शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
2
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
3
"टीम इंडियावर कारवाई करायची नाही... BCCIकडून आलेला फोन"; माजी मॅच रेफरीच्या आरोपांमुळे खळबळ
4
Viral Video : हे कसं शक्य आहे? सील न फाडता उघडला आयफोनचा बॉक्स! व्हिडीओ बघून सगळेच शॉक्ड 
5
योगिता-सौरभनंतर 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीच्या संसारात आलं वादळ? एकमेकांना केलं अनफॉलो अन्....
6
देशी ‘कमांडो डॉग्स’ करणार भारतीय सीमेची संरक्षण; रामपूर-मुधोळ हाउंड BSF पथकात दाखल
7
फसवणूक अमेरिकेतील नागरिकांची, रॅकेट छत्रपती संभाजीनगरमध्ये; तब्बल ११६ जण ताब्यात
8
किडनी फेल नाही तर 'या' कारणामुळे झालं सतीश शाहांचं निधन, राजेश कुमारचा खुलासा
9
७ सीटर Kia Carens CNG मध्ये झाली लॉन्च; जाणून घ्या फिचर्स अन् किंमत, Ertiga ला देणार टक्कर
10
Video: ७ महिन्याच्या गर्भवतीनं उचललं तब्बल १४५ किलो वजन; कसा अन् कुणी केला हा पराक्रम?
11
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणीचा पोस्टमार्टेम रिपोर्ट आला, मृत्यू नेमका कशामुळे?
12
8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8 व्या वेतन आयोगाला केंद्राची मंजुरी; वाढीव पगार कधीपासून मिळणार?
13
अस्थिर बाजारात 'सुझलॉन'ची मोठी झेप! तिमाही निकालापूर्वीच भाव वाढला; दुसऱ्यांदा मल्टीबॅगर ठरणार?
14
'मासिक पाळी आलीय, ब्रेक पाहिजे', सुपरवायझर म्हणाला, 'कपडे काढा'; हरयाणा विद्यापीठातील धक्कादायक प्रकार
15
‘त्यांनी आपल्या २ मुली पळवल्या तर तुम्ही त्यांच्या १० जणीं घेऊन या’, भाजपा नेत्याचं वादग्रस्त विधान  
16
अर्जुन तेंडुलकर चमकला; पण 'या' गोलंदाजाने दिला त्रास! रन काढू दिलीच नाही, विकेटही घेतली...
17
महागडे मोबाइल अन् मोठे टीव्हीच हवेत; या दिवाळीत 'प्रीमियम' खरेदीचा नवा पॅटर्न समोर
18
कोण आहे रंजना प्रकाश देसाई?; ज्यांना ८ व्या वेतन आयोगाच्या अध्यक्षपदाची मिळाली जबाबदारी
19
रणबीरच्या 'रामायण'मध्ये विवेक ओबेरॉयचीही भूमिका, अभिनेत्याने दान केलं मानधन; म्हणाला...
20
बाजारात मोठी अस्थिरता! सेंसेक्स-निफ्टी सपाट पातळीवर बंद; महिंद्रा-बजाजसह 'हे' शेअर्स आपटले

नारेगाव कचरा डेपोविरोधात १६ पासून आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 00:06 IST

मांडकी शिवारातील नारेगाव येथील कचरा डेपो हटविण्यासाठी मनपाला चार महिन्यांची देण्यात आलेली मुदत १६ फेबु्रवारी रोजी संपणार आहे. त्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी बुधवारी बैठक घेऊन आंदोलनाचा इशारा दिला. उद्या शुक्रवारी मनपा, पोलीस आणि विभागीय आयुक्त यांना कचरा डेपो हटविण्यासाठी ग्रामस्थ निवेदन देणार आहेत.

ठळक मुद्देमांडकी, गोपाळपूरकरांचा इशारा : आज निवेदन देणार

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मांडकी शिवारातील नारेगाव येथील कचरा डेपो हटविण्यासाठी मनपाला चार महिन्यांची देण्यात आलेली मुदत १६ फेबु्रवारी रोजी संपणार आहे. त्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी बुधवारी बैठक घेऊन आंदोलनाचा इशारा दिला. उद्या शुक्रवारी मनपा, पोलीस आणि विभागीय आयुक्त यांना कचरा डेपो हटविण्यासाठी ग्रामस्थ निवेदन देणार आहेत.१६ फेब्रुवारीपासून एकही कचरा गाडी डेपोत जाऊ दिली जाणार नाही. यासाठी आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे जाहीर केले. आंदोलनाच्या इशाºयामुळे शहरातील कचºयाचा प्रश्न पुन्हा गंभीर होण्याची शक्यता आहे. कचरा डेपो हटविण्यासाठी गोपाळपूर, मांडकी, महालपिंपरी, पिसादेवी, वरूड, पोखरी, कच्चीघाटी, रामपूर या गावांतील ग्रामस्थांची आंदोलन करण्यासाठी पूर्वतयारीची बैठक घेण्यात आली. आंदोलन छेडण्यापूर्वी प्रशासनाला आठ दिवस अगोदर नोटीस बजावण्याच्या दृष्टीने उद्या ९ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकाºयांसह मनपा, पोलीस आणि विभागीय आयुक्तांना निवेदन देण्यात येईल.कचरा डेपो हटविण्यासाठी ग्रामस्थांनी दिवाळीच्या तोंडावर तीन दिवस आंदोलन करून कचरा वाहतुकीची वाहने रोखली होती. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या मध्यस्थीने आंदोलन मागे घेण्यात आल्यानंतर मनपानेचार महिन्यांत कचरा डेपो हटविण्याचे आश्वासन ग्रामस्थांना दिले होते. चार महिन्यांच्या काळात मनपाकडून कचºयाची विल्हेवाट लावण्याच्या दृष्टीने प्रयत्न झाले. मात्र, प्रक्रिया प्रकल्प सुरू झाला नाही.कचरा डेपोवर रासायनिक प्रक्रियामनपाकडून कचºयाच्या ढिगाºयावर रसायनाच्या साह्याने मायनिंगची प्रक्रिया केली जाणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने दिलेल्या दोन पोकलेनद्वारे सपाटीकरण करण्याच्या कामाला गुरुवारी सुरुवात केल्याचे आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी सांगितले.मांडकी शिवारातील कचरा डेपो हटविण्यासाठी चार महिन्यांची देण्यात आलेली मुदत येत्या १६ फेबु्रवारी रोजी संपत आहे. या डेपोत सुमारे ४० हजार मेट्रिक टन कचरा साचला आहे.त्या कचरा डेपोमुळे परिसरातील १५ गावांच्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, शेतीवरही त्याचा परिणाम होत असल्यामुळे ग्रामस्थांनी कचरा डेपो हटविण्याची मागणी लावून धरली आहे.