा आंबा म्हणून प्रसिद्ध असलेल्या देवगड आणि रत्नागिरीच्या हापूस आंब्यांची सध्या फळबाजारात चलती असली, तरी या आंब्यांची खरेदी मोजक्याच ग्राहकांकडून होत असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे सर्वसामान्यांना परवडेल, अशा आवाक्यात असलेल्या केशर आणि नीलम आंब्यांची मोठी उलाढाल लातूरच्या बाजारात आहे. शिवाय, आंध्र आणि कर्नाटकातील तोता-मैना या जातीच्या आंब्यांना ग्राहकांतून विशेष मागणी आहे. चवीसाठी गोड आणि रसाळ असलेल्या नीलम, केशर त्याचबरोबर तोता-मैना या आंब्यांची मागणी आता वाढली आहे. दिवसेंदिवस फळ बाजारात मोठ्या प्रमाणावर हे आंबे दाखल होत आहेत. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर या आंब्यांची अनेकांनी प्रथमच खरेदी केली. गेल्या दोन दिवसांतील उलाढाल लाखो रुपयांच्या घरात आहे. (प्रतिनिधी)