शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
5
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
8
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
9
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
10
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
11
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
12
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
13
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
14
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
15
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
16
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
17
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
18
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
19
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
20
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान

वाळूज एमआयडीसीत उद्योजकांचा सुरक्षेवर अधिक भर; प्रत्येकाची केली जात आहे कसून तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 18:51 IST

तोडफोडीच्या घटनेनंतर धास्तावलेल्या उद्योजकांचा कारखान्यांच्या सुरक्षेवर अधिक भर आहे.

वाळूज महानगर (औरंगाबाद ) : तोडफोडीच्या घटनेनंतर धास्तावलेल्या उद्योजकांचा कारखान्यांच्या सुरक्षेवर अधिक भर आहे. प्रशासकीय यंत्रणेवर अवलंबून न राहता खबरदारीचा उपाय म्हणून सुरक्षारक्षकांकडून कारखान्यात कामासाठी ये-जा करणाऱ्या कामगाराची कसून तपासणी केली जात आहे. 

वाळूज उद्योगनगरीतील कारखान्यांची ९ आॅगस्ट रोजी समाजकंटकांनी मोठ्या प्रमाणात तोडफोड केली. या घटनेने संपूर्ण उद्योगनगरी हादरून गेली.  तोडफोडीमुळे अनेक उद्योगांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. या धक्क्यातून सावरत उद्योजक सुरक्षेवर अधिक भर देताना दिसून येत आहेत. औद्योगिक वसाहतीत लहान-मोठ्या जवळपास ३ हजारांवर कंपन्या असून, लाखो कामगार काम करतात; मात्र बऱ्याच कामगारांची पूर्ण माहिती ना कंपनी व्यवस्थापनाकडे असते ना ठेकेदाराकडे. त्यामुळे त्या कामगारापर्यंत पोहोचणे बऱ्याचदा कंपनी व्यवस्थापनासह प्रशासकीय यंत्रणेला अवघड जाते. 

प्रशासकीय यंत्रणेवर अधिक अवलंबून न राहता स्वत:च उद्योजकांकडून सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत. अनेक कारखान्यांच्या परिसरात सीसीटीव्ही लावण्यासह संरक्षक भिंतीची उंची वाढविली जात आहे. सुरक्षा रक्षकांच्या संख्येतही वाढ केली जात आहे. या बाह्य सुरक्षा उपायांबरोबरच कारखान्याच्या आतील सुरक्षेलाही महत्त्व दिले जात आहे. कारखान्यात कामासाठी ये-जा करणाऱ्या कामगारांचीही सुरक्षा रक्षकांमार्फत तपासणी केली जात आहे, तसेच कामगार पुरवणाऱ्या ठेकेदारालाही संबंधित कामगारांची सर्व इत्थंभूत माहिती संकलित करण्यासाठी कंपनी व्यवस्थापनाकडून तंबी देण्यात आली आहे.  

सुरक्षारक्षकामार्फत तपासणी कारखान्यात यंत्रसामग्रीबरोबरच उत्पादित केलेला पक्का माल असतो. हा माल थोडा जरी डॅमेज झाला तरी कंपनीचे नुकसान होते. शिवाय कंपनीत ज्वलनशील पदार्थही असतात. याची फार काळजी घ्यावी लागते. तोडफोडीच्या घटनेमुळे कंपनी व्यवस्थापन सतर्क झाले आहे. कारखान्यातील वस्तूची चोरी होऊ नये, तसेच धोकादायक वस्तू, पदार्थ कारखान्यात जाऊ नये म्हणून कामगारांची सुरक्षा रक्षकामार्फत तपासणी केली जात आहे. 

टॅग्स :Waluj MIDCवाळूज एमआयडीसीEmployeeकर्मचारीAurangabadऔरंगाबाद