शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

मोबाइलमुळे स्मार्ट ग्राहकांचे पाकीट होतेय कॅशलेश; तरीही वाढली एटीएमची संख्या

By प्रशांत तेलवाडकर | Updated: September 8, 2023 18:38 IST

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ६६ हजार १०० कोटींचे डिजिटल व्यवहार 

छत्रपती संभाजीनगर : भाजी खरेदी केली की ग्राहक लगेच खिशातून मोबाइल बाहेर काढतात आणि ‘क्यूआर कोड’ स्कॅन करून व्यवहार पूर्ण केला जातो. यामुळे रोख व्यवहाराची संख्या घटली आणि डिजिटल व्यवहारांची संख्या झपाट्याने वाढू लागली. चालू आर्थिक वर्षात पहिल्या तिमाहीत औरंगाबाद जिल्ह्यातील नागरिकांनी ६६ हजार १०० कोटींचे डिजिटल व्यवहार केले. हे मागील वर्षीच्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत तब्बल ५१ टक्क्यांनी जास्त आहेत. मोबाइलमुळे स्मार्ट ग्राहकांचे पाकीट ‘कॅशलेस’ होत आहे. दुसरीकडे एटीएमवरील गर्दी ओसरत असताना बँका मात्र एटीएमची संख्या वाढवत आहेत, हे विशेष.

नऊ कोटी ट्रँझेक्शनचालू आर्थिक वर्षात एप्रिल ते जून या तिमाहीत ६६ हजार १०० कोटींची डिजिटल उलाढाल झाली. ही उलाढाल ९ कोटी ५३ लाख ट्रँझेक्शनमधून झाली.

मागील वर्षी ४३ हजार ७२२ कोटींचे डिजिटल व्यवहारमागील आर्थिक वर्षात एप्रिल-जून २०२२ या तिमाहीत जिल्ह्यात ५ कोटी २ लाख डिजिटल ट्रँझेक्शन झाली आणि ४३ हजार ७२२ कोटींचे डिजिटल व्यवहार झाले. या तुलनेत एप्रिल-जून २०२३ ट्रँझेक्शन ९० टक्क्यांनी वाढली, तर ५१ टक्क्यांनी डिजिटल व्यवहार वाढले.

२९ नवीन एटीएमची भरमागील वर्षी २०२२ मध्ये जिल्ह्यात सर्व बँकांची मिळून ६६२ एटीएम होती. तर चालू आर्थिक वर्षात यात नवीन २९ एटीएमची भर पडली आहे. सध्या ६९१ एटीएम कार्यरत आहेत.

सावधगिरी बाळगारोख न बाळगणाऱ्यांची संख्या वाढत आहे, तसतशी डिजिटल व्यवहारात क्रांती घडत आहे. पण डिजिटल व्यवहार करताना सावधगिरी बाळगावी. पासवर्ड व लॉगिन आयडी कोणालाही देऊ नका. फसवणूक झाली तर ३ दिवसांत बँक किंवा आरबीआयकडे तक्रार करा. तुमची चूक नसेल व फ्रॉड असेल तर ७ दिवसांच्या आता रक्कम खात्यात परत येऊ शकते.- मंगेश केदार, व्यवस्थापक जिल्हा अग्रणी बँक

कोणत्या माध्यमातून डिजिटल व्यवहार ?माध्यम (एप्रिल-जून २०२३)१) यूपीआय- -१३ हजार २४४ कोटी रु.२) भारत क्यूआर कोड- १३२ कोटी रु.३) डेबिट, क्रेडिट कार्ड- २० हजार कोटी रु.४) आयएमपीएस--२७ हजार ९०० कोटी रु.

टॅग्स :bankबँकAurangabadऔरंगाबादatmएटीएम