शहरं
Join us  
Trending Stories
1
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
2
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
3
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
4
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
5
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
6
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
7
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
8
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
9
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
10
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
11
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
12
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
13
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय
14
पत्नीकडे फोन, बँक खात्याचे पासवर्ड मागणे हा घरगुती हिंसाचार, छत्तीसगड उच्च न्यायालय
15
व्यवस्थापन कोट्यातील जागांसाठी विद्यार्थ्यांची लूट; विद्यापीठाने देखरेख समिती नेमावी : युवा सेना
16
व्हिजन डाॅक्युमेंटसाठीचा मसुदा इंग्रजीत! शिक्षणतज्ज्ञांमध्ये आश्चर्य; इंग्रजीला देण्यात आलेल्या प्राधान्याबद्दल आता टीका
17
नवी मुंबई महापालिका राज्यात पहिली; मीरा-भाईंदर देशातले ‘सर्वांत स्वच्छ शहर’
18
हनी-मनिट्रॅप : मंत्री, अधिकारी अस्वस्थ ! ‘आपले नाव त्यात नाही ना?’ अशी धास्ती...
19
अस्वस्थ जगाच्या जखमा कोण बांधू शकेल? - भारत!
20
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   

महिन्याची ‘वेटिंग’ आली १५ दिवसांवर

By admin | Updated: January 1, 2017 23:51 IST

बीड : रबी हंगामातील पिके ऐन बहरात असतानाच रोहित्रांच्या बिघाडात मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती.

बीड : रबी हंगामातील पिके ऐन बहरात असतानाच रोहित्रांच्या बिघाडात मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. परिणामी, पिके सुकू लागली असतानाच मुख्य कार्यालयाकडून शंभर रोहित्रांचा पुरवठा झाल्याने जिल्ह्यातील परिस्थिती आटोक्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांसह अधिकारी, कर्मचाऱ्यांनादेखील दिलासा मिळाला आहे.रबी हंगाम सुरू होताच गेल्या चार वर्षांपासून बंद असलेले कृषी पंप अचानक सुरू झाल्याने रोहित्रांवरील भार वाढला होता. त्यामुळे बिघडलेल्या रोहित्रांची संख्या ५०० वर गेली होती. त्वरित रोहित्र मिळण्याकरिता शेतकऱ्यांचे खेटे विभागीय कार्यालयाकडे वाढले होते. दिवसाकाठी २०-२५ रोहित्रांत बिघाड होत असून, केवळ २-४ रोहित्रे दुरुस्ती होऊन मिळत असल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांची दमछाक होत होती. अधिकाऱ्यांच्या आश्वासनाला वैतागून अनेक वेळा वैतागून शेतकरी आक्रमक झाल्याच्याही घटना घडल्या आहेत. मात्र, हिवाळी अधिवेशनाच्या वेळी पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी हा प्रश्न अधिक गांभीर्याने मांडला होता. शिवाय, येथील अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही मुख्य कार्यालयाकडे वेळोवेळी पाठपुरावा केल्याने २०० रोहित्रे मंजूर झाली होती. यापैकी १०० रोहित्रे मिळाली असून, अंबाजोगाई व बीड विभागाकरिता प्रत्येकी ५० रोहित्रे दिल्याने काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. रोहित्रांकरिता २ कोटी रुपयांचा प्रस्ताव प्रशासनातर्फे मुख्य कार्यालयाकडे गेला असून, आणखी रोहित्रे मिळण्याची आशा आहे. (प्रतिनिधी)