शहरं
Join us  
Trending Stories
1
७/११तील दोषींची निर्दोष मुक्तता, उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने...”
2
नवी मुंबईत भाजपा आमदारानं मनसेला डिवचलं; मराठी भाषेत लावलेली पाटी काढून गुजरातीत लावली
3
“शिवसेनेतून फुटलेले ४ तरुण खासदार हनी ट्रॅपमुळे पळाले”; संजय राऊतांचा दावा, सरकारवर टीका
4
झोपेच्या गोळ्या, शॉक दिला... बॉयफ्रेंडच्या मदतीने नवऱ्याचा काढला काटा, कुटुंबाने केली 'ही' मागणी
5
पहिल्या तिमाहीचे निकाल, बोनस आणि डिविडेंडची घोषणा; 'या' बँकेचा शेअर चमकला, तुमच्याकडे आहे?
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये लष्कराने लक्ष्य साध्य केले, जगाने भारताची ताकद पाहिली'; अधिवेशनाआधी पीएम मोदी म्हणाले...
7
IND vs ENG : टीम इंडियात नव्या चेहऱ्याची एन्ट्री; या पठ्ठ्यानं एका डावात अख्खा संघ केला होता गारद
8
Mumbai Bomb Blast 2006: शंका... १०० दिवस... बॉम्बचा प्रकार! उच्च न्यायालयाने 'हे' तीन तर्क लावत 7/11 मुंबई स्फोटाच्या दोषींना ठरवलं निर्दोष
9
रेअर अर्थ मॅग्नेट्सवर चीनची 'धक्कादायक' खेळी! जगभरातील कारखान्यांचा जीव भांड्यात, नेमकं काय केलं?
10
मोठी बातमी! मुंबई लोकल साखळी बॉम्बस्फोटातील १२ दोषींची निर्दोष मुक्तता, राज्य सरकारला दणका
11
Anthem Biosciences Ltd IPO: जबरदस्त लिस्टिंग! पहिल्याच दिवशी प्रत्येक शेअरवर ₹१५३ चा फायदा; ₹७४० पार पोहोचला भाव, गुंतवणूकदार मालामाल
12
इवलुशा राखीतून जन्म घेतील वृक्षवेली, आमचे यंदा पर्यावरणाशी रक्षाबंधन! तुमच्या शाळेत?
13
छावा संघटना मारहाण: राष्ट्रवादीचे युवा शाखेचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण फरार; ११ जणांवर गुन्हा दाखल
14
राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाण यांच्यासह ११ जणांवर गुन्हा दाखल; छावा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण प्रकरणी कारवाई
15
हा हल्ला पूर्वनियोजित, सुनील तटकरेंच्या सांगण्यावरून...; विजय घाडगे पाटलांचा मोठा दावा
16
भयानक PHOTO's! ११ जुलै २००६ चा मुंबई लोकल बॉम्बस्फोट; आरोपी निर्दोष सुटले पण... जखमा आजही कायम...
17
Vi युझर्ससाठी महत्त्वाची बातमी, स्वस्त रिचार्ज प्लान्समध्ये केले बदल; Airtel आणि Jio काय करणार?
18
IndiGo : विमान ४० मिनिटे हवेत फिरत राहिले, तिरुपतीहून हैदराबादला जाणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग
19
Stock Market Today: किरकोळ तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात; Bank Nifty सुस्साट, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
जडीबुटी विकणाऱ्या दोन साधूंना मुले चोरणारे समजून मारहाण; थोडक्यात टळली पालघर घटनेची पुनरावृत्ती

टंचाईमुक्त जिल्ह्यासाठी हालचाली

By admin | Updated: January 2, 2015 00:46 IST

लातूर : जिल्ह्याची पाणीपातळी कमालीची घटली असून, दोन मीटरपेक्षा जास्त खाली गेलेल्या गावांची संख्या ३४५ वर आहे. त्यामुळे जलयुक्त शिवार अभियानातील कामाचा प्रारंभ या गावांतून केला जाणार आहे.

लातूर : जिल्ह्याची पाणीपातळी कमालीची घटली असून, दोन मीटरपेक्षा जास्त खाली गेलेल्या गावांची संख्या ३४५ वर आहे. त्यामुळे जलयुक्त शिवार अभियानातील कामाचा प्रारंभ या गावांतून केला जाणार आहे. पंचायत समिती स्तरावरून जलयुक्त शिवार अभियानाचा आराखडा तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या अभियानातून २०१९ पर्यंत टंचाईमुक्त जिल्हा करण्याचा विडा जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी उचलला आहे.‘सर्वांसाठी पाणी-टंचाईमुक्त महाराष्ट्र २०१९’ अंतर्गत टंचाई परिस्थितीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी राज्य शासनाने जलयुक्त शिवार अभियान हाती घेतले आहे. या अभियानात ज्या गावांची पाणीपातळी दोन मीटरपेक्षा खाली गेली आहे, त्या गावांना प्राधान्य देण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने पंचायत समितीस्तरावर आराखडा तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. हे अभियान यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषद, विभागीय कृषी कार्यालय, वनविभाग, सामाजिक वनीकरण, सिंचन, जलसंपदा आदी विभागांचा समावेश आहे. या सर्व विभागांतील विभाग प्रमुखांची कार्यशाळा ३ जानेवारी रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली लातुरात होणार आहे. गाव, तालुका आणि जिल्हानिहाय कृती आराखडा तयार केला जाणार आहे. पाणलोट, साखळी सिमेंट बंधारे, नाला खोलीकरण, रुंदीकरण, जुन्या जलसंरचनांचे पुनर्जीवन, केटीवेअर, साठवण बंधाऱ्यांची दुरुस्ती, पाझर तलाव, लघु सिंचन तलावांची दुरुस्ती, ओढे-नाले जोडप्रकल्प, विहीर-बोअरचे पुनर्भरण, ब्रिटीशकालीन तलाव, शिवकालीन तलाव, निजामकालीन तलावांतील गाळ काढणे आदी कामे केली जाणार आहेत. १ जानेवारी २०१५ ते १ जानेवारी २०१६ पर्यंत ही कामे पूर्ण करून त्याचे मूल्यांकन केले जाणार आहे. विभाग समिती, जिल्हा समिती आणि तालुका समिती गठित करण्यात आली असून, भूगर्भातील पाणीपातळीत वाढ करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. गावांचा कृती आराखडा ग्रामसभेत तयार केला जाणार असून, प्रत्येक व्यक्तीच्या सूचना आणि सहभाग त्यात असेल, असे जलयुक्त शिवार अभियानाचे नियोजन आहे. तालुकास्तरावरील कृती आराखडा झाल्यानंतर प्रत्येक गावात ग्रामसभा घेऊन आराखडा तयार केला जाईल. अंतिम आराखडा जिल्हास्तरावर होऊन कामाला प्रारंभ होणार आहे.४जिल्ह्यातील दहाही पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना जलयुक्त शिवार अभियानाचा कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ३ जानेवारी रोजी त्याअनुषंगाने कार्यशाळा होत असून, शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार हे अभियान प्रारंभी ३४५ गावांत राबविण्यात येणार आहे. ४ज्या गावांची पाणीपातळी दोन मीटरपेक्षा खाली गेली आहे, त्या गावांत अभियानाचे काम असेल, अशी माहिती जिल्हास्तरीय समितीचे सदस्य सचिव, अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. तुकाराम मोटे यांनी दिली.पिण्याच्या पाण्याची उपलब्धता वाढविणे तसेच सिंचन क्षेत्रात वाढ करणे४पीक घनतेमध्ये वाढ होणे४कोरडवाहू क्षेत्र कमी करून बागायती क्षेत्र वाढविणे४कृषी उत्पादकता व उत्पादन गुणवत्तेत वाढ४मूल्यवर्धित वाढ व चारा पिकाखालील क्षेत्रात वाढ४जमिनीतील ओलावा सुरक्षेत वाढ४पर्यावरण सुधारणा४सामाजिक व आर्थिक जीवनमान उंचाविणे४लोकसहभाग जलयुक्त शिवार अभियानाचा आराखडा तयार करणे, त्याची प्रभावी अंमलबजावणी करणे व समन्वय सनियंत्रणासाठी उपविभागीय अधिकारी हे तालुकास्तरावर व जिल्हास्तरावर नोडल अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी काम पाहत आहेत. त्याअनुषंगाने जलयुक्त शिवार अभियानाला प्रारंभ झाला आहे.