शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

सुशिक्षित बेरोजगारांची थट्टा; कर्जाच्या फायलींना १५९ बँकांचा ठेंगा

By बापू सोळुंके | Updated: July 28, 2023 14:36 IST

जिल्हा उद्योग केंद्रामार्फत बँकांना पाठविण्यात आलेल्या कर्ज फायलींबाबत बँकांचा नकारात्मक दृष्टिकोन

छत्रपती संभाजीनगर : जिल्हा उद्योग केंद्रांनी (डीआयसी) पाठविलेल्या सुशिक्षित बेरोजगारांच्या कर्जांच्या फायलींना १५९ बँकांनी केराची टोपली दाखविली आहे. एवढेच नव्हे तर, जिल्ह्यातील ६६ बँकांनी प्रत्येकी एकच कर्ज फाइल मंजूर केल्याने बँकांची सुशिक्षित बेरोजगारांना कर्ज देण्याबाबतची उदासीनता दिसून येत आहे.

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत १८ ते ४५ वयोगटातील सुशिक्षित बेरोजगारांना उद्योग, व्यवसाय करण्यासाठी बँकांमार्फत कर्ज उपलब्ध करण्यात येते. यात ३५ टक्क्यांपर्यंत अनुदान देण्यात येते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्रामार्फत ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक असते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी औरंगाबाद जिल्ह्यातील सुमारे तीन हजार सुशिक्षित बेरोजगारांनी जिल्हा उद्योग केंद्राकडे अर्ज केले होते. अर्ज छाननीत योग्य असलेल्या सुमारे ३ हजार ३५२ कर्जाच्या फाइली जिल्हा उद्योग केंद्राने ३०६ बँकांकडे कर्ज वाटपासाठी पाठविल्या होत्या. कर्जासाठी अर्ज करणाऱ्या बेरोजगारास १० लाखांपर्यंत विनातारण कर्ज देणे आवश्यक असते. यापैकी केवळ ५०४ सुशिक्षित बेरोजगारांच्या कर्ज फायली मंजूर केल्या आहेत. उर्वरित १,७२९ बेरोजगारांना थेट कर्ज नाकारले, तर १,१९० कर्ज फायलींवर कोणताही निर्णय घेतला नाही. जिल्ह्यातील ३०६ पैकी १५९ बँकांनी २०२२-२३ या आर्थिक वर्षात एकाही सुशिक्षित बेरोजगारास कर्ज मंजूर केले नाही. तर ६६ बँकांनी प्रत्येकी केवळ एकाच बेरोजगाराला कर्ज दिले. शासनाच्या चांगल्या योजनेला खीळ बसविण्याचे काम या बँकांनी केले.

खादी ग्रामोद्योगचीही योजनाखादी ग्रामोद्योग मंडळाकडूनही सुशिक्षित बेरोजगारांना व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करण्यात येते. नियमित परतफेड करणाऱ्यांना अनुदान प्राप्त होते. या योजनेंतर्गत कर्ज मिळावे, यासाठी गतवर्षी जिल्ह्यातील ९५३ जणांनी खादी ग्रामोद्योग मंडळाकडे कर्ज प्रकरण दाखल केले. मंडळाकडून आलेल्या कर्ज फायलींपैकी केवळ ९० कर्जप्रकरणे बँकांनी मंजूर केली.

बँकांचा नकारात्मक दृष्टिकोन मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत जिल्हा उद्योग केंद्रामार्फत बँकांना पाठविण्यात आलेल्या कर्ज फायलींबाबत बँकांचा नकारात्मकच दृष्टिकोन असल्याचे निदर्शनास येते. २०२२-२३ मध्ये जिल्ह्यातील १५९ बँकांनी एकही कर्ज फाइल मंजूर केली नव्हती. बँकांनी जास्तीत जास्त बेरोजगारांना कर्ज द्यावे, यासाठी पाठपुरावा सुरू आहे.- अजिंक्य आजगेकर, जिल्हा उद्योग केंद्र.

टॅग्स :bankबँकAurangabadऔरंगाबाद