शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
3
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
6
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
7
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
8
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
9
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
10
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
11
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
12
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
13
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
14
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
15
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
16
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
17
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
18
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
19
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
20
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याची शैक्षणिक चळवळ गतिमान

By admin | Updated: December 28, 2016 00:02 IST

बीड : जिल्ह्यातील शैक्षणिक चळवळ गतिमान झाल्याचे गौरवोद्गार जि. प. अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी काढले.

बीड : जिल्हा परिषद शाळांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत चाललेल्या परिस्थितीत जिल्ह्यात ८१ शाळा, तीन गटशिक्षणाधिकारी कार्यालये व जिल्हा स्काऊट गाईड अशी चार कार्यालये आयएसओ नामांकन मिळवितात ही मोठी अभिमानाची बाब आहे. यामुळे जिल्ह्यातील शैक्षणिक चळवळ गतिमान झाल्याचे गौरवोद्गार जि. प. अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी काढले.येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात मंगळवारी आयएसओ मानांकन प्राप्त शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, संबंधित गावचे सरपंच, शालेय शिक्षण समिती अध्यक्ष यांच्या गौरवार्थ आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी शिक्षण सभापती महेंद्र गर्जे, समाजकल्याण सभापती महेंद्र गर्जे, जि.प. सदस्य देवीदास धस, मोहन मुंडे, जिल्हा स्काऊट आयुक्त संतोष मानूरकर, डाएटचे प्राचार्य विनोद देवगावकर, शिक्षणाधिकारी (प्रा.) शशिकांत हिंगोणेकर, शिक्षणाधिकारी (निरंतर) विक्रम सारुक, उपशिक्षणाधिकारी हिरालाल कराड, फातेमा अस्करी, उस्मानी नजमा, राहुल दुबाले यांची मंचावर उपस्थिती होती.अध्यक्ष पंडित म्हणाले, आयएसओ मिळविण्यासाठी शाळांना ४६ निकष पूर्ण करावे लागतात. मात्र, ८१ शाळांनी हा अवघड डोंगर सर करुन आयएसओचा मान मिळविला. जिल्ह्यातील अनेक शाळांत इंग्रजी शाळांना लाजेवल असे ज्ञानदान केले जात आहे. लोकसहभागातून कोट्यवधी रुपये जमा झाले. अनेकांनी स्वत:ची जमीन शाळांसाठी दान दिली. हा एकत्रित आकडा ४० कोटींच्या घरात आहे. यातून कामाची पावती मिळाल्याचेही ते म्हणाले. अडीच वर्षांच्या कार्यकाळात गुणवत्तावाढीसाठी विशेष प्रयत्न केले. त्याला पदाधिकाऱ्यांबरोबरच अधिकारी- कर्मचारी , शिक्षक व ग्रामस्थांनी भरभरून साथ दिली. त्यामुळेच हे सारे शक्य झाले असेही त्यांनी सांगितले. अनेक शाळांना हक्काची इमारत नाही. कुठे पडझड झालेली आहे. त्यासाठी निधी खेचून आणण्याकरता वैयक्तिक पाठपुरावा केला; परंतु त्यात अपेक्षित यश मिळाले नाही, असा खेद त्यांनी व्यक्त केला. स्वच्छतेत पिछाडीवर असलेला जिल्हा आज राज्यात तिसऱ्यास्थानी आहे. शिक्षणातही दर्जात्मक सुधारणा घडत आहे. हा प्रगतीचा आलेख वाखाणण्याजोगा आहे, असे ते म्हणाले.जि.प. सदस्य देवीदास धस म्हणाले, शिक्षकांना लोकांची साथ मिळाली तर ते उत्तम काम करु शकतात. जामगाव या आपल्या गावच्या शाळेत हा बदल घडवून आणला आहे. याशिवाय आष्टी तालुक्यातील अनेक शाळांमध्ये चांगले शैक्षणिक वातावरण बनले आहे. मात्र, आष्टीला केवळ ५ शाळा आयएसओ मानांकनास पात्र ठरल्या अशी खंत त्यांनी व्यक्त केली.समाजकल्याण सभापती महेंद्र गर्जे यांनी सांगितले की, ऊसतोड कामगारांच्या जिल्ह्यात शैक्षणिक चळवळ रुजते आहे, ही आनंदाची गोष्ट आहे. येत्या काळात आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिल्याशिवाय पर्याय नाही, असे सांगून ते म्हणाले तांत्रिक शिक्षण हा रोजगार प्राप्तीचा उत्तम मार्ग आहे. भविष्यात जिल्ह्यातील सर्वच्या सर्व २५१७ प्राथमिक व ६८ माध्यमिक शाळा आयएसओ होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.आयएसओप्राप्त शाळांना प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन यावेळी सन्मानीत करण्यात आले. प्रास्ताविक शिक्षणाधिकारी हिंगोणेकर यांनी केले. सूत्रसंचालन विस्तार अधिकारी जी. एन. चोपडे यांनी केले. यावेळी अधिकारी, कर्मचारी, शिक्षक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)