शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

असह्य वेदनेतून मुक्तीसाठी तीनवर्षीय मुलीला गळफास देऊन मातेने स्वतःही केली आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 11:29 IST

जन्मजात आजारामुळे असह्य त्रासाने विव्हळणाऱ्या आपल्या साडेतीनवर्षीय चिमुरडीला साडीने गळफास देऊन मातेने तिची मुक्तता केली

ठळक मुद्देजन्मापासूनच आजार असल्याने मुलगी असह्य वेदनाने त्रस्त असे मुलीचा होणारा त्रास पाहून आई बैचैन होई

औरंगाबाद : जन्मजात आजारामुळे असह्य त्रासाने विव्हळणाऱ्या आपल्या साडेतीनवर्षीय चिमुरडीला साडीने गळफास देऊन मातेने तिची मुक्तता केली आणि नंतर स्वत: गळफास घेऊन या जगाचा निरोप घेतल्याची हृदयद्रावक घटना रविवारी सायंकाळी बेगमपुऱ्यात घडली. स्वत:च्या वाढदिवसालाच विवाहितेने हे टोकाचे पाऊल उचलण्यामागे अन्य काही कारण आहे का, याचा शोध पोलीस घेत आहेत.

अमृता किशोर मुळे (२४, रा. बेगमपुरा) आणि अवंतिका किशोर मुळे (साडेतीन वर्षे), अशी मृत माय-लेकीची नावे आहेत. सहायक पोलीस आयुक्त गोवर्धन कोळेकर यांनी सांगितले की, बोबडेवाडी (ता.केज, जि. बीड) येथील अमृता आणि बेगमपुऱ्यातील किशोर यांचा विवाह २०१४ साली झाला. या दाम्पत्याला २०१५ साली अवंतिका ही मुलगी झाली. अवंतिकाला जन्मापासूनच आजार असल्याने तिच्यावर सतत उपचार करावे लागत होते. अवंतिका या आजारामुळे चिडचिड आणि रडारड करायची. अवंतिकाला होणारा त्रास पाहून अमृता बेचैन होई.

रविवारी दुपारी अमृता आणि अवंतिका यांनी जेवण केले. दुपारी तीन वाजेच्या सुमारास अमृता आणि अवंतिका पहिल्या मजल्यावरील त्यांच्या खोलीत होते. तब्येत ठीक नसल्याने अमृताचा पती किशोर दुसऱ्या मजल्यावरील खोलीत आराम करीत होते. चार वाजेच्या सुमारास किशोर झोपेतून उठले. जेवण करायचे असल्याने त्यांनी अमृताला उठविण्यासाठी खोलीचे दार ठोठावले; मात्र तिने आतून प्रतिसाद न दिल्याने ती झोपली असेल, असे समजून ते स्वयंपाक खोलीत जाऊन बसले. अर्धा ते पाऊण तासानंतर किशोरसह अन्य नातेवाईकांनी खोलीचे दार ठोठावले, मात्र अमृता आणि अवंतिका प्रतिसाद देत नसल्यामुळे सर्वांनी मिळून सव्वापाच वाजेच्या सुमारास दार तोडले. तेव्हा अमृता आणि अवंतिका या माय-लेकी गळफास घेतलेल्या अवस्थेत पंख्याला लटकलेल्या दिसल्या.

या घटनेची माहिती बेगमपुरा पोलिसांना देण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक विनोद बदक आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. त्यानंतर माय-लेकीचे मृतदेह घाटी रुग्णालयात हलविले.

...तर टळली असती घटनाअमृताचे शिक्षण पदवीपर्यंत झाले होते. तिचा पतीही पदवीधर असून, तो खाजगी वाहनचालक आहे. नोकरी मिळणे अवघड झाल्याने अमृताने काही दिवसांपूर्वीच शिवणक्लास लावला. ती रोज दुपारी एक ते तीन शिवणक्लासला जात असे. रविवारी सुटी असल्याने ती घरीच होती. तिचा जर आज शिवणक्लास असता तर चिमुकलीचा खून करून स्वत:ही आत्महत्या करण्याचा विचार तिच्या डोक्यात आला नसता आणि आजची घटना टळली असती, असे तिचे सासरे सहायक उपनिरीक्षक  दिलीप मुळे यांनी सांगितले. 

टॅग्स :MurderखूनSuicideआत्महत्याFamilyपरिवार