शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

नारेगाव कचरा डेपोविरोधात १६ पासून आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 00:06 IST

मांडकी शिवारातील नारेगाव येथील कचरा डेपो हटविण्यासाठी मनपाला चार महिन्यांची देण्यात आलेली मुदत १६ फेबु्रवारी रोजी संपणार आहे. त्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी बुधवारी बैठक घेऊन आंदोलनाचा इशारा दिला. उद्या शुक्रवारी मनपा, पोलीस आणि विभागीय आयुक्त यांना कचरा डेपो हटविण्यासाठी ग्रामस्थ निवेदन देणार आहेत.

ठळक मुद्देमांडकी, गोपाळपूरकरांचा इशारा : आज निवेदन देणार

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मांडकी शिवारातील नारेगाव येथील कचरा डेपो हटविण्यासाठी मनपाला चार महिन्यांची देण्यात आलेली मुदत १६ फेबु्रवारी रोजी संपणार आहे. त्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी बुधवारी बैठक घेऊन आंदोलनाचा इशारा दिला. उद्या शुक्रवारी मनपा, पोलीस आणि विभागीय आयुक्त यांना कचरा डेपो हटविण्यासाठी ग्रामस्थ निवेदन देणार आहेत.१६ फेब्रुवारीपासून एकही कचरा गाडी डेपोत जाऊ दिली जाणार नाही. यासाठी आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे जाहीर केले. आंदोलनाच्या इशाºयामुळे शहरातील कचºयाचा प्रश्न पुन्हा गंभीर होण्याची शक्यता आहे. कचरा डेपो हटविण्यासाठी गोपाळपूर, मांडकी, महालपिंपरी, पिसादेवी, वरूड, पोखरी, कच्चीघाटी, रामपूर या गावांतील ग्रामस्थांची आंदोलन करण्यासाठी पूर्वतयारीची बैठक घेण्यात आली. आंदोलन छेडण्यापूर्वी प्रशासनाला आठ दिवस अगोदर नोटीस बजावण्याच्या दृष्टीने उद्या ९ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकाºयांसह मनपा, पोलीस आणि विभागीय आयुक्तांना निवेदन देण्यात येईल.कचरा डेपो हटविण्यासाठी ग्रामस्थांनी दिवाळीच्या तोंडावर तीन दिवस आंदोलन करून कचरा वाहतुकीची वाहने रोखली होती. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या मध्यस्थीने आंदोलन मागे घेण्यात आल्यानंतर मनपानेचार महिन्यांत कचरा डेपो हटविण्याचे आश्वासन ग्रामस्थांना दिले होते. चार महिन्यांच्या काळात मनपाकडून कचºयाची विल्हेवाट लावण्याच्या दृष्टीने प्रयत्न झाले. मात्र, प्रक्रिया प्रकल्प सुरू झाला नाही.कचरा डेपोवर रासायनिक प्रक्रियामनपाकडून कचºयाच्या ढिगाºयावर रसायनाच्या साह्याने मायनिंगची प्रक्रिया केली जाणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने दिलेल्या दोन पोकलेनद्वारे सपाटीकरण करण्याच्या कामाला गुरुवारी सुरुवात केल्याचे आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी सांगितले.मांडकी शिवारातील कचरा डेपो हटविण्यासाठी चार महिन्यांची देण्यात आलेली मुदत येत्या १६ फेबु्रवारी रोजी संपत आहे. या डेपोत सुमारे ४० हजार मेट्रिक टन कचरा साचला आहे.त्या कचरा डेपोमुळे परिसरातील १५ गावांच्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, शेतीवरही त्याचा परिणाम होत असल्यामुळे ग्रामस्थांनी कचरा डेपो हटविण्याची मागणी लावून धरली आहे.