शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

कलाकारांचे फाजील लाड करू नका : मोहन आगाशे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 16:11 IST

‘उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही’

ठळक मुद्देमराठवाडा साहित्य परिषदेच्या पुरस्कारांचे थाटात वितरण  आज चांगली माणसे आहेत का, असा प्रश्न पडतो.

औरंगाबाद : ‘कला’ ही जगण्यातील आनंद निर्माण करते. प्रत्येकाच्या अंगी ‘कला’ असते. त्यामुळे कलाकार काही वेगळा नसतो; पण आपण कलाकारांचे फाजील लाड करीत असतो. त्यासाठी पुरस्कार देणे बंद करा, अशी उपरोधिक टीका ज्येष्ठ रंगकर्मी मोहन आगाशे यांनी मंगळवारी येथे केली.   

मराठवाडा साहित्य परिषदेच्या   पुरस्कार वितरण सोहळ्यात ते मंगळवारी बोलत होते. ज्येष्ठ कवी ना.धों. महानोर यांच्या हस्ते भाई संपतराव पवार यांना ‘मी लोकांचा सांगाती’ या ग्रंथासाठी यशवंतराव चव्हाण विशेष वाङ्मय पुरस्कार देण्यात आला. तसेच नटवर्य लोटू पाटील नाट्यपुरस्कार रंगकर्मी मोहन आगाशे यांना प्रदान करण्यात आला. 

डॉ. आगाशे म्हणाले की, आपल्याकडून करून घेणारा तो वरती असतो, आपण फक्त निमित्त मात्र असतो. जगणे सुंदर करण्यासाठी आपल्या अंगी एक ‘कला’(छंद) बाळगली पाहिजे. ती ‘कला’ अशी सहचरणी आहे, जी आयुष्याच्या शेवटपर्यंत तुमची साथ देईल. ते पुढे म्हणाले की, मला आज मिळालेला पुरस्कार हा माझा एकट्याचा नसून मला साथ देणाऱ्या सर्व सहकलाकारांचा आहे. जंगलात गिधाड कमी झाली आहेत. मात्र, समाजात गिधाड प्रवृत्तीच्या माणसांची संख्या एवढी वाढली की आज चांगली माणसे आहेत का, असा प्रश्न पडतो. ‘उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही’, असे म्हणत त्यांनी आपले मनोगत थांबविले.  

डॉ. आगाशे हे रंगभूमीवरील बुद्धिवान रंगकर्मी असा उल्लेख प्रा. दिलीप घारे यांनी केला. संपतराव पवार यांनी  शासकीय मदत न घेता गावाचा विकास केला, असा उल्लेख डॉ. मनोहर जाधव यांनी केला. संपतराव पवार व मोहन आगाशे हे दोघे आयुष्य जगण्याची सूत्र शिकवितात, असे उद्गार ना.धों. महानोर यांनी व्यक्त केले. प्रास्ताविकप्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांनी केले.  सूत्रसंचालन कार्यवाह दादा गोरे यांनी केले. 

समाजात आत्मभान निर्माण करा पुरस्काराला उत्तर देताना संपतराव पवार म्हणाले की, समाजात मोठे बळ आहे, शासकीय मदतीशिवाय गावाचा विकास होऊ शकतो. हे आत्मभान मी समाजात निर्माण केले. त्यातून गावाचा विकास साधला. सर्व काही सरकार करील ही वृत्ती बदलून स्वाभिमानाने जगण्याचा आत्मविश्वास समाजात निर्माण केला तर परिवर्तन घडेल. मी काही साहित्यिक नाही; पण समाजकार्य करताना जे काही घडले ते ‘‘मी लोकांचा सांगाती’ या पुस्तकात शब्दबद्ध केले. 

टॅग्स :Mohan Agasheमोहन आगाशेAurangabadऔरंगाबादcultureसांस्कृतिक