शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
2
जीएसटीने आणखी अवघड केले...! पार्ले-जी बिस्कीट पुडा ५ रुपयांचा आता ४.४५ ला, १ रुपयाचे चॉकलेट ८८ पैशांना...
3
Gold Silver Price Today: आजही सोन्या-चांदीचे भाव नव्या विक्रमी पातळीवर; सोन्याच्या दरात प्रति तोळा ₹१,३४३ तर चांदी ₹१,१८१ ने महागली
4
...म्हणून डोंबिवलीत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याला भाजपाच्या कार्यकर्त्यांनी नेसवली साडी, व्हिडीओ व्हायरल
5
"निरपराध लोकांची काय चूक होती? आम्ही निषेध करणार"; हवाई हल्ल्यात ३० जणांचा मृत्यू, पाकिस्तानमधील जनता संतापली
6
GST कपातीनंतर सरकारची आणखी एक गुड न्यूज! २५ लाख महिलांना मिळणार मोफत गॅस कनेक्शन
7
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
8
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
9
Maharashtra Rain Alert: नवरात्रोत्सवात पावसाचाच 'गरबा', जाता जाता तडाखा देणार; IMD कडून सतर्कतेचा इशारा
10
Viral Video : घर नव्हे हा तर अजूबा! अवघ्या ५२ इंचांच्या दोन मजली घरात डोकावून बघाल, तर हादरून जाल!
11
उडणाऱ्या कारचा जगातील पहिलाच अपघात; दोन फ्लाइंग कार एकमेकांवर आदळल्या, एक बनली आगीचा गोळा...
12
बिहारमध्ये NDAचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, हा पक्ष लढवणार सर्वाधिक जागा
13
अतूट बंध! महागडे गिफ्टस नको तर 'या' ८ गोष्टींनी फुलवा नातं, आयुष्यभर राहा एकमेकांचे सोबती
14
Maharashtra Rain: संपूर्ण आठवडा पावसाचा, शुक्रवारनंतर मुसळधार पावसाची शक्यता, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र
15
नवरात्री २०२५: विनायक चतुर्थी कधी? व्रताचा संकल्प करा; गणपती पूजन ठरेल वरदान, कायम कृपा-लाभ!
16
USA Hanuman Statue: आता अमेरिकेचा हनुमानावरही आक्षेप; म्हणाले, 'खोट्या देवांची मूर्ती....'
17
Navratri 2025: नवरात्रीत लावलेला अखंड दिवा घालवतो 'अकाल मृत्यू'ची भीती; मात्र... 
18
"आधी नवरा गेला, आता मुलगी..."; विद्यार्थिनीचा शाळेत संशयास्पद मृत्यू, आईने फोडला टाहो
19
नवरात्री २०२५: अखंड ज्योत संकल्प केला, अचानक दिवा विझला तर...; देवी कोप-अशुभ-अवकृपा होईल का?
20
आर अश्विन पुन्हा मैदानात दिसणार; निवृत्तीनंतर परदेशातील ४ संघाकडून खेळण्याची ऑफर!

अभ्यास केंद्रामुळे शंभरावर मुलींमध्ये ‘उमेद’

By admin | Updated: May 21, 2016 23:59 IST

उस्मानाबाद : जिल्ह्यात मागील तीन वर्षांपासून उद्भवणाऱ्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी, शेतमजूर आर्थिक विवंचनेत सापडले आहेत

उस्मानाबाद : जिल्ह्यात मागील तीन वर्षांपासून उद्भवणाऱ्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी, शेतमजूर आर्थिक विवंचनेत सापडले आहेत. दुष्काळाने पिचलेले शेतकरी, शेतमजूरांच्या मुलींना मोफत स्पर्धा परीक्षांबाबत मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने जिल्हा परिषदेकडून सुरू करण्यात आलेल्या उमेद मार्गदर्शन केंद्रामुळे सुमारे शंभरावर मुलींमध्ये ‘उमेद’ निर्माण होण्यास मदत झाली आहे. सातत्याने होत असलेल्या अत्यल्प पावसामुळे शेतकऱ्यांचे अर्थकारण पूर्णत: कोलमडले आहे. शेतीमध्ये कामे नसल्याने मजुरांच्या मजुरीचा प्रश्नही गंभीर बनला आहे. अशा परिस्थित पाल्यांच्या शिक्षणाचा खर्च भागविणेही आवाक्याबाहेर गेले आहे. स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी खाजगी क्लासेसमध्ये पाठविण्याबाबत तर विचार न केलेलाच बरा. हीच बाब लक्षात घेवून जिल्हा परिषद अध्यक्ष अ‍ॅड. धीरज पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते यांच्या संकल्पनेतून शेतकरी, शेतमजूर आणि जि.प. कर्मचाऱ्यांच्या मुलींसाठी उमेद स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केुंद्र सुरू करण्यात आले आहे. या ठिकाणी सध्या शंभरावर मुलींना ‘एमपीएससी’ परीक्षेच्या धर्तीवर तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन केले जात आहे. यासाठी पूर्णवेळ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे. दररोज सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत स्पर्धा परीक्षेतून निवड झालेल्या अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन ठेवले जाते. दुपारी १ ते २ या वेळत ग्रंथालयात वृत्तपत्र वाचन आणि दुपारी २ ते सायंकाळी ६ या वेळत अभ्यासिका असते. विशेष म्हणजे शंभर पैकी तब्बल पन्नास टक्के मुली या खेड्यातून येत आहेत. त्यामुळे या केंद्राच्या माध्यमातून आर्थिक क्षमता नसणाऱ्या ग्रामीण भागातील मुलींची सोय झाली आहे. केंद्राचे नियोजन शिक्षण विस्तार अधिकारी सोमनाथ घोलप यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. (प्रतिनिधी) स्पर्धा परीक्षा केंद्रात मार्गदर्शक पुस्तके, मासिक, संदर्भ साहित्य, इयत्ता चौथी ते बारावीपर्यंतची क्रमिक पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली आहेत. विविध प्रकारच्या या पुस्तकांची संख्या सातशेवर आहे. त्याचप्रमाणे अभ्यासिका, संगणक, इंटरनेट उपलब्ध करून देण्यात आले आहे. आर्थिक परिस्थितीमुळे मुंबई अथवा पुणे येथील खाजगी क्लासेसला जाणे शक्य नव्हते. असे असतानाच जिल्हा परिषदेने मोफत उमेद स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू केल्याने दिलासा मिळाला. येथे मुंबई, पुण्यापेक्षाही दर्जेदार शिक्षण मिळत असल्याचे कळंब येथील पल्लवी रविंद्र शिंदे या विद्यार्थीनीने सांगितले.४दुष्काळी परिस्थितीमुळे स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी खाजगी क्लासेसची पायरी चढणे कठीण झाले आहे. मात्र, जिल्हा परिषदेने उमेद मार्गदर्शन केंद्र सुरू केल्याने सर्वसामान्य कुटुंबातील मुलींची सोय झाली आहे, असे ढोकी येथील भाग्यश्री भास्कर लोंढे व संध्या शरद राऊत यांनी सांगितले.