शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
3
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
6
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
7
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
8
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
9
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
10
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
11
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
12
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
13
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
14
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
15
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
16
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
17
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
18
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
19
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
20
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

नारेगाव कचरा डेपोविरोधात १६ पासून आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 00:06 IST

मांडकी शिवारातील नारेगाव येथील कचरा डेपो हटविण्यासाठी मनपाला चार महिन्यांची देण्यात आलेली मुदत १६ फेबु्रवारी रोजी संपणार आहे. त्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी बुधवारी बैठक घेऊन आंदोलनाचा इशारा दिला. उद्या शुक्रवारी मनपा, पोलीस आणि विभागीय आयुक्त यांना कचरा डेपो हटविण्यासाठी ग्रामस्थ निवेदन देणार आहेत.

ठळक मुद्देमांडकी, गोपाळपूरकरांचा इशारा : आज निवेदन देणार

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मांडकी शिवारातील नारेगाव येथील कचरा डेपो हटविण्यासाठी मनपाला चार महिन्यांची देण्यात आलेली मुदत १६ फेबु्रवारी रोजी संपणार आहे. त्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी बुधवारी बैठक घेऊन आंदोलनाचा इशारा दिला. उद्या शुक्रवारी मनपा, पोलीस आणि विभागीय आयुक्त यांना कचरा डेपो हटविण्यासाठी ग्रामस्थ निवेदन देणार आहेत.१६ फेब्रुवारीपासून एकही कचरा गाडी डेपोत जाऊ दिली जाणार नाही. यासाठी आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे जाहीर केले. आंदोलनाच्या इशाºयामुळे शहरातील कचºयाचा प्रश्न पुन्हा गंभीर होण्याची शक्यता आहे. कचरा डेपो हटविण्यासाठी गोपाळपूर, मांडकी, महालपिंपरी, पिसादेवी, वरूड, पोखरी, कच्चीघाटी, रामपूर या गावांतील ग्रामस्थांची आंदोलन करण्यासाठी पूर्वतयारीची बैठक घेण्यात आली. आंदोलन छेडण्यापूर्वी प्रशासनाला आठ दिवस अगोदर नोटीस बजावण्याच्या दृष्टीने उद्या ९ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकाºयांसह मनपा, पोलीस आणि विभागीय आयुक्तांना निवेदन देण्यात येईल.कचरा डेपो हटविण्यासाठी ग्रामस्थांनी दिवाळीच्या तोंडावर तीन दिवस आंदोलन करून कचरा वाहतुकीची वाहने रोखली होती. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या मध्यस्थीने आंदोलन मागे घेण्यात आल्यानंतर मनपानेचार महिन्यांत कचरा डेपो हटविण्याचे आश्वासन ग्रामस्थांना दिले होते. चार महिन्यांच्या काळात मनपाकडून कचºयाची विल्हेवाट लावण्याच्या दृष्टीने प्रयत्न झाले. मात्र, प्रक्रिया प्रकल्प सुरू झाला नाही.कचरा डेपोवर रासायनिक प्रक्रियामनपाकडून कचºयाच्या ढिगाºयावर रसायनाच्या साह्याने मायनिंगची प्रक्रिया केली जाणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने दिलेल्या दोन पोकलेनद्वारे सपाटीकरण करण्याच्या कामाला गुरुवारी सुरुवात केल्याचे आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी सांगितले.मांडकी शिवारातील कचरा डेपो हटविण्यासाठी चार महिन्यांची देण्यात आलेली मुदत येत्या १६ फेबु्रवारी रोजी संपत आहे. या डेपोत सुमारे ४० हजार मेट्रिक टन कचरा साचला आहे.त्या कचरा डेपोमुळे परिसरातील १५ गावांच्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, शेतीवरही त्याचा परिणाम होत असल्यामुळे ग्रामस्थांनी कचरा डेपो हटविण्याची मागणी लावून धरली आहे.