शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
2
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
3
'काँग्रेसमुळे जम्मू-काश्मीरचा एक भाग पाकिस्तानात गेला', पंतप्रधान मोदींचा घणाघात...
4
दरमहा लाखोंची कमाई; तरीही महिन्याच्या शेवटी खर्चाला पैसे उरत नाही? आर्थिक तज्ञांनी सांगितलं खरं कारण
5
लिव्ह-इन पार्टनरच्या सांगण्यावरून रुग्णालयातून बाळ चोरलं, पण परत येताना रस्ताच विसरली! आणखी एक चूक केली अन्...
6
"रोहित आर्यने जो मार्ग स्वीकारला तो चुकीचा, पण..." काँग्रेसचे उपस्थित केले गंभीर प्रश्न
7
"मी मालिकेत येईन पण...", शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है'मध्ये कमबॅक करणार? दिली प्रतिक्रिया
8
Mumbai Local Train Update: वांगणी-शेलू स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड; CSMT कडे जाणारी लोकलसेवा ठप्प
9
World Cup 2025 FINAL: टीम इंडियाला नडू शकते आफ्रिकन कर्णधार लॉरा वोल्वार्ड, जाणून घ्या रेकॉर्ड
10
भयानक! 'तो' वाद टोकाला गेला! बायकोने फेसबुक वापरल्याने नवरा संतापला, थेट जीवच घेतला
11
५ वर्षांसाठी ₹१० लाखांचं कार लोन घेतल्यास कोणत्या बँकेत किती पडेल EMI? पाहा संपूर्ण गणित
12
७-८ नव्हे तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा बनवण्यासाठी लागले तब्बल 'इतके' कोटी; महेश मांजरेकर म्हणाले- "बजेट वाढलं कारण..."
13
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
14
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
15
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग
16
नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्ती म्हणजे प्रेमाचा सागर, पण पोटात ज्वालामुखी; वाचा गुण दोष!
17
Rakhi Sawant : "मी दोन्ही किडन्या विकल्या, सलमानसाठी सोन्याची अंगठी घेतली"; राखी सावंतचा धक्कादायक दावा
18
सौदी अरेबियाने घेतला मोठा निर्णय! लाखों भारतीय मुस्लिमांवर होणार थेट परिणाम; नेमकं प्रकरण काय?
19
ट्रम्पना ठेंगा! भारतात परत येतेय 'ही' ऑटो कंपनी; ४ वर्षांपूर्वी बंद केलेली फॅक्ट्री परत होणार सुरू
20
वेगाची राणी...! महाराष्ट्राची लेक, डायना पंडोले इतिहास रचणार; फेरारी क्लब चॅलेंजमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला रेसर

राज्यात सर्वात महाग रिक्षाचे भाडे औरंगाबादेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 01:15 IST

सर्वात महाग रिक्षा औरंगाबादेत असल्याची प्रचीती आता बाहेरगावहून येणा-या प्रवाशांना येऊ लागली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : राज्यातील अनेक मोठ्या आणि लहान शहरांमध्ये रिक्षाची सेवा आहे. सर्वात महाग रिक्षा औरंगाबादेत असल्याची प्रचीती आता बाहेरगावहून येणा-या प्रवाशांना येऊ लागली आहे. शहरातील ९० टक्के रिक्षाचालक मीटरने भाडे आकारतच नाहीत. प्रत्येक प्रवाशाकडून ठरवूनच भाडे वसूल करतात. रिक्षाचालकांकडून अवाच्या सव्वा भाडे वसूल करण्यात येत असतानाही आरटीओ कोणतीच कारवाई करायला तयार नाही.ऐतिहासिक औरंगाबाद शहर कधीकाळी टांग्यांचे शहर म्हणून ओळखले जायचे. आता ही ओळख पुसली जाऊन आता हे रिक्षांचे शहर बनले आहे. त्यातही बेकायदा रिक्षांचे, मीटर नसलेल्या रिक्षांचे, बेशिस्त रिक्षाचालकांचे शहर म्हणून या औद्योगिकनगरीला दूषणे दिली जात आहेत.शहराच्या मुख्य अथवा सिडको बसस्थानकावर पाहुणा उतरला की, रिक्षाचालकाच्या रूपाने त्याला ऐतिहासिकनगरीच्या संस्कृतीची ओळख होते. किंबहुना गाडी बसस्थानकात शिरतानाच प्रवेशद्वारात अस्ताव्यस्त उभ्या असलेल्या रिक्षा पाहून हे शहर किती सुसंस्कृत आहे याचा अंदाज पाहुण्यांना येतो.शहरात आजमितीला २२ हजार रिक्षा आहेत; पण त्यातील निम्म्या बेकायदा आहेत! शहरात व्यवसाय करण्याचा अधिकृत परवानाच त्यांच्याकडे नाही. आरटीओ, वाहतूक नियंत्रक पोलीस, महापालिका या सगळ्यांचे नियम धाब्यावर बसवत या रिक्षा शहरात फिरून व्यवसाय करीत आहेत. त्यांच्यावर कारवाई झाली तरी ती जुजबी असते. काही होत नाही म्हणून रिक्षाचालकांची दादागिरी हळूहळू वाढू लागली आहे.नियमातून पळवाटा काढत, संबंधितांना त्यांचा ‘वाटा’ देत आपली वाट मोकळी करीत आहेत. रस्त्यात पडलेले खड्डे, अरुंद झालेल्या गल्लीबोळा, बंद पडलेले सिग्नल, अकार्यक्षम ट्रॅफिक पोलीस यामुळे सर्वसामान्य औरंगाबादकर अलीकडे बरेच वैतागले आहेत. एसटी महामंडळाची शहर बससेवा अत्यंत तोकडी असल्याने औरंगाबादकरांना रिक्षाशिवाय पर्याय नाही; पण याचा गैरफायदा रिक्षाचालक घेत असल्याने नागरिकांपुढील समस्या आणखी वाढल्या आहेत.