शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

बीडमध्ये विकासाचा मुद्दा गायब; जातीवरच जास्त 'राजकारण'

By सोमनाथ खताळ | Updated: April 22, 2024 19:00 IST

सभांमध्ये जातीवरच चर्चा : उद्योग, पीक विमा, शेती, अवकाळी नुकसान यावर कोणीही बोलेना

बीड : लोकसभा निवडणूकीत आता उमेदवारांसह नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडण्यास सुरूवात झाली आहे. नेता किंवा उमेदवार हे शेती, पीक विमा, अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीवर बोलायला तयार नाहीत. केवळ जातीच्या मुद्यावरच अधिक चर्चा केली जात आहे.

लाेकसभा निवडणूकीचे वातावरण तापू लागले असून १८ एप्रिलपासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पहिल्याच दिवशी ३९ जणांनी ९२ उमेदवारी अर्ज नेले होते. यामध्ये महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे, महाविकास आघाडीचे बजरंग सोनवणे आणि वंचित बहुजन आघाडीचे अशोक हिंगे आदींचा समावेश होता. गुरूवारपासून भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी जाहिर सभा घेण्यास सुरूवात केली आहे. पहिल्याच दिवशी त्यांनी आष्टी, पाटोदा आणि शिरूर तालुक्यात चार सभा घेतल्या. आष्टी तालुक्यातील दादेगाव येथे त्यांनी माझा वनवास संपला असून आता राज्याभिषेक होणार असल्याचे वक्तव्य केले हाेते. त्यानंतर आष्टीतील सभेत त्यांनी जातीवर भाष्य केले. आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांची जात काढली जातेय, हे दुर्दैव आहे. यापूर्वीही उमेदवारी जाहिर झाल्यावर जिल्ह्यात पहिल्यांदा येताना जिल्ह्याच्या वेशीवरच जातीबाबत वक्तव्य केले होते. सध्या उमेदवारांसह सभा घेणाऱ्या नेत्यांकडूनही जातीवर भाष्य केले जात आहे. विकासाच्या मुद्यावर फारसे कोणी बोलत नसल्याचे दिसते.

सोशल मिडीयावरही काढली जातेय जातबीड जिल्ह्यात ठरावीक जातीचेच अधिकारी आणले जात असून त्यांची एक यादीच सोशल मिडीयावर व्हायरल झाली होती. यावर लगेच दुसऱ्याच दिवशी मागील चार वर्षात जिल्ह्यात मराठा व इतर जातीचे किती अधिकारी आले, याचा लेखाजोखाच मांडण्यात आला. सोशल मिडीयावरही सध्या जातीच्या राजकारणावर चर्चा सुरू असल्याचे दिसते.

धनंजय, पंकजा मुंडे यांचेही वक्तव्यआतापर्यंत अनेक सभा झाल्या, भाषणे झाली आणि निवडणूकाही झाल्या, परंतू कधी जातीपातीचे राजकारण केले नाही. तसेच हा मुद्दाही समोर आला नाही. परंतू यावेळी जातीचे राजकारण केले जातेय, हे दुर्दैव असल्याचे त्यांनी सांगितले.

अशोक हिंगेंकडून पंकजावर आरोपपंकजा मुंडे यांनी उपोषण करण्याबाबत शिरूर तालुक्यात भाष्य केले होते. यावर वंचितचे उमेदवार अशोक हिंगे यांनी यावर जोरदार टीका केली. पंकजा मुंडे या संवैधानिक पदासाठी निवडणूक लढवत आहेत. उपोषण करण्याचा देशात इतिहास आहे. मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण केल्यानेच राज्यातील लाखो मराठा समाजाच्या लोकांना कुणबी प्रमाणपत्र मिळाले आहे. यापुढे असे वक्तव्य केल्यास याद राखा, असा इशाराही हिंगे यांनी दिला.

टॅग्स :beed-pcबीडlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४big Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४