शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकारने शिष्यवृत्तीमध्ये केली मोठी वाढ; विरोधक करताहेत दिशाभूल - नमिता मुंदडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 19:08 IST

2017 ते २०२० या कालावधीत अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठीच्या शिष्यवृत्ती करिता दरवर्षी ११०० कोटी रुपये निधी दिला जात होता. आता आगामी पाच वर्षांत दरवर्षी हा निधी ६ हजार कोटी रुपये करण्यात आला आहे.

ठळक मुद्देनिधीतील केंद्र सरकारचा वाटा ६० टक्के असून राज्य सरकारांना ४० टक्के खर्च करावा लागणार आहे कॉंग्रेस प्रणित युपीए सरकारने केवळ राजकारणासाठीच फुले,शाहू, आंबेडकर यांच्या नावाचा वापर केला.

औरंगाबाद: केंद्र सरकारतर्फेशिष्यवृत्ती बंद करण्याचे षडयंत्र असल्याचे दर्शवून नागपुरात विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ सुखदेव थोरात यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाचा फार्स करण्यात आला होता. कॉंग्रेस धुरिणांची मर्जी राखण्यासाठी अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांची नाहक दिशाभूल करण्याचा डाव आखला गेला होता अशी टिका आज येथे केजच्या भाजपच्या आमदार नमिता मुंदडा यांनी पत्रकार परिषदेत केला.

त्यांनी सांगितले की, अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षण शिष्यवृत्तीच्या निधीमध्ये ५९ हजार कोटी रुपये अशी भरीव वाढ मोदी सरकारने केली आहे. आतापर्यंत अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना केंद्र सरकारच्या पीएमएस - एससी या योजने अंतर्गत उच्च शिक्षणासाठी दिली जाणारी शिष्यवृत्ती पुरेशी नव्हती.या शिष्यवृत्तीच्या वितरणातही भ्रष्टाचाराच्या तक्रारी होत्या. केंद्रीय मंत्रीमंडळाने अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठीच्या शिष्यवृत्ती निधीमध्ये गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत सर्वोच्च वाढ केली आहे. शिष्यवृत्तीचे वाटप पारदर्शक पद्धतीने होण्यासाठी विद्यार्थ्यांची पात्रता, आधार ओळखपत्र, जातीचे प्रमाणपत्र व बॅंकेचे तपशील पडताळून ऑनलाईन पद्धतीने निधीचे वितरण करण्यात येणार आहे.

2017 ते २०२० या कालावधीत अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठीच्या शिष्यवृत्ती करिता दरवर्षी ११०० कोटी रुपये निधी दिला जात होता. आता आगामी पाच वर्षांत दरवर्षी हा निधी ६ हजार कोटी रुपये करण्यात आला आहे.या निधीतील केंद्र सरकारचा वाटा ६० टक्के असून राज्य सरकारांना ४० टक्के खर्च करावा लागणार आहे, अशी माहिती देत नमिता मुंदडा यांनी तत्कालीन युपीए सरकारवर टीका केली. त्या म्हणाल्या,पीएमएस-एससी योजनेच्या निधीत यापूर्वीच अशी वाढ करणे अपेक्षित होते.मात्र कॉंग्रेस प्रणित युपीए सरकारने केवळ राजकारणासाठीच फुले,शाहू, आंबेडकर यांच्या नावाचा वापर केला. दहावीनंतर पैशाअभावी ज्यांना उच्च शिक्षण घेता येत नाही,अशा विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे. विद्यार्थ्यांनी तो घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. पत्रपरिषदेस जालिंदर शेंडगे, पंकज भारसाकळे, राजू शिंदे,बबन‌ नरवडे, चंद्रकांत हिवराळे, अमृता पालोदकर, आशा शेरखाने,राम बुधवंत आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :Scholarshipशिष्यवृत्तीAurangabadऔरंगाबादCentral Governmentकेंद्र सरकारNarendra Modiनरेंद्र मोदी