शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
3
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
4
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
5
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
6
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
7
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
8
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
9
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
10
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
11
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
12
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
13
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
14
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
15
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
16
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
17
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
18
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
19
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
20
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
Daily Top 2Weekly Top 5

मनसेचा मनपावर विराट मोर्चा

By admin | Updated: July 15, 2014 00:52 IST

लातूर : नागरी समस्या सोडविण्यात याव्यात या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मनपावर सोमवारी विराट मोर्चा काढण्यात आला.

लातूर : नागरी समस्या सोडविण्यात याव्यात या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मनपावर सोमवारी विराट मोर्चा काढण्यात आला. आमदार बाळा नांदगावकर यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चात मनसे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. अण्णा भाऊ साठे चौकातून सकाळी ११ वाजता निघालेला मोर्चा दुपारी १ वाजण्याच्या सुमारास मनपावर धडकला.लातूर शहरात कचऱ्याचे जागोजागी ढिग साचले आहेत. पाण्याचा प्रश्न बिकट झाला आहे. एलबीटीमुळे व्यापारी हैराण आहेत. धरणातील पाणीसाठा संपल्यामुळे शहरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. परंतु, याकडे मनपा प्रशासन गांभीर्याने पाहत नाही, असा आरोप मोर्चाच्या वतीने करण्यात आला.यशवंत शाळेसमोरील शासकीय गोडावून जवळ सार्वजनिक स्वच्छतागृह उभारावे़, रिंगरोडवरुन डीपी प्लॅनप्रमाणे ज्ञानेश्वर नगरमध्ये जाणाऱ्या रस्त्यावरील वीस वर्षांपासून असलेले अतिक्रमण तात्काळ काढावे, वैदू समाजाला स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करुन द्यावी, शहरातील अनेक रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात यावेत, लिकेज झालेली पाईपलाईन तात्काळ दुरुस्त करावी, मनपाचे दवाखाने व शाळांची दुरवस्था थांबवावी़, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुतळ्याचे अनावरण तात्काळ करावे, अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. मनपा प्रशासनाच्या निषेधाच्या घोषणाही यावेळी देण्यात आल्या. त्यानंतर या मागण्यांचे निवेदन मनपा आयुक्त सुधाकर तेलंग यांना देण्यात आले. निवेदनावर मनसे जिल्हाध्यक्ष अभय साळुंके, संतोष नागरगोजे, साईनाथ दुर्गे, राजकुमार होळीकर, सुनिल मलवाड, गणेश गवारे, बालाजी जाधव, राज क्षीरसागर, पप्पू धोत्रे, शाम जाधव, फुलचंद कावळे, गीता गौड, विनोद मालू, सुनिल सौदागर, हरिओम भगत, महादेव कलमुकले, इक्रांत सय्यद, युवराज कांबळे, योगिता जानतीकर, प्रसाद स्वामी, मनोज अभंगे, अमर गिरी, महेश खोबरे, अ‍ॅड. सचिन चामले, गजानन कातळे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत़ (प्रतिनिधी)कचरा, पाण्याचा प्रश्न गंभीर : बाळा नांदगावकरलातूर शहरात कचरा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट झाला आहे. लातूर शहराला पंधरा-पंधरा दिवस पाणी मिळत नाही. त्यामुळे नागरिक वैतागले असून, सत्ताधारी नागरी समस्यांकडे गांभीर्याने पाहत नाहीत. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नागरिकांच्या प्रश्नांसाठी हा विराट मोर्चा काढला असल्याचे आमदार बाळा नांदगावकर यावेळी म्हणाले. नागरी समस्यांची उकल करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना जनतेच्या पाठीशी आहे, असेही ते यावेळी म्हणाले.