शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

लातूरच्या फळ बाजारात ‘कोकणच्या राजा’ची चलती

By admin | Updated: April 30, 2017 23:51 IST

लातूर : लातूरच्या फळबाजारात कोकणच्या राजाची चलती असून, रत्नागिरी आणि देवगडच्या हापूस आंब्याला ग्राहकांतून मोठी मागणी आहे

लातूर : लातूरच्या फळबाजारात कोकणच्या राजाची चलती असून, रत्नागिरी आणि देवगडच्या हापूस आंब्याला ग्राहकांतून मोठी मागणी आहे. त्याचबरोबर कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील आंबेही बाजारात दाखल झाले आहेत. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर आंबा बाजारात मोठी उलाढाल झाली. लातूरचा फळबाजार कोकणच्या राजाने बहरला आहे. गंजगोलाई परिसर आणि हनुमान चौक ते गुळ मार्केट या दरम्यान आंब्यांचा बाजार थाटण्यात आला आहे. या फळबाजारात लातूरसह कर्नाटक, कोकण आणि आंध्र प्रदेशातील व्यापारी आंबे घेऊन दाखल झाले आहेत. कोकणच्या हापूस आंब्याची दोन डझनांची पेटी ८०० ते १२०० रुपयांमध्ये ग्राहकांना मिळू लागली आहे. सर्वसामान्य ग्राहकांसाठी हा डझनाचा भाव परवडत नसल्याने पर्याय म्हणून केशर आंबे खरेदी करण्यासाठी काही ग्राहकांची गर्दी आहे. श्रीमंतांचा आंबा म्हणून प्रसिद्ध असलेल्या देवगड आणि रत्नागिरीच्या हापूस आंब्यांची सध्या फळबाजारात चलती असली, तरी या आंब्यांची खरेदी मोजक्याच ग्राहकांकडून होत असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे सर्वसामान्यांना परवडेल, अशा आवाक्यात असलेल्या केशर आणि नीलम आंब्यांची मोठी उलाढाल लातूरच्या बाजारात आहे. शिवाय, आंध्र आणि कर्नाटकातील तोता-मैना या जातीच्या आंब्यांना ग्राहकांतून विशेष मागणी आहे. चवीसाठी गोड आणि रसाळ असलेल्या नीलम, केशर त्याचबरोबर तोता-मैना या आंब्यांची मागणी आता वाढली आहे. दिवसेंदिवस फळ बाजारात मोठ्या प्रमाणावर हे आंबे दाखल होत आहेत. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर या आंब्यांची अनेकांनी प्रथमच खरेदी केली. गेल्या दोन दिवसांतील उलाढाल लाखो रुपयांच्या घरात आहे. (प्रतिनिधी)