शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत केनियाचा खेळाडू आणि दोन प्रशिक्षकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; भाजप म्हणतेय... 'कलंक'
2
आता मिसाइल, दारूगोळा अन् शस्त्रास्त्र खासगी कंपन्या बनवणार; संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय
3
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
4
...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक
5
चालतंय तोवर चालवायचं असं तो वागला नाही; मग तुम्ही एवढी घाई का केली? कैफचा आगरकरांना सवाल
6
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना चौफेर यश, येणी वसूल-पैशांचा ओघ; बढती-नवी नोकरी, सरकारी लाभ!
7
दहा मुलांचे जीव गेल्यानंतर 'अ‍ॅक्शन'! विषारी कफ सिरप लिहून देणाऱ्या 'त्या' डॉक्टरला बेड्या 
8
महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा
9
पुढच्या वर्षी मेगा सरकारी नोकरभरती, एमपीएससी भरतीही रेंगाळणार नाही; फडणवीस यांची घोषणा
10
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
11
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
12
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
13
शेतकऱ्यांना पावसाचा, नाेकरदारांना महागाईचा फटका; दिवाळीपूर्वी काय काय होऊ शकते...
14
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
15
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
16
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
17
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
18
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
19
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
20
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश

डोंगर पोखरणे सुरुच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 00:00 IST

खंडाळा परिसर : खदानीतून गौण खनिजाची विल्हेवाट

वैजापूर : तालुक्यातील खंडाळा येथील खदानीतून मागील काही दिवसांपासून क्रशरद्वारे मोठ्या प्रमाणावर दगडाचा अनधिकृत उपसा होत असल्याने येथील टेकड्या बोडख्या झाल्याचे चित्र आहे. यातून गौण खनिजाची विल्हेवाट लावली जात असल्याने लाखो रुपयांचा शासनाचा महसूल बुडत आहे.महसूल विभागाने लक्ष देऊन कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.या परिसरात प्रत्येक खाणीतून रोज सरासरी ४० ते ५० ट्रक दगडांची खोदाई आणि वाहतूक सुरु असते. प्रत्यक्षात मात्र पाच किंवा दहा ट्रकचीच रॉयल्टी तिजोरीत भरली जाते. खुल्या बाजारात क्रशरधारक दहा ते पंधरा हजार रुपयांना एक ट्रक दगड, खडीची विक्री करतात. या व्यवहारामागे त्यांना सरासरी एक ट्रकला चार ते पाच हजार रुपयांची कमाई होते.खंडाळा परिसरात बऱ्याच ठिकाणीबेकायदेशीरपणे दगडांच्या खाणी आहेत. महसूल विभागाने गेल्या वर्षी खंडाळा परिसरातील या खाणीवर कारवाई केली, पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही.जेथे दगड संपले अशा ठिकाणी डोंगराळ भागात सर्वत्र भले मोठे खड्डेच खड्डे पडले आहेत. या व्यवसायामुळे काही वर्षात खंडाळ्यातील डोंगर नष्ट होण्याची भीती आहे.महसूल व स्थानिक ग्रामपंचायतीचे याकडे लक्ष का जात नाही, हा मोठा प्रश्न आहे. डोंगर पोखरण्यास माफियांना सर्रास मूकसंमती येथे दिली जाते. या खाण व्यवसायात किती परवानाधारक ठेकेदार आहेत, याची तपासणी महसूल विभागाने करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.सुरुंग स्फोटके येतात कोठून?खाणीवर दगडाच्या उत्खननासाठी लागणारी सुरुंग स्फोटके कोठून येतात व ती कोठे साठवली जातात, याचा महसूल विभागाने किंवा सुरक्षा यंत्रणेने शोध घेतलेला नाही.खंडाळा परिसरातील दगड खाणींवर स्फोटकांची आतषबाजी होत असून अनेक ठिकाणी अपघात होऊन काही जणांना जीवही गमवावा लागला आहे. दगड खाणीवर सुरुंग स्फोट करणारा कामगार हा प्रशिक्षित असावा, मात्र दगड फोडणाºया मजुरांकडून ही जोखमीची कामे करून घेतली जातात.धुळीचे साम्राज्यदगडखाणींमुळे परिसरातील शेतीच धोक्यात आली आहे. खंडाळा गावाजवळ तब्बल बारा स्टोन क्रेशर व पंधरा दगडांच्या खाणी आहेत. या दगडांच्या खाणींजवळ स्टोन क्रशर सुरु असतात. त्यामुळं परिसर कायम धुळीत बुडालेला असतो. धुळीमुळे पिकांवर विपरीत परिणाम होत असून पाण्याची भूजल पातळी खालावत चालली आहे. लोकांच्या आरोग्यालाही धोका निर्माण झाला आहे. दगडाच्या खाणी गावाच्या अगदी जवळ आहेत. त्यामुळे भूसुरुंग स्फोटात उडालेले दगड मानवी वस्तीत येऊन पडतात. अशा घटनांमध्ये अनेक गावकरी जखमी झाले आहेत. शिवाय स्फोटांच्या हादºयाने अनेक घरांच्या भिंतींना तडेही गेले आहेत.तक्रार करुनही उपयोग नाहीयाविषयी खंडाळा येथील ग्रामस्थांनी तहसील कार्यालयात तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्याने आम्ही याविषयी जिल्हाधिकाºयांकडे लेखी तक्रार केली आहे, असे खंडाळ्याचे माजी उपसरपंच तथा ग्रा.पं.सदस्य साजीद खान यांनी सांगितले.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीTahasildarतहसीलदार