शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

मोदी लाटेवर दानवे स्वार!

By admin | Updated: May 17, 2014 00:20 IST

संतोष धारासूरकर , जालना गेल्या निवडणुकीत अवघ्या ८४८२ मतांनी विजय पटकाविलेल्या खा. रावसाहेब दानवेयांनी मोदींच्या त्सुनामी लाटेवर स्वार होत विरोधकांना पुन्हा ‘चकवा’ दिला.

संतोष धारासूरकर , जालना गेल्या निवडणुकीत अवघ्या ८ हजार ४८२ मतांनी विजय पटकाविलेल्या खा. रावसाहेब दानवे पाटील यांनी तुल्यबळ लढतीच्या हवेत मोदींच्या त्सुनामी लाटेवर स्वार होत विरोधकांना पुन्हा ‘चकवा’ दिला. महायुतीचे खा. दानवे विरूद्ध काँग्रेस आघाडीचे विलास औताडे यांच्यातील लढत तुल्यबळ होईल, असे चित्र निर्माण झाले होते. विशेषत: तीन वेळा हॅटट्रीक केलेल्या दानवेंविरोधात आघाडीने संपूर्ण रणधुमाळीत अक्षरश: टीकेचे झोड उठविले. त्याव्दारे दानवेंना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले होते. त्यांच्या कार्यपद्धतीवर कडवट टीका करतेवेळी आघाडीने वैयक्तिक पातळीही गाठली. काँग्रेसचे चार व राष्ट्रवादीचे दोन असे एकूण सहा आमदार व स्थानिक स्वराज्य संस्थांसारख्या सत्तास्थानांच्या माध्यमातून राजकीयदृष्ट्या सक्षम असणार्‍या आघाडीने या निवडणुकीच्या माध्यमातून पंधरा वर्षापासूनचा राजकीय वनवास संपविण्याचा संकल्प सोडला होता. औताडेंचा उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी आघाडीने जोरदार शक्तीप्रदर्शन तर केलेच; आघाडी अंतर्गत ऐक्याचे दर्शनसुद्धा घडविले. विशेषत: तेथूनच दानवेंविरोधात पद्धतशीरपणे राळ उडविण्यास सुरूवात केली. वनवास संपवू असा संकल्प करणार्‍या या लोकप्रतिनिधींनी ‘आमच्यात मताधिक्यासाठी स्पर्धा सुरू झाली आहे,’ अशाही वल्गना केल्या. त्यामुळे आघाडीअंतर्गत पदाधिकार्‍यांसह सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या भुवया उंचावल्या. ‘कोरी पाटी’ असणारे औताडे गटबाजीच्या राजकारणात अडकणार नाहीत, असा आत्मविश्वास कार्यकर्त्यांत निर्माण झाला. शक्तीप्रदर्शनापासून दानवेंविरोधातील वातावरण आघाडीने पेटविण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसचे स्टार प्रचारक खा. राहुल गांधी यांच्या जाहीर सभेतून आघाडीने पुन्हा शक्तिप्रदर्शन घडवून महायुतीत अस्वस्थता निर्माण केली. त्यास प्रत्युत्तर म्हणून मोदींची सभा हवीच, असे महायुतीस वाटले खरे, परंतु मोदींची सभा मिळालीच नाही. मात्र, आपल्या विरोधातील नकारात्मक सूर मतपेटीतून उमटू नये म्हणून दानवेंनी जिवाचे रान केले. मोदी लाटेवर स्वार होण्याचा चंग बांधला. ‘होमपीच’ भोकरदनसह बदनापूर व पैठणवर लक्ष केंद्रित केले. फुलंब्री व सिल्लोडला आघाडीत सुरूंग लावला. अखेर शहरी व ग्रामीण भागातील मोदी लाटेने हतबल झालेल्या आघाडीने दानवेंसमोर सपशेल शरणागती पत्करली. जिंकल्याचे कारण शहरी व ग्रामीण भागातील मोदी लाट नियोजनबद्ध अशी प्रचारयंत्रणा रणधुमाळीतील फोडा-फोडीचे राजकारण २२ निवडणुकांचा भक्कम अनुभव हरल्याचे कारण शहरी व ग्रामीण भागातील मोदी लाट आघाडीची ढिसाळ प्रचारयंत्रणा सत्तारूढ आमदारांचा फाजील आत्मविश्वास काँग्रेसविरोधी नकारात्मक सूराचा फटका या कारणांमुळे मिळाला विजय गेल्या चार महिन्यांपासून संपूर्ण देशभरात उसळलेल्या नरेंद्र मोदींच्या लाटेवर खा. रावसाहेब दानवे पाटील हे सहजपणे स्वार झाले. तीन वेळा हॅटट्रिक केलेल्या दानवेंविरोधात विरोधकांनी आळवलेला नकाराचा सूर लाटेत पार विरघळला. राजकीय आयुष्यात २२ वेळा निवडणुका लढविलेल्या व २१ निवडणुकांमधून यश पटकाविलेल्या दानवे यांनी या निवडणुकीत अनुभवाच्या भक्कम शिदोरीवरच विरोधकांना पुन्हा ‘चकवा’ दिला. २२ व्या वेळीही यश मिळविले. या मतदारसंघात राजकीयदृष्ट्या आघाडीचे प्रचंड प्राबल्य होते. काँग्रेसचे चार व राष्ट्रवादीचे दोन आमदार तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांसारखी सत्तास्थाने पाठीशी असतानासुद्धा आघाडीअंतर्गत लोकप्रतिनिधींसह पुढार्‍यांमधील ‘ओव्हर कॉन्फिडन्स’ दानवेंच्या पथ्यावर पडला.