शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
2
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
3
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
4
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
5
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
6
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
7
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
8
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
9
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
10
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
11
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
12
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
13
Pandharpur Wari: वारीत गर्दी नियंत्रण, सुरक्षेसाठी ‘एआय’; ७ हजार पोलिस तैनात
14
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
15
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
16
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
17
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
18
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
19
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
20
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल

9.5 टक्के मुली सज्ञान होण्यापूर्वीच माता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 00:26 IST

२०११ च्या जनगणनेतील आकडेवारीनुसार राज्याच्या ग्रामीण भागात १८ वर्षांपूर्वी विवाह करणाºयांची संख्या १.४ टक्के एवढी असली तरी, प्रत्यक्षात वास्तव वेगळे आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ रिसर्च इन प्रॉडक्टीव्ह हेल्थ या मुंबईच्या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात नांदेड जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील ३१.५ टक्के एवढ्या आदिवासी मुलींचे सज्ञान होण्यापूर्वीच लग्न लावले जात असल्याचे पुढे आले आहे. विशेष म्हणजे, सर्वेक्षण केलेल्यांपैकी तब्बल साडेनऊ टक्क्यांहून अधिक मुली या १५ ते १९ या वयातच आईही झाल्याचे हा अहवाल सांगतो.

विशाल सोनटक्के ।लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: २०११ च्या जनगणनेतील आकडेवारीनुसार राज्याच्या ग्रामीण भागात १८ वर्षांपूर्वी विवाह करणाºयांची संख्या १.४ टक्के एवढी असली तरी, प्रत्यक्षात वास्तव वेगळे आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ रिसर्च इन प्रॉडक्टीव्ह हेल्थ या मुंबईच्या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात नांदेड जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील ३१.५ टक्के एवढ्या आदिवासी मुलींचे सज्ञान होण्यापूर्वीच लग्न लावले जात असल्याचे पुढे आले आहे. विशेष म्हणजे, सर्वेक्षण केलेल्यांपैकी तब्बल साडेनऊ टक्क्यांहून अधिक मुली या १५ ते १९ या वयातच आईही झाल्याचे हा अहवाल सांगतो.या संस्थेने आदिवासीबहुल असलेल्या राज्यातील नांदेड, गडचिरोली, नंदुरबार, धुळे आणि जळगाव या पाच जिल्ह्यांत जाऊन महिलांशी थेट संवाद साधून आदिवासी भागातील मातृआरोग्य निर्देशांकावर परिणाम करणाºया घटकांचा अभ्यास केला असता, वरील धक्कादायक माहिती पुढे आली आहे. महिलेची वैयक्तिक वैशिष्ट्ये, कौटुंबिक रचना, समुदाय प्रोफाईल, सुविधांची उपलब्धतता आणि प्रवेश योग्यता याबरोबरच शासकीय आरोग्य सुविधा या घटकांचा या सर्वेक्षणात अभ्यास करण्यात आला आहे.विशेषत: गर्भधारणेच्या पूर्वी तसेच प्रसूतीनंतर आदिवासी भागातील महिलांच्या आरोग्याकडे नेहमीच कानाडोळा होत असल्याचेही या सर्वेक्षणाच्या माध्यमातून स्पष्ट झाले आहे. नांदेड जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील आदिवासी महिलांशी संवाद साधला असता, गर्भवती असलेल्या यातील केवळ ६८.३ टक्के महिलांनी प्रथम प्रसूतीपूर्व तपासणी केल्याचे दिसून आले. गर्भवती स्त्रीची प्रसूतीपूर्व काळजी घेणे अत्यंत गरजेचे असते. मात्र याकडेही दुर्लक्ष होत असल्याचे दिसते.प्रसूतीपूर्व काळजीसाठी आरोग्य केंद्रात किमान चार भेटी देणे अपेक्षित आहे. मात्र नांदेड जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील तब्बल ३३ टक्के आदिवासी महिलांनी ही प्रसूतीपूर्व काळजी घेतलेली नव्हती. अशीच बाब टी.टी. संरक्षणाबाबतही दिसून येते. ७ टक्के महिलांनी गर्भवती असतानाही टी.टी.संरक्षण घेतलेले नव्हते. पूर्ण प्रसूतीपूर्वी प्रवेश केलेल्या गर्भवती महिलांची संख्या केवळ २८.३ टक्के असल्याचेही यावेळी दिसून आले.तर तब्बल ९ टक्के गर्भवती आदिवासी महिलांकडे नोंदणीकृत गर्भधारणा आणि बालसंरक्षण कार्डही (एमसीपी) नव्हते. विशेष म्हणजे, गर्भवती महिलांसाठी शासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या व या योजनेचा मोठ्या प्रमाणात गवगवा केला जात असलेल्या जननी सुरक्षा योजनेअंतर्गत आदिवासी भागातील केवळ ८.६ टक्के गर्भवती महिलांना आर्थिक सहाय्य लाभल्याचेही अहवाल सांगतो. बाळाच्या जन्मापूर्वी त्याचबरोबर जन्मानंतर बाळासह मातेला तातडीने आरोग्य सुविधा मिळणे गरजेचे असते. मात्र तब्बल २९.४ टक्के महिलांना प्रशिक्षित आरोग्य कर्मचाºयांकडून ही सुविधाही मिळालेली नसल्याचे या महिलांनी सर्वेक्षणावेळी सांगितले.एकूणच हा अहवाल पाहता आदिवासी भागातील महिलांच्या आरोग्याकडे कानाडोळा होत असल्याचे दिसून येते. विशेषत: गर्भवती महिलांना ज्या आरोग्य सुविधा उपलब्ध व्हायला हव्यात त्याचाही अभाव असल्याचे हे सर्वेक्षण सांगते. आरोग्य व्यवस्थेच्या बळकटीची गरज व्यक्त करतानाच, या महिलांच्या काळजीसाठीची तरतूदही करायला हवी. याबरोबरच आरोग्य सेवेच्या वापरामध्ये सामुदायिक सहभाग वाढविण्याची नितांत आवश्यकता असल्याचेही या अभ्यासावरुन स्पष्ट होते.