शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी मोदींवर थेट हल्ला, आता गाठणार गुजरात, राहुल गांधींची मोठी खेळी, मोदी-भाजपाच्या अडचणी वाढणार?
2
IND vs ENG 4th Test Day 3 Stumps: टीम इंडियानं ५ विकेट्स घेतल्या; पण अख्खा दिवस यजमानांनी गाजवला
3
विद्यार्थी म्हणाले, गुरुजी छप्पर कोसळतंय, पण शिक्षकांनी दरडावून बसवून ठेवले, शाळा दुर्घटनेत धक्कादायक माहिती समोर  
4
LOCजवळ भूसुरुंग स्फोट, अग्निवीराला वीरमरण, २ जवान जखमी, पहलगाम हल्ला करणाऱ्या संघटनेने स्वीकारली जबाबदारी 
5
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
6
ना कोळसा, ना डिझेल, ना वीज, भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन या इंधनावर चालणार? चाचणी यशस्वी
7
जालन्यात भरधाव बसने दोन मित्रांना चिरडले; केदारखेडा-राजूर महामार्गावर रक्ताचा सडा
8
Joe Root Record With 38th Hundred : रुटची विक्रमी सेंच्युरी! क्रिकेटच्या मैदानातील 'डॉन'ला टाकले मागे
9
Ben Stokes Retires Hurt : स्टोक्सनं पहिली फिफ्टी ठोकली अन् मग मैदान सोडायची वेळ आली, कारण...
10
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
11
गाजलेल्या शिक्षक हत्येतील आरोपी कळंबा जेलमधून पसार, कावळेसादच्या दरीत सापडला होता मृतदेह
12
नवरत्न कंपनीला संरक्षण मंत्रालयाकडून मोठी ऑर्डर, 1060% वधारला आहे शेअर; गुंतवणूकदारांना केलंय मालामाल!
13
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
14
गिलनं ज्याला वेटिंगवर ठेवलं तोच कामी आला! ओली पोप पाठोपाठ ब्रूकही वॉशिंग्टनच्या 'सुंदर' चेंडूवर फसला
15
दोन रुग्णवाहिका घेऊन सासरी पोहोचला जावई, २०-२५ जण उतरले, मारहाण, तुफान राडा, कारण काय?
16
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या लॉटरीत लागलेले घर भाड्याने देऊ शकतो का? जाणून घ्या नियम!
17
Sarzameen Movie Review: देशभक्तीच्या पार्श्वभूमीवरील पिता-पुत्राची भावनिक कथा 'सरजमीं'
18
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
19
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
20
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'

जिल्ह्याची शैक्षणिक चळवळ गतिमान

By admin | Updated: December 28, 2016 00:02 IST

बीड : जिल्ह्यातील शैक्षणिक चळवळ गतिमान झाल्याचे गौरवोद्गार जि. प. अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी काढले.

बीड : जिल्हा परिषद शाळांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत चाललेल्या परिस्थितीत जिल्ह्यात ८१ शाळा, तीन गटशिक्षणाधिकारी कार्यालये व जिल्हा स्काऊट गाईड अशी चार कार्यालये आयएसओ नामांकन मिळवितात ही मोठी अभिमानाची बाब आहे. यामुळे जिल्ह्यातील शैक्षणिक चळवळ गतिमान झाल्याचे गौरवोद्गार जि. प. अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी काढले.येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात मंगळवारी आयएसओ मानांकन प्राप्त शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, संबंधित गावचे सरपंच, शालेय शिक्षण समिती अध्यक्ष यांच्या गौरवार्थ आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी शिक्षण सभापती महेंद्र गर्जे, समाजकल्याण सभापती महेंद्र गर्जे, जि.प. सदस्य देवीदास धस, मोहन मुंडे, जिल्हा स्काऊट आयुक्त संतोष मानूरकर, डाएटचे प्राचार्य विनोद देवगावकर, शिक्षणाधिकारी (प्रा.) शशिकांत हिंगोणेकर, शिक्षणाधिकारी (निरंतर) विक्रम सारुक, उपशिक्षणाधिकारी हिरालाल कराड, फातेमा अस्करी, उस्मानी नजमा, राहुल दुबाले यांची मंचावर उपस्थिती होती.अध्यक्ष पंडित म्हणाले, आयएसओ मिळविण्यासाठी शाळांना ४६ निकष पूर्ण करावे लागतात. मात्र, ८१ शाळांनी हा अवघड डोंगर सर करुन आयएसओचा मान मिळविला. जिल्ह्यातील अनेक शाळांत इंग्रजी शाळांना लाजेवल असे ज्ञानदान केले जात आहे. लोकसहभागातून कोट्यवधी रुपये जमा झाले. अनेकांनी स्वत:ची जमीन शाळांसाठी दान दिली. हा एकत्रित आकडा ४० कोटींच्या घरात आहे. यातून कामाची पावती मिळाल्याचेही ते म्हणाले. अडीच वर्षांच्या कार्यकाळात गुणवत्तावाढीसाठी विशेष प्रयत्न केले. त्याला पदाधिकाऱ्यांबरोबरच अधिकारी- कर्मचारी , शिक्षक व ग्रामस्थांनी भरभरून साथ दिली. त्यामुळेच हे सारे शक्य झाले असेही त्यांनी सांगितले. अनेक शाळांना हक्काची इमारत नाही. कुठे पडझड झालेली आहे. त्यासाठी निधी खेचून आणण्याकरता वैयक्तिक पाठपुरावा केला; परंतु त्यात अपेक्षित यश मिळाले नाही, असा खेद त्यांनी व्यक्त केला. स्वच्छतेत पिछाडीवर असलेला जिल्हा आज राज्यात तिसऱ्यास्थानी आहे. शिक्षणातही दर्जात्मक सुधारणा घडत आहे. हा प्रगतीचा आलेख वाखाणण्याजोगा आहे, असे ते म्हणाले.जि.प. सदस्य देवीदास धस म्हणाले, शिक्षकांना लोकांची साथ मिळाली तर ते उत्तम काम करु शकतात. जामगाव या आपल्या गावच्या शाळेत हा बदल घडवून आणला आहे. याशिवाय आष्टी तालुक्यातील अनेक शाळांमध्ये चांगले शैक्षणिक वातावरण बनले आहे. मात्र, आष्टीला केवळ ५ शाळा आयएसओ मानांकनास पात्र ठरल्या अशी खंत त्यांनी व्यक्त केली.समाजकल्याण सभापती महेंद्र गर्जे यांनी सांगितले की, ऊसतोड कामगारांच्या जिल्ह्यात शैक्षणिक चळवळ रुजते आहे, ही आनंदाची गोष्ट आहे. येत्या काळात आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिल्याशिवाय पर्याय नाही, असे सांगून ते म्हणाले तांत्रिक शिक्षण हा रोजगार प्राप्तीचा उत्तम मार्ग आहे. भविष्यात जिल्ह्यातील सर्वच्या सर्व २५१७ प्राथमिक व ६८ माध्यमिक शाळा आयएसओ होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.आयएसओप्राप्त शाळांना प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन यावेळी सन्मानीत करण्यात आले. प्रास्ताविक शिक्षणाधिकारी हिंगोणेकर यांनी केले. सूत्रसंचालन विस्तार अधिकारी जी. एन. चोपडे यांनी केले. यावेळी अधिकारी, कर्मचारी, शिक्षक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)