शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
4
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
5
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
6
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
7
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
8
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
9
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
10
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
11
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
12
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
13
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
14
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
15
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
16
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
17
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
18
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
19
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
20
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

अभ्यास केंद्रामुळे शंभरावर मुलींमध्ये ‘उमेद’

By admin | Updated: May 21, 2016 23:59 IST

उस्मानाबाद : जिल्ह्यात मागील तीन वर्षांपासून उद्भवणाऱ्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी, शेतमजूर आर्थिक विवंचनेत सापडले आहेत

उस्मानाबाद : जिल्ह्यात मागील तीन वर्षांपासून उद्भवणाऱ्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी, शेतमजूर आर्थिक विवंचनेत सापडले आहेत. दुष्काळाने पिचलेले शेतकरी, शेतमजूरांच्या मुलींना मोफत स्पर्धा परीक्षांबाबत मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने जिल्हा परिषदेकडून सुरू करण्यात आलेल्या उमेद मार्गदर्शन केंद्रामुळे सुमारे शंभरावर मुलींमध्ये ‘उमेद’ निर्माण होण्यास मदत झाली आहे. सातत्याने होत असलेल्या अत्यल्प पावसामुळे शेतकऱ्यांचे अर्थकारण पूर्णत: कोलमडले आहे. शेतीमध्ये कामे नसल्याने मजुरांच्या मजुरीचा प्रश्नही गंभीर बनला आहे. अशा परिस्थित पाल्यांच्या शिक्षणाचा खर्च भागविणेही आवाक्याबाहेर गेले आहे. स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी खाजगी क्लासेसमध्ये पाठविण्याबाबत तर विचार न केलेलाच बरा. हीच बाब लक्षात घेवून जिल्हा परिषद अध्यक्ष अ‍ॅड. धीरज पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते यांच्या संकल्पनेतून शेतकरी, शेतमजूर आणि जि.प. कर्मचाऱ्यांच्या मुलींसाठी उमेद स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केुंद्र सुरू करण्यात आले आहे. या ठिकाणी सध्या शंभरावर मुलींना ‘एमपीएससी’ परीक्षेच्या धर्तीवर तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन केले जात आहे. यासाठी पूर्णवेळ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे. दररोज सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत स्पर्धा परीक्षेतून निवड झालेल्या अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन ठेवले जाते. दुपारी १ ते २ या वेळत ग्रंथालयात वृत्तपत्र वाचन आणि दुपारी २ ते सायंकाळी ६ या वेळत अभ्यासिका असते. विशेष म्हणजे शंभर पैकी तब्बल पन्नास टक्के मुली या खेड्यातून येत आहेत. त्यामुळे या केंद्राच्या माध्यमातून आर्थिक क्षमता नसणाऱ्या ग्रामीण भागातील मुलींची सोय झाली आहे. केंद्राचे नियोजन शिक्षण विस्तार अधिकारी सोमनाथ घोलप यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. (प्रतिनिधी) स्पर्धा परीक्षा केंद्रात मार्गदर्शक पुस्तके, मासिक, संदर्भ साहित्य, इयत्ता चौथी ते बारावीपर्यंतची क्रमिक पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली आहेत. विविध प्रकारच्या या पुस्तकांची संख्या सातशेवर आहे. त्याचप्रमाणे अभ्यासिका, संगणक, इंटरनेट उपलब्ध करून देण्यात आले आहे. आर्थिक परिस्थितीमुळे मुंबई अथवा पुणे येथील खाजगी क्लासेसला जाणे शक्य नव्हते. असे असतानाच जिल्हा परिषदेने मोफत उमेद स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू केल्याने दिलासा मिळाला. येथे मुंबई, पुण्यापेक्षाही दर्जेदार शिक्षण मिळत असल्याचे कळंब येथील पल्लवी रविंद्र शिंदे या विद्यार्थीनीने सांगितले.४दुष्काळी परिस्थितीमुळे स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी खाजगी क्लासेसची पायरी चढणे कठीण झाले आहे. मात्र, जिल्हा परिषदेने उमेद मार्गदर्शन केंद्र सुरू केल्याने सर्वसामान्य कुटुंबातील मुलींची सोय झाली आहे, असे ढोकी येथील भाग्यश्री भास्कर लोंढे व संध्या शरद राऊत यांनी सांगितले.