शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

चिमुकल्याला विहिरीत टाकून मातेची आत्महत्या

By admin | Updated: July 16, 2014 01:27 IST

औरंगाबाद : चिकलठाणा परिसरातील झाल्टा गावात काल रात्री एका २५ वर्षीय विधवा महिलेने प्रथम साडेतीन वर्षीय चिमुकल्याला विहिरीत फेकले अन् स्वत:ही विहिरीत उडी मारून आत्महत्या केली.

औरंगाबाद : चिकलठाणा परिसरातील झाल्टा गावात काल रात्री एका २५ वर्षीय विधवा महिलेने प्रथम साडेतीन वर्षीय चिमुकल्याला विहिरीत फेकले अन् स्वत:ही विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. महिलेने मुलासमवेत आत्महत्या का केली याचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकले नाही. रात्री उशिरा अग्निशामक विभागाच्या पथकाने मृतदेह बाहेर काढले. झाल्टा गावातील रहिवासी अरुणा काशीनाथ अंभोरे (२५) या महिलेच्या पतीचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले. तेव्हापासून ती मुलगा श्याम काशीनाथ अंभोरे (साडेतीन वर्षे) आणि वृद्ध सासूसोबत राहत होती. गरिबीमुळे शेतात काम करून मिळालेल्या मजुरीतून ती उपजीविका चालवीत होती. पतीच्या निधनानंतर तिची मानसिक स्थितीही खराब झाली होती. काल दिवसभर अरुणाने काम केले. सोमवारच्या सायंकाळी साडेसातच्या सुमारास चिमुकल्याला काखेत घेऊन ती घरातून निघाली. गावातील पी.के. शिंदे यांच्या घरासमोरील विहिरीसमोर गेली. विहिरीजवळ कोणी नसल्याचा अंदाज घेऊन तिने श्यामला विहिरीत फेकले. चिमुकला ओरडल्याने आजूबाजूला राहत असलेले नागरिक घराच्या बाहेर आले. तेवढ्यात तिनेही विहिरीतउडी मारली. नागरिक त्वरेने विहिरीकडे धावले. विहिरीला चार परस पाणी असल्याने या दोघा मायलेकांना वाचविणे त्यांना शक्य झाले नाही. पाण्याचा पंप सुरू केला; परंतु पाणी कमी होत नव्हते. अग्निशामक विभागाच्या मदतीने रात्री १ वाजता मायलेकाचे मृृतदेह बाहेर काढण्यात आले. या प्रकरणी चिकलठाणा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रिया थोरात, पोहेकॉ. शेख शकील करीत आहेत. शवविच्छेदनानंतर मुकुंदवाडीत राहणाऱ्या मामाकडे मृतदेह सोपविण्यात आले.