शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
2
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
3
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
4
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
5
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
6
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
7
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
8
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
9
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
10
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
11
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
12
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
13
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
14
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
15
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
16
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
17
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
18
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
19
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
20
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे

मनी पेज/भारताचे यश

By | Updated: November 28, 2020 04:10 IST

मुंबई : येथे आयोजित करण्यात आलेल्या एका ‘पॅनल डिस्कशन’मध्ये जागतिक पातळीवरील व्यावसायिक नेत्यांनी भारताच्या कोरोना साथकालीन यशाची प्रशंसा केली ...

मुंबई : येथे आयोजित करण्यात आलेल्या एका ‘पॅनल डिस्कशन’मध्ये जागतिक पातळीवरील व्यावसायिक नेत्यांनी भारताच्या कोरोना साथकालीन यशाची प्रशंसा केली आहे. ॲव्हगॉल, ॲप्टर समूह, एएमपी एनर्जी आणि आयसीआयसीआय बँक कॅनडा या बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या प्रमुखांनी एकमुखाने म्हटले की, भारताने कंपन्यांना आकर्षित करण्यासाठी आवश्यक असलेले वातावरण कायम राखण्यात यश मिळविले आहे.

व्यावसायिक सल्लागार संस्था नेक्सडिग्मने अमेरिका-भारत व्यवसाय परिषद (यूएसआयबीसी) आणि आयसीआयसीआय बँक कॅनडा यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम आयोजित केला होता.

ॲव्हगॉल नॉनओव्हनचे सीईओ शाचर रॅशिम यांनी सांगितले की, मध्य प्रदेशातील प्रकल्प उभारण्यासाठी आम्हाला राज्य सरकारे, स्थानिक संस्था आणि बँका यांच्याकडून भरपूर पाठबळ मिळाले. त्यामुळे आम्ही २०२१ च्या अखेरपर्यंत गुजरातेत आणखी एक प्रॉडक्शन लाइन उभारण्याचा विचार करीत आहोत.

इन्व्हेस्ट इंडियाचे उपाध्यक्ष विवेक अब्राहम यांनी सांगितले की, कोविड-१९मुळे नवी आव्हाने उभी केली तशाच काही संधीही निर्माण केल्या. यातील आरोग्य आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील संधींचा भारताला लाभ झाला आहे. कारण या क्षेत्रांत भारताकडे नैसर्गिक शक्ती आहे. उदा. पीपीई कीट ही साथपूर्व काळात अगदीच छाेटी संधी होती. साथीनंतर ती प्रचंड मोठी झाली.

ॲप्टर समूहाचे भारत व दक्षिण आशिया विभागाचे अध्यक्ष कंवल टिकू यांनी सांगितले की, बाजारात भरपूर संधी, परवडणारे व कुशल मनुष्यबळ आणि भारताचा वस्तू उत्पादन स्थान म्हणून होत असलेला उदय हे भारतातील व्यवसायाचे तीन चालक आहेत. त्यांना सरकारचा मजबूत पाठिंबा आहे. भारत हा अशा एका बाजारात रूपांतरित होत आहे, ज्यात उत्तम माहिती, उत्तम संपर्क आणि जागतिक दर्जाची मागणी यांचा सुयोग्य समन्वय आहे.