शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : टॉस जिंकून फसलो! थेट शुभमन गिलचं नाव घेत सूर्या म्हणाला, तो पहिल्याच बॉलवर आउट झाला अन्...
2
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
3
‘गोल्डन डक’मुळं गिलच्या निवडीवर प्रश्नचिन्ह; संजूसह टीम इंडियातील ‘वशीलेबाजी’चा मुद्दा पुन्हा चर्चेत
4
धोकादायक सेस इमारतींचा तिढा सुटला; मुंबई 'पागडीमुक्त' होणार, पुनर्विकाच्या नव्या नियमावलीची शिंदेंकडून घोषणा
5
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा पलटवार; घरच्या मैदानात टीम इंडियावर ओढावली T20I मधील सर्वात मोठ्या पराभवाची नामुष्की
6
वसंत मोरे थोडक्यात बचावले; नवले पुलावरील अपघातांवर बोलत असतानाच भरधाव टेम्पो आला अन्..
7
VIDEO : अर्शदीपची ओव्हर संपता संपेना; लाजिरवाण्या रेकॉर्डनंतर डगआउटमध्ये बसलेला गंभीर चिडला!
8
नीलेश घायवळ न्यायालयाकडून फरार घोषित; संपूर्ण मालमत्ता जप्त होण्याची शक्यता
9
FIH Hockey Men’s Junior World Cup 2025 : भारताच्या युवा हॉकी संघाचे PM मोदींकडून खास शब्दांत कौतुक, म्हणाले...
10
"एकदा भावाचा टी-शर्ट घालून मॅच खेळायला गेले अन्..."; महिला क्रिकेटर शेफालीचा धमाल किस्सा
11
IND vs SA : विकेटमागे जितेशची चपळाई! क्विंटन डी कॉकवर ओढावली 'नर्व्हस नाइंटी'ची नामुष्की (VIDEO)
12
"ते पार्ट टाइम पॉलिटिशियन, त्यांना गोपनीय परदेश दौऱ्यांचा छंद..."; मुस्लीम महिला नेत्या राहुल गांधींवर स्पष्टच बोलल्या
13
Indigo ला साडेसाती भोवली? दोन शत्रू ग्रहांमुळे अशी ‘दशा’ झाली; २०२७ पर्यंत आव्हान कायम अन्…
14
लुथरा बंधूंची अटकपूर्व जामीन याचिका फेटाळली; HC म्हणाले, “जिवाला धोका असल्याचा पुरावा...”
15
"मी स्वतःच फॉर्म भरला नाही, आता दंगलखोरांच्या पक्षासमोर...!" SIR वरून ममतांचा हल्लाबोल
16
इम्रान खानच्या तुरुंगात अडचणी आणखी वाढणार! पाकिस्तानने २४ तासात घेतले ५ मोठे निर्णय
17
"'मी गोमांस खातो, कोण मला अडवतं?', म्हणणाऱ्या मंत्र्यासोबत अमित शाह जेवताहेत, हिम्मत असेल तर...!"; उद्धव ठाकरे यांचं थेट आव्हान
18
T20 World Cup 2026 Tickets Live: ICC चा ऐतिहासिक निर्णय! फक्त १०० रुपयांत बूक करा वर्ल्ड कपचं तिकीट
19
"खुर्चीसाठी स्वत:चं पायपुसणं करून घेणाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांवर बोलू नये"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
20
IND vs SA 2nd T20I : अखेर सूर्या भाऊनं डाव साधला! टॉसचा बॉस होण्यासाठी यावेळी आजमावला हा फंडा
Daily Top 2Weekly Top 5

कलाकारांचे फाजील लाड करू नका : मोहन आगाशे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 16:11 IST

‘उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही’

ठळक मुद्देमराठवाडा साहित्य परिषदेच्या पुरस्कारांचे थाटात वितरण  आज चांगली माणसे आहेत का, असा प्रश्न पडतो.

औरंगाबाद : ‘कला’ ही जगण्यातील आनंद निर्माण करते. प्रत्येकाच्या अंगी ‘कला’ असते. त्यामुळे कलाकार काही वेगळा नसतो; पण आपण कलाकारांचे फाजील लाड करीत असतो. त्यासाठी पुरस्कार देणे बंद करा, अशी उपरोधिक टीका ज्येष्ठ रंगकर्मी मोहन आगाशे यांनी मंगळवारी येथे केली.   

मराठवाडा साहित्य परिषदेच्या   पुरस्कार वितरण सोहळ्यात ते मंगळवारी बोलत होते. ज्येष्ठ कवी ना.धों. महानोर यांच्या हस्ते भाई संपतराव पवार यांना ‘मी लोकांचा सांगाती’ या ग्रंथासाठी यशवंतराव चव्हाण विशेष वाङ्मय पुरस्कार देण्यात आला. तसेच नटवर्य लोटू पाटील नाट्यपुरस्कार रंगकर्मी मोहन आगाशे यांना प्रदान करण्यात आला. 

डॉ. आगाशे म्हणाले की, आपल्याकडून करून घेणारा तो वरती असतो, आपण फक्त निमित्त मात्र असतो. जगणे सुंदर करण्यासाठी आपल्या अंगी एक ‘कला’(छंद) बाळगली पाहिजे. ती ‘कला’ अशी सहचरणी आहे, जी आयुष्याच्या शेवटपर्यंत तुमची साथ देईल. ते पुढे म्हणाले की, मला आज मिळालेला पुरस्कार हा माझा एकट्याचा नसून मला साथ देणाऱ्या सर्व सहकलाकारांचा आहे. जंगलात गिधाड कमी झाली आहेत. मात्र, समाजात गिधाड प्रवृत्तीच्या माणसांची संख्या एवढी वाढली की आज चांगली माणसे आहेत का, असा प्रश्न पडतो. ‘उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही’, असे म्हणत त्यांनी आपले मनोगत थांबविले.  

डॉ. आगाशे हे रंगभूमीवरील बुद्धिवान रंगकर्मी असा उल्लेख प्रा. दिलीप घारे यांनी केला. संपतराव पवार यांनी  शासकीय मदत न घेता गावाचा विकास केला, असा उल्लेख डॉ. मनोहर जाधव यांनी केला. संपतराव पवार व मोहन आगाशे हे दोघे आयुष्य जगण्याची सूत्र शिकवितात, असे उद्गार ना.धों. महानोर यांनी व्यक्त केले. प्रास्ताविकप्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांनी केले.  सूत्रसंचालन कार्यवाह दादा गोरे यांनी केले. 

समाजात आत्मभान निर्माण करा पुरस्काराला उत्तर देताना संपतराव पवार म्हणाले की, समाजात मोठे बळ आहे, शासकीय मदतीशिवाय गावाचा विकास होऊ शकतो. हे आत्मभान मी समाजात निर्माण केले. त्यातून गावाचा विकास साधला. सर्व काही सरकार करील ही वृत्ती बदलून स्वाभिमानाने जगण्याचा आत्मविश्वास समाजात निर्माण केला तर परिवर्तन घडेल. मी काही साहित्यिक नाही; पण समाजकार्य करताना जे काही घडले ते ‘‘मी लोकांचा सांगाती’ या पुस्तकात शब्दबद्ध केले. 

टॅग्स :Mohan Agasheमोहन आगाशेAurangabadऔरंगाबादcultureसांस्कृतिक