शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

मनसेचा हिंगोलीत मोर्चा

By admin | Updated: August 20, 2014 00:24 IST

हिंगोली : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदतीसह उपाययोजनांची अंमलबजावणी करा आदी मागण्यांसाठी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

हिंगोली : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदतीसह उपाययोजनांची अंमलबजावणी करा आदी मागण्यांसाठी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.यंदा अत्यल्प पर्जन्यमानामुळे शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे. अनेकांना दुबार, तिबार पेरणी करावी लागली. उगवलेले पीक मागच्या काही दिवसांत पावसाने ओढ दिल्याने पिवळे पडत आहे. यामुळे शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. या परिस्थितीत दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज असल्याचे निवेदनात म्हटले आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना एकरी तीस हजारांची मदत द्यावी, दुष्काळ निवारणासाठी उपाययोजना करून त्यावर त्वरित अंमलबजावणी करावी , गुरांसाठी चारा छावण्या, डेपो उघडावेत, शेतमजुरांना रोहयोची कामे उपलब्ध करून द्यावीत, टंचाईग्रस्त भागात पिण्याच्या पाण्याची सोय करावी, शेतकऱ्यांचे कर्ज, वीजबिल पूर्ण माफ करावे आदी मागण्याही करण्यात आल्या. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनावर जिल्हाध्यक्ष बंडू कुटे, संदेश देशमुख, ओम कोटकर, जांबुवंत पाटील, विनोद बांगर, कय्युमखॉं पठाण, आनंद सारडा, कल्याण देशमुख, संतोष बांगर, विशाल गोटरे, राजू नागरे, विकास शिंदे, रवी पाटील, शिवाजी सांगळे, रामदास जिनेवाड, कडूजी जाधव, प्रमोद पोहकर, बद्री कोटकर, प्रकाश पाटील, देवीदास कुंदर्गे, संतोष खंदारे, गजानन भालेराव, प्रवीण टाले, राजेश बांगर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)