शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

मनसेचा मनपावर विराट मोर्चा

By admin | Updated: July 15, 2014 00:52 IST

लातूर : नागरी समस्या सोडविण्यात याव्यात या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मनपावर सोमवारी विराट मोर्चा काढण्यात आला.

लातूर : नागरी समस्या सोडविण्यात याव्यात या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मनपावर सोमवारी विराट मोर्चा काढण्यात आला. आमदार बाळा नांदगावकर यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चात मनसे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. अण्णा भाऊ साठे चौकातून सकाळी ११ वाजता निघालेला मोर्चा दुपारी १ वाजण्याच्या सुमारास मनपावर धडकला.लातूर शहरात कचऱ्याचे जागोजागी ढिग साचले आहेत. पाण्याचा प्रश्न बिकट झाला आहे. एलबीटीमुळे व्यापारी हैराण आहेत. धरणातील पाणीसाठा संपल्यामुळे शहरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. परंतु, याकडे मनपा प्रशासन गांभीर्याने पाहत नाही, असा आरोप मोर्चाच्या वतीने करण्यात आला.यशवंत शाळेसमोरील शासकीय गोडावून जवळ सार्वजनिक स्वच्छतागृह उभारावे़, रिंगरोडवरुन डीपी प्लॅनप्रमाणे ज्ञानेश्वर नगरमध्ये जाणाऱ्या रस्त्यावरील वीस वर्षांपासून असलेले अतिक्रमण तात्काळ काढावे, वैदू समाजाला स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करुन द्यावी, शहरातील अनेक रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात यावेत, लिकेज झालेली पाईपलाईन तात्काळ दुरुस्त करावी, मनपाचे दवाखाने व शाळांची दुरवस्था थांबवावी़, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुतळ्याचे अनावरण तात्काळ करावे, अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. मनपा प्रशासनाच्या निषेधाच्या घोषणाही यावेळी देण्यात आल्या. त्यानंतर या मागण्यांचे निवेदन मनपा आयुक्त सुधाकर तेलंग यांना देण्यात आले. निवेदनावर मनसे जिल्हाध्यक्ष अभय साळुंके, संतोष नागरगोजे, साईनाथ दुर्गे, राजकुमार होळीकर, सुनिल मलवाड, गणेश गवारे, बालाजी जाधव, राज क्षीरसागर, पप्पू धोत्रे, शाम जाधव, फुलचंद कावळे, गीता गौड, विनोद मालू, सुनिल सौदागर, हरिओम भगत, महादेव कलमुकले, इक्रांत सय्यद, युवराज कांबळे, योगिता जानतीकर, प्रसाद स्वामी, मनोज अभंगे, अमर गिरी, महेश खोबरे, अ‍ॅड. सचिन चामले, गजानन कातळे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत़ (प्रतिनिधी)कचरा, पाण्याचा प्रश्न गंभीर : बाळा नांदगावकरलातूर शहरात कचरा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट झाला आहे. लातूर शहराला पंधरा-पंधरा दिवस पाणी मिळत नाही. त्यामुळे नागरिक वैतागले असून, सत्ताधारी नागरी समस्यांकडे गांभीर्याने पाहत नाहीत. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नागरिकांच्या प्रश्नांसाठी हा विराट मोर्चा काढला असल्याचे आमदार बाळा नांदगावकर यावेळी म्हणाले. नागरी समस्यांची उकल करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना जनतेच्या पाठीशी आहे, असेही ते यावेळी म्हणाले.