शहरं
Join us  
Trending Stories
1
हाँगकाँगमध्ये हाहाकार! २,००० फ्लॅट्सचे गगनचुंबी टॉवर एकाचवेळी पेटले, १३ जणांचा मृत्यू...
2
‘ऑनलाइन गेमिंग’मध्ये उच्चशिक्षित शेतकऱ्याला चुना, ३० लाखांची फसवणूक!
3
माणसाचं वय 150 वर्षांपर्यंत करेल AI, वैज्ञानिकांनी सांगितली अशी गोष्ट की तुम्हीही खुश व्हाल!
4
दिल्ली स्फोटात नाव आल्याची बतावणी, ७१ वर्षीय वृद्धाला २९ लाखांचा गंडा; सायबर गुन्हेगारांविरोधात गुन्हा दाखल
5
"प्रायव्हेट पार्टमध्ये रॉड टाकण्याची धमकी, न्यूड फोटोने ब्लॅकमेलिंग, इतर पुरुषांसोबत...!"; सेलिना जेटलीचे पतीवर 7 गंभीर आरोप
6
'या' स्मॉलकॅप कंपनीत रोहित शर्माची मोठी गुंतवणूक, खरेदी केले शेअर; इंट्रा-डेमध्ये स्टॉक बनला रॉकेट
7
राम मंदिर ध्वजारोहणावर बोलणं पाकिस्तानला महागात पडलं, भारतानं आरसा दाखवत गप-गार केलं!
8
महिंद्राने लाँच केली जगातील पहिली फॉर्म्युला ई-थीम एसयूव्ही, फ्यूचरिस्टिक डिझाइन अन् वर्ल्ड क्लास फीचर्स; जाणून घ्या किंमत
9
उज्ज्वला थिटेंना झटका! राजन पाटलांच्या सुनबाईच अनगरच्या नगराध्यक्ष होणार, न्यायालयात नेमके काय घडले?
10
'ब्लॅक फ्रायडे' म्हणजे काळा शुक्रवार...! मग भरमसाठ डिस्काऊंट देऊन साजरा का करतात कंपन्या...? 
11
Travel : कोल्डड्रिंकपेक्षाही स्वस्त पेट्रोल, इतर गोष्टीही खिशाला परवडणाऱ्या; भारतीयांसाठी व्हिसा फ्री आहे 'हे' बेट!
12
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
13
बिहार काँग्रेसच्या पराभवाची फाईल दिल्लीत उघडणार; ६१ उमेदवार जिल्हावार अहवाल सादर करणार
14
२०२६ ला ५ राशींची अग्निपरीक्षा सुरू, साडेसाती तीव्र होणार; शनि प्रकोप-प्रतिकूल, अखंड सावधान!
15
दत्त जयंती २०२५: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण कसे कराल? पाहा, नियम-योग्य पद्धत
16
भारताला २० वर्षांनी पुन्हा मान! शताब्दी 'राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०३०' चे यजमानपद या शहराच्या पारड्यात...
17
मोठी बातमी! २ कोटी लोकांचे आधार क्रमांक कायमचे बंद झाले; UIDAI ने सुरु केली मोहिम...
18
Cyclone Senyar: 'सेन्यार'ने वेग घेतला! दक्षिण आणि पूर्व किनाऱ्यावर ७२ तास राहणार मोठा धोका
19
Pune Crime: "तिच्या बेडरुममध्ये झोपवलं आणि..."; कोल्हापुरातील व्यक्तीसोबत पुण्यातील महिलेने काय काय केलं?
20
१० रुपयांपेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, झटक्यात २०% वाढला भाव; खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड
Daily Top 2Weekly Top 5

9.5 टक्के मुली सज्ञान होण्यापूर्वीच माता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 00:26 IST

२०११ च्या जनगणनेतील आकडेवारीनुसार राज्याच्या ग्रामीण भागात १८ वर्षांपूर्वी विवाह करणाºयांची संख्या १.४ टक्के एवढी असली तरी, प्रत्यक्षात वास्तव वेगळे आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ रिसर्च इन प्रॉडक्टीव्ह हेल्थ या मुंबईच्या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात नांदेड जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील ३१.५ टक्के एवढ्या आदिवासी मुलींचे सज्ञान होण्यापूर्वीच लग्न लावले जात असल्याचे पुढे आले आहे. विशेष म्हणजे, सर्वेक्षण केलेल्यांपैकी तब्बल साडेनऊ टक्क्यांहून अधिक मुली या १५ ते १९ या वयातच आईही झाल्याचे हा अहवाल सांगतो.

विशाल सोनटक्के ।लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: २०११ च्या जनगणनेतील आकडेवारीनुसार राज्याच्या ग्रामीण भागात १८ वर्षांपूर्वी विवाह करणाºयांची संख्या १.४ टक्के एवढी असली तरी, प्रत्यक्षात वास्तव वेगळे आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ रिसर्च इन प्रॉडक्टीव्ह हेल्थ या मुंबईच्या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात नांदेड जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील ३१.५ टक्के एवढ्या आदिवासी मुलींचे सज्ञान होण्यापूर्वीच लग्न लावले जात असल्याचे पुढे आले आहे. विशेष म्हणजे, सर्वेक्षण केलेल्यांपैकी तब्बल साडेनऊ टक्क्यांहून अधिक मुली या १५ ते १९ या वयातच आईही झाल्याचे हा अहवाल सांगतो.या संस्थेने आदिवासीबहुल असलेल्या राज्यातील नांदेड, गडचिरोली, नंदुरबार, धुळे आणि जळगाव या पाच जिल्ह्यांत जाऊन महिलांशी थेट संवाद साधून आदिवासी भागातील मातृआरोग्य निर्देशांकावर परिणाम करणाºया घटकांचा अभ्यास केला असता, वरील धक्कादायक माहिती पुढे आली आहे. महिलेची वैयक्तिक वैशिष्ट्ये, कौटुंबिक रचना, समुदाय प्रोफाईल, सुविधांची उपलब्धतता आणि प्रवेश योग्यता याबरोबरच शासकीय आरोग्य सुविधा या घटकांचा या सर्वेक्षणात अभ्यास करण्यात आला आहे.विशेषत: गर्भधारणेच्या पूर्वी तसेच प्रसूतीनंतर आदिवासी भागातील महिलांच्या आरोग्याकडे नेहमीच कानाडोळा होत असल्याचेही या सर्वेक्षणाच्या माध्यमातून स्पष्ट झाले आहे. नांदेड जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील आदिवासी महिलांशी संवाद साधला असता, गर्भवती असलेल्या यातील केवळ ६८.३ टक्के महिलांनी प्रथम प्रसूतीपूर्व तपासणी केल्याचे दिसून आले. गर्भवती स्त्रीची प्रसूतीपूर्व काळजी घेणे अत्यंत गरजेचे असते. मात्र याकडेही दुर्लक्ष होत असल्याचे दिसते.प्रसूतीपूर्व काळजीसाठी आरोग्य केंद्रात किमान चार भेटी देणे अपेक्षित आहे. मात्र नांदेड जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील तब्बल ३३ टक्के आदिवासी महिलांनी ही प्रसूतीपूर्व काळजी घेतलेली नव्हती. अशीच बाब टी.टी. संरक्षणाबाबतही दिसून येते. ७ टक्के महिलांनी गर्भवती असतानाही टी.टी.संरक्षण घेतलेले नव्हते. पूर्ण प्रसूतीपूर्वी प्रवेश केलेल्या गर्भवती महिलांची संख्या केवळ २८.३ टक्के असल्याचेही यावेळी दिसून आले.तर तब्बल ९ टक्के गर्भवती आदिवासी महिलांकडे नोंदणीकृत गर्भधारणा आणि बालसंरक्षण कार्डही (एमसीपी) नव्हते. विशेष म्हणजे, गर्भवती महिलांसाठी शासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या व या योजनेचा मोठ्या प्रमाणात गवगवा केला जात असलेल्या जननी सुरक्षा योजनेअंतर्गत आदिवासी भागातील केवळ ८.६ टक्के गर्भवती महिलांना आर्थिक सहाय्य लाभल्याचेही अहवाल सांगतो. बाळाच्या जन्मापूर्वी त्याचबरोबर जन्मानंतर बाळासह मातेला तातडीने आरोग्य सुविधा मिळणे गरजेचे असते. मात्र तब्बल २९.४ टक्के महिलांना प्रशिक्षित आरोग्य कर्मचाºयांकडून ही सुविधाही मिळालेली नसल्याचे या महिलांनी सर्वेक्षणावेळी सांगितले.एकूणच हा अहवाल पाहता आदिवासी भागातील महिलांच्या आरोग्याकडे कानाडोळा होत असल्याचे दिसून येते. विशेषत: गर्भवती महिलांना ज्या आरोग्य सुविधा उपलब्ध व्हायला हव्यात त्याचाही अभाव असल्याचे हे सर्वेक्षण सांगते. आरोग्य व्यवस्थेच्या बळकटीची गरज व्यक्त करतानाच, या महिलांच्या काळजीसाठीची तरतूदही करायला हवी. याबरोबरच आरोग्य सेवेच्या वापरामध्ये सामुदायिक सहभाग वाढविण्याची नितांत आवश्यकता असल्याचेही या अभ्यासावरुन स्पष्ट होते.