शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

राज्यात सर्वात महाग रिक्षाचे भाडे औरंगाबादेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 01:15 IST

सर्वात महाग रिक्षा औरंगाबादेत असल्याची प्रचीती आता बाहेरगावहून येणा-या प्रवाशांना येऊ लागली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : राज्यातील अनेक मोठ्या आणि लहान शहरांमध्ये रिक्षाची सेवा आहे. सर्वात महाग रिक्षा औरंगाबादेत असल्याची प्रचीती आता बाहेरगावहून येणा-या प्रवाशांना येऊ लागली आहे. शहरातील ९० टक्के रिक्षाचालक मीटरने भाडे आकारतच नाहीत. प्रत्येक प्रवाशाकडून ठरवूनच भाडे वसूल करतात. रिक्षाचालकांकडून अवाच्या सव्वा भाडे वसूल करण्यात येत असतानाही आरटीओ कोणतीच कारवाई करायला तयार नाही.ऐतिहासिक औरंगाबाद शहर कधीकाळी टांग्यांचे शहर म्हणून ओळखले जायचे. आता ही ओळख पुसली जाऊन आता हे रिक्षांचे शहर बनले आहे. त्यातही बेकायदा रिक्षांचे, मीटर नसलेल्या रिक्षांचे, बेशिस्त रिक्षाचालकांचे शहर म्हणून या औद्योगिकनगरीला दूषणे दिली जात आहेत.शहराच्या मुख्य अथवा सिडको बसस्थानकावर पाहुणा उतरला की, रिक्षाचालकाच्या रूपाने त्याला ऐतिहासिकनगरीच्या संस्कृतीची ओळख होते. किंबहुना गाडी बसस्थानकात शिरतानाच प्रवेशद्वारात अस्ताव्यस्त उभ्या असलेल्या रिक्षा पाहून हे शहर किती सुसंस्कृत आहे याचा अंदाज पाहुण्यांना येतो.शहरात आजमितीला २२ हजार रिक्षा आहेत; पण त्यातील निम्म्या बेकायदा आहेत! शहरात व्यवसाय करण्याचा अधिकृत परवानाच त्यांच्याकडे नाही. आरटीओ, वाहतूक नियंत्रक पोलीस, महापालिका या सगळ्यांचे नियम धाब्यावर बसवत या रिक्षा शहरात फिरून व्यवसाय करीत आहेत. त्यांच्यावर कारवाई झाली तरी ती जुजबी असते. काही होत नाही म्हणून रिक्षाचालकांची दादागिरी हळूहळू वाढू लागली आहे.नियमातून पळवाटा काढत, संबंधितांना त्यांचा ‘वाटा’ देत आपली वाट मोकळी करीत आहेत. रस्त्यात पडलेले खड्डे, अरुंद झालेल्या गल्लीबोळा, बंद पडलेले सिग्नल, अकार्यक्षम ट्रॅफिक पोलीस यामुळे सर्वसामान्य औरंगाबादकर अलीकडे बरेच वैतागले आहेत. एसटी महामंडळाची शहर बससेवा अत्यंत तोकडी असल्याने औरंगाबादकरांना रिक्षाशिवाय पर्याय नाही; पण याचा गैरफायदा रिक्षाचालक घेत असल्याने नागरिकांपुढील समस्या आणखी वाढल्या आहेत.