शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

वाळूज एमआयडीसीत उद्योजकांचा सुरक्षेवर अधिक भर; प्रत्येकाची केली जात आहे कसून तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 18:51 IST

तोडफोडीच्या घटनेनंतर धास्तावलेल्या उद्योजकांचा कारखान्यांच्या सुरक्षेवर अधिक भर आहे.

वाळूज महानगर (औरंगाबाद ) : तोडफोडीच्या घटनेनंतर धास्तावलेल्या उद्योजकांचा कारखान्यांच्या सुरक्षेवर अधिक भर आहे. प्रशासकीय यंत्रणेवर अवलंबून न राहता खबरदारीचा उपाय म्हणून सुरक्षारक्षकांकडून कारखान्यात कामासाठी ये-जा करणाऱ्या कामगाराची कसून तपासणी केली जात आहे. 

वाळूज उद्योगनगरीतील कारखान्यांची ९ आॅगस्ट रोजी समाजकंटकांनी मोठ्या प्रमाणात तोडफोड केली. या घटनेने संपूर्ण उद्योगनगरी हादरून गेली.  तोडफोडीमुळे अनेक उद्योगांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. या धक्क्यातून सावरत उद्योजक सुरक्षेवर अधिक भर देताना दिसून येत आहेत. औद्योगिक वसाहतीत लहान-मोठ्या जवळपास ३ हजारांवर कंपन्या असून, लाखो कामगार काम करतात; मात्र बऱ्याच कामगारांची पूर्ण माहिती ना कंपनी व्यवस्थापनाकडे असते ना ठेकेदाराकडे. त्यामुळे त्या कामगारापर्यंत पोहोचणे बऱ्याचदा कंपनी व्यवस्थापनासह प्रशासकीय यंत्रणेला अवघड जाते. 

प्रशासकीय यंत्रणेवर अधिक अवलंबून न राहता स्वत:च उद्योजकांकडून सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत. अनेक कारखान्यांच्या परिसरात सीसीटीव्ही लावण्यासह संरक्षक भिंतीची उंची वाढविली जात आहे. सुरक्षा रक्षकांच्या संख्येतही वाढ केली जात आहे. या बाह्य सुरक्षा उपायांबरोबरच कारखान्याच्या आतील सुरक्षेलाही महत्त्व दिले जात आहे. कारखान्यात कामासाठी ये-जा करणाऱ्या कामगारांचीही सुरक्षा रक्षकांमार्फत तपासणी केली जात आहे, तसेच कामगार पुरवणाऱ्या ठेकेदारालाही संबंधित कामगारांची सर्व इत्थंभूत माहिती संकलित करण्यासाठी कंपनी व्यवस्थापनाकडून तंबी देण्यात आली आहे.  

सुरक्षारक्षकामार्फत तपासणी कारखान्यात यंत्रसामग्रीबरोबरच उत्पादित केलेला पक्का माल असतो. हा माल थोडा जरी डॅमेज झाला तरी कंपनीचे नुकसान होते. शिवाय कंपनीत ज्वलनशील पदार्थही असतात. याची फार काळजी घ्यावी लागते. तोडफोडीच्या घटनेमुळे कंपनी व्यवस्थापन सतर्क झाले आहे. कारखान्यातील वस्तूची चोरी होऊ नये, तसेच धोकादायक वस्तू, पदार्थ कारखान्यात जाऊ नये म्हणून कामगारांची सुरक्षा रक्षकामार्फत तपासणी केली जात आहे. 

टॅग्स :Waluj MIDCवाळूज एमआयडीसीEmployeeकर्मचारीAurangabadऔरंगाबाद